शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
2
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
4
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
5
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
6
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
7
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
8
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
9
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
10
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
11
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
12
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
13
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
14
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
15
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
16
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
17
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
18
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
19
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
20
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

दानवेंविरोधात विलास औताडे पहिल्याच बैठकीत आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 00:25 IST

भाजपचे खा. रावसाहेब दानवे यांनी विकास करतांना तो केवळ स्वत:च्या परिवाराचा केला आहे , असा गंभीर आरोप काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार विलास औताडे यांनी शनिवारी येथे पक्षाच्या बैठकीत केला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : भाजपचे खा. रावसाहेब दानवे यांनी विकास करतांना तो केवळ स्वत:च्या परिवाराचा केला आहे. कुठलेही कंत्राट असले की, एक तर चुलत भाऊ अथवा जावई वा अन्य नातेवाईकांनाच दिली आहेत. त्यामुळे विकास करताना त्यांच्या नातेवाईकांचा आर्थिक विकास केला आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार विलास औताडे यांनी शनिवारी येथे पक्षाच्या बैठकीत केला.यावेळी ते म्हणाले की, दानवे यांना हृदयाचा पत्ता नसून, त्यांची भूमिका शेतकरी विरोधी राहिली आहे. त्यामुळे आगामी काळात त्यांचा आपण पर्दाफाश करू, विकास म्हणजे केवळ रस्ते तयार करणे नव्हे, त्यातून गोरगरिबांसह शेतकऱ्यांचे समाधान होणे गरजेचे आहे. एकूणच औताडे यांनी त्यांच्या पहिल्याच जालना दौऱ्यात ही आक्रमक भूमिका दानवेंविरोधात घेतल्याने काँग्रेसमध्ये चैतन्य संचारले होते. सतकर कॉम्प्लेक्स येथे ही बैठक सायंकाळी पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी अध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया, डॉ. संजय लाखे पाटील, शहराध्यक्ष शेख महेमूद, कल्याण दळे, सुदामराव सदाशिवे, अ‍ॅड.विनायक चिटणीस, विजय कामड, बदर चाऊस, राजेंद्र राख, जीवन सले, महावीर ढक्का, विजय चौधरी, दिनकर घेवंदे, तसेच काँग्रेस पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन राम सावंत यांनी केले.आरोपात तथ्य नाहीआपण जालना लोकसभा मतदारसंघात कधी नव्हे एवढा निधी खेचून आणून रस्ते, पूल तसेच अन्य विकास कामांवर तो खर्च केला. या विकास कामांच्या गतीने विरोधक धास्तावले आहेत. त्यामुळे ते माझ्यासह माझ्या कुटुंबियांवर बेछूट आरोप करत आहेत. या आरोपात कुठलेच तथ्य नाही.- खा. रावसाहेब दानवे,जालना

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेस