शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पहिल्या दिवशी अधिकाऱ्यांची दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 00:49 IST

जिल्हा परिषदेत अधिकारी वर्गा$चा मनमानी कारभार सुरू आहे. कोणालाही न सांगता अधिकारी गैरहजर राहत असल्याने नागरिकांची कामे खोळंबली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा परिषदेत अधिकारी वर्गाचा मनमानी कारभार सुरू आहे. कोणालाही न सांगता अधिकारी गैरहजर राहत असल्याने नागरिकांची कामे खोळंबली आहेत. सोमवारी लोकमतच्या टीमने जिल्हा परिषदेतील सर्वच विभागाची पाहणी केली. या पाहणीत महिला व बाल कल्याण विभागाचे उप मुख्य अधिकारी सोडले तर सर्वच जण अनुपस्थित दिसले. या प्रकरामुळे सोमवारी ग्रामीण भागातून आलेल्या सर्वच नागरिकांची कामे खोळंबली होती.जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय समजले जाते. येथूनच सर्व जिल्ह्याचा कारभार चालतो. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात कामांसाठी दररोज जिल्हा परिषदेच्या कार्यालयात येतात. नागरिकांच्या कामांसाठी अधिकाºयांना सोमवार व शुक्रवार हा दिवस दिला आहे. परंतु, संबंधित विभागाचे अधिकारीच नसल्याने नागरिकांना निराश होऊन परत जावे लागते. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लोकमतने जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांची पाहणी केली. सुरवातीलाच मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांचे दालन बंद दिसले. त्यानंतर सर्व विभागांची पाहणी केली. त्यानंतर स्वच्छ भारत मिशनचे उप मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या कार्यालयाची पाहणी केली. त्यांचेही कार्यालय बंदच दिसले. येथील कर्मचा-यांकडे विचारपूस केली असता, ते म्हणाले की, साहेब आलेच नाही. तसेच पशु संवर्धन विभाग, बांधकाम विभाग, कृषी विभाग, आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभाग, शिक्षण विभाग, प्राथमिक व माध्यमिकचे अधिकारीच दिसले नाही.या प्रत्येक विभागाच्या बाहेर मात्र, ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी खरात हे मात्र कार्यालयात अधिका-यांची बैठक घेत होते.वेगवेगळी कारणे सांगून अधिकारी दिवस-दिवस गायब असतात. नागरिक मात्र जिल्हा परिषदेत हेलपाटे मारत असून अधिकारी गैरहजर असल्याने त्यांची कामे होत नाहीत.कारभार सुधारण्याची गरजजिल्हा परिषदेच्या समित्यांच्या सभा, सर्वसाधारण सभांना अन्य सरकारी विभागाच्या अधिका-यांना बोलावले जाते. परंतु, या विभागांचे अधिकारी मात्र सभांना जाण्याचे टाळतात. काही वेळेस प्रतिनिधी पाठवतात. त्यामुळे सभेत कामकाज करणे अवघड होते. अशा वेळी सदस्य संतापतात. गैरहजर राहणा-या अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी केली जाते. त्यानुसार अधिका-यांच्या तक्रारीही झाल्या आहेत. आता मात्र जिल्हा परिषदेतील अनागोंदी कारभार समोर आला आहे. जिल्हा परिषद प्रशासनाचा कारभार सुधारण्याची गरज ग्रामीण भागातून आलेल्या ग्रामस्थांनी बोलून दाखवली.सोमवारी काही अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. यानंतर सोमवारी आणि शुक्रवारी अधिकारी कार्यालयात हजर नसले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.- अनिरुध्द खोतकर, जि.प. अध्यक्ष

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदEmployeeकर्मचारी