बाबूलतार्यातील तणाव निवळला
By Admin | Updated: May 6, 2014 17:12 IST2014-05-06T17:10:33+5:302014-05-06T17:12:20+5:30
परतूर: तालुक्यातील बाबूलतारा येथील तणाव निवळला असून, देवीच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे.

बाबूलतार्यातील तणाव निवळला
परतूर: तालुक्यातील बाबूलतारा येथील तणाव निवळला असून, देवीच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. महसूल व पोलिस अधिकार्यांनी घेतली संयुक्त बैठक फलदायी ठरली आहे. तालुक्यातील बाबूलतारा येथे आसरादेवीच्या विटंबनेवरून दोन समाजात तेढ निर्माण झाली होती. यामध्ये परस्परविरोधी तक्रारीवरून परतूर पोलिसांत ६२ जणांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर गावात पोलिस बंदोबस्तही वाढवण्यात आला होता. गावात शांतता निर्माण करण्याच्या उद्देशाने उपविभागीय अधिकारी अरविंद लोखंडे, तहसीलदार विनोद गुंडमवार, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीपान कांबळे, पोलिस निरीक्षकांनी संयुक्त बैठक बोलावली. गावकर्यांची समजूत काढत शांततेचे अवाहन केले. या आवाहनास गावकर्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत देवीच्या मूर्तींची विधीवत पूजा करून स्थापना केली. यामुळे गावातील तणाव निवळला असून, पोलिस बंदोबस्तही कमी करण्यात आला असल्याचे पोलिस निरीक्षक शेवगण यांनी सांगितले. या बैठकीस सरपंच चुनखडे, संपतराव मुळे, राजाभाऊ मुळे, सुधाकर मुळे देवकर, काळे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)