शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

फळबागा जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 00:24 IST

वाढत्या उन्हात व पाणी टंचाईच्या काळात फळबागा जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असून, अहोरात्र जागरण करून झाडांना पाणी देण्याचे काम शेतकरी करीत आहेत.

परतूर : वाढत्या उन्हात व पाणी टंचाईच्या काळात फळबागा जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असून, अहोरात्र जागरण करून झाडांना पाणी देण्याचे काम शेतकरी करीत आहेत.परतूर तालुक्यात फळबागांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये मोसंबी, पेरू, सीताफळ, केळी आदींचा समावेश आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे परिसरात यावर्षी विहिरी व बोअरनी तळ गाठला आहे. काही गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. विकतचे पाणी घेऊन शेतकरी फळबागा जोपासण्याचे काम करत आहेत. विजेच्या भारनियमनामुळे शेतक-यांना वीज व पाण्याचे नियोजन करून अहोरात्र जागरण करत या बागा जगवाव्या लागत आहेत. या फळबागा जगवण्यासाठी शासनाकडून आर्थिक मदत मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पूर्वी फळबागासाठी शासन अनुदान द्यायचे, मात्र मागील काही वर्षांपासून शेतक-यांना काहीच देण्यात आले नसल्याचे बागायतदार शेतकरी सांगत आहेत. अनुदान देण्याची मागणी शेतक-यांनी केली आहे.

टॅग्स :droughtदुष्काळagricultureशेतीfruitsफळे