शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

शेतजमिनीचा पोत बिघडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 00:27 IST

बेसुमार उत्पन्न घेण्याच्या नादात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा वापर केल्याने दिवसे - दिवस जमिनीचा पोत बिघडत चालला आहे.

गजानन वानखडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : बेसुमार उत्पन्न घेण्याच्या नादात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा वापर केल्याने दिवसे - दिवस जमिनीचा पोत बिघडत चालला आहे. याचा उत्पन्नावर परिणाम झाल्याने जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील तब्बल साडेतीन लाख शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील मातीपरीक्षण करून घेतले यात स्फुरद, नत्र, आणि जस्त या मूलद्रव्यांची कमतरता असल्याचे स्पष्ट झाले आहे.मनुष्याच्या आरोग्या प्रमाणेच जमिनिचे आरोग्य महत्वाचे आहे. आरोग्य बिघडले की लगेच आपण डॉक्टरकडे जातो. तसेच जमिनीचेही आहे. भरघोस उत्पन्न घेण्याचा नादात अनेकजण जमिनीला उसंतच देत नाही. एक पीक काढले की लगेच दुसरे पीक काढायचे त्यात भर म्हणून मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा मारा, यामुळे जिल्ह्यातील शेतीचा पोत बिघडला आहे. काही वर्ष शेतकºयांना उत्पन्न मिळत मात्र यात शेतीचे अतोनात नुकसान होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. बिघडलेले पर्यावरण, कमी पर्जन्यमान तसेच रासायनिक खताचा वापर यामुळे जिल्ह्यातील शेतीचे आरोग्य बिघडले आहे. शेतक-यांच्या जमिनीचे मातीपरीक्षण शेतीचे आरोग्य सुधारावे यातून शेतक-यांना भरघोस उत्पन्न घेता यावे म्हणून शासनाने २०१५ पासून मातीपरीक्षणाची विशेष मोहीम सुरु केली आहे. जिल्ह्यात शेतक-यांची संख्या सव्वापाच लाखांच्या आसपास आहे. जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी विभागाने दोन वर्षात जिल्ह्यातील आठही तालुक्यातील तब्बल ३ लाख ४३ हजार शेतक-यांनी माती नमुन्याची तपासणी केली आहे. यात निर्देशक क्षारता, आॅरगॅनीक आर्यन, नत्र, पालाश, स्फुरद, तांबे, लोह, जस्त, मॅगनीज, बॉरोन, जमिनीतील ओलावा अशा विविध बारा घटकांची तपासणी करण्यात आली. यात स्फुरद, नत्र, आणि जस्त आदी मुलद्रव्यांची मोठ्या प्रमाणात कमतरता आढळून आली. यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यासाठी मृद चाचणी विभागाकडून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतक-यामध्ये जनजागृती करण्यात आली. २०१७ मध्ये ७० हजार शेतक-यांनी माती परीक्षण केले होते. यात वाढ होऊन तब्बल साडेतीन लाख शेतक-यांनी माती परीक्षण केले.सुपीकता घसरण्याची कारणेएकापाठोपाठ सलग पीक घेत राहणे, जमिनी पाणथळ, उथळ फार खोल असणे, सतत एकच पीक घेत राहणे, पूर्व मशागत व आंतरमशागत योग्य प्रकारे न करणे, क्षारयुक्त अथवा खा-या पाण्याचा पाण्याचा वापर करणे, सूक्ष्म अन्नद्रव्य व रासायनिक खतांचा समतोल वापर थांबविणे, शेणखताचा वापर नसणे आदी कारणामुळे जिल्ह्यातील जमिनीची सुपीकता धोक्यात आली आहे.जमिनीच्या सुपीकेतेसाठी प्रत्येक शेतक-याने आपल्या शेतातील मातीचेपरीक्षण हे करणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे मातीपरीक्षणाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.मातीचा नमुना कसा घ्यावामातीचा नमुना पिके काढल्यानंतर किंवा पेरणीपूर्वी, खते दिल्यानंतर तीन महिन्यांनी घ्यावा. मातीचा रंग जमिनीचा खडकाळपणा, उंच सखलपणा, पिकांतील फरक व बागायत / जिरायत स्थिती लक्षात घेऊन शेतीच्या वेगवेगळ्या भागातून माती नमुने घ्यावेत.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीscienceविज्ञान