शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

शेतजमिनीचा पोत बिघडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 00:27 IST

बेसुमार उत्पन्न घेण्याच्या नादात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा वापर केल्याने दिवसे - दिवस जमिनीचा पोत बिघडत चालला आहे.

गजानन वानखडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : बेसुमार उत्पन्न घेण्याच्या नादात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा वापर केल्याने दिवसे - दिवस जमिनीचा पोत बिघडत चालला आहे. याचा उत्पन्नावर परिणाम झाल्याने जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील तब्बल साडेतीन लाख शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील मातीपरीक्षण करून घेतले यात स्फुरद, नत्र, आणि जस्त या मूलद्रव्यांची कमतरता असल्याचे स्पष्ट झाले आहे.मनुष्याच्या आरोग्या प्रमाणेच जमिनिचे आरोग्य महत्वाचे आहे. आरोग्य बिघडले की लगेच आपण डॉक्टरकडे जातो. तसेच जमिनीचेही आहे. भरघोस उत्पन्न घेण्याचा नादात अनेकजण जमिनीला उसंतच देत नाही. एक पीक काढले की लगेच दुसरे पीक काढायचे त्यात भर म्हणून मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा मारा, यामुळे जिल्ह्यातील शेतीचा पोत बिघडला आहे. काही वर्ष शेतकºयांना उत्पन्न मिळत मात्र यात शेतीचे अतोनात नुकसान होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. बिघडलेले पर्यावरण, कमी पर्जन्यमान तसेच रासायनिक खताचा वापर यामुळे जिल्ह्यातील शेतीचे आरोग्य बिघडले आहे. शेतक-यांच्या जमिनीचे मातीपरीक्षण शेतीचे आरोग्य सुधारावे यातून शेतक-यांना भरघोस उत्पन्न घेता यावे म्हणून शासनाने २०१५ पासून मातीपरीक्षणाची विशेष मोहीम सुरु केली आहे. जिल्ह्यात शेतक-यांची संख्या सव्वापाच लाखांच्या आसपास आहे. जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी विभागाने दोन वर्षात जिल्ह्यातील आठही तालुक्यातील तब्बल ३ लाख ४३ हजार शेतक-यांनी माती नमुन्याची तपासणी केली आहे. यात निर्देशक क्षारता, आॅरगॅनीक आर्यन, नत्र, पालाश, स्फुरद, तांबे, लोह, जस्त, मॅगनीज, बॉरोन, जमिनीतील ओलावा अशा विविध बारा घटकांची तपासणी करण्यात आली. यात स्फुरद, नत्र, आणि जस्त आदी मुलद्रव्यांची मोठ्या प्रमाणात कमतरता आढळून आली. यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यासाठी मृद चाचणी विभागाकडून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतक-यामध्ये जनजागृती करण्यात आली. २०१७ मध्ये ७० हजार शेतक-यांनी माती परीक्षण केले होते. यात वाढ होऊन तब्बल साडेतीन लाख शेतक-यांनी माती परीक्षण केले.सुपीकता घसरण्याची कारणेएकापाठोपाठ सलग पीक घेत राहणे, जमिनी पाणथळ, उथळ फार खोल असणे, सतत एकच पीक घेत राहणे, पूर्व मशागत व आंतरमशागत योग्य प्रकारे न करणे, क्षारयुक्त अथवा खा-या पाण्याचा पाण्याचा वापर करणे, सूक्ष्म अन्नद्रव्य व रासायनिक खतांचा समतोल वापर थांबविणे, शेणखताचा वापर नसणे आदी कारणामुळे जिल्ह्यातील जमिनीची सुपीकता धोक्यात आली आहे.जमिनीच्या सुपीकेतेसाठी प्रत्येक शेतक-याने आपल्या शेतातील मातीचेपरीक्षण हे करणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे मातीपरीक्षणाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.मातीचा नमुना कसा घ्यावामातीचा नमुना पिके काढल्यानंतर किंवा पेरणीपूर्वी, खते दिल्यानंतर तीन महिन्यांनी घ्यावा. मातीचा रंग जमिनीचा खडकाळपणा, उंच सखलपणा, पिकांतील फरक व बागायत / जिरायत स्थिती लक्षात घेऊन शेतीच्या वेगवेगळ्या भागातून माती नमुने घ्यावेत.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीscienceविज्ञान