शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

बळीराजाची कपाशीला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 00:32 IST

यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कपाशीलाच सर्वाधिक पसंती दिली आहे.

विकास व्होरकटे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गतवर्षी गुलाबी बोंडअळीचे झालेले आक्रमण आणि त्यात दुष्काळाची धग यामुळे कपाशी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. तरीही यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कपाशीलाच सर्वाधिक पसंती दिली आहे. जिल्ह्यात आजवर २ लाख २२ हजार ६४९ हेक्टरवर कपाशीचा पेरा झाला आहे. यापाठोपाठ सोयाबीनची ८३ हजार २१६ हेक्टरवर पेरणी झाली आहे.मागील वर्षी दुष्काळ होता. त्यामुळे खरीप व रबी पिकांचा पालापाचोळा झाला होता. यामुळे यंदा वेळेवर पाऊस पडेल. अशी आशा शेतकऱ्यांना होती. मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर २२ जूनला आद्रा नक्षत्राने शेतक-यांवर कृपा दाखवली आणि पावसाने जिल्ह््यातील काही तालुक्यांमध्ये हजेरी लावली. त्यानंतर शेतक-यांनी उसनवारीने बी-बियाणांची तजवीज करून पेरणी केली.जिल्हाभरात एकूण सरासरी ५९६७२२. ५० हेक्टर खरीप पेरणी क्षेत्र आहे. १० जून पर्यंत ४०३०८० हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. म्हणजेच ६८.३० टक्के खरीप हंगामाचा पेरा पूर्ण झाल्याचा अहवाल जिल्हा कृषी विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात सर्वात जास्त पेरा कपाशीचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.जिल्ह्यात कापूस बागायत व जिरायत असे एकूण ३०२१६५ सरासरी हेक्टर क्षेत्र कपाशी लागवडी योग्य आहे. सद्यस्थितीत २२२६४९ हेक्टरवर कपाशीची लागवड जिल्हाभरात झाली आहे. यात जालना तालुक्यात ३०१५० हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली. भोकरदन तालुक्यात ३८०२२, जाफराबाद २०६३४, बदनापूर ६९२६०, अंबड १९१६२, घनसावंगी, १३०१२, परतूर ३३८३४ आणि मंठा तालुक्यात १८५७५ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. उर्वरित कालावधीत इतर क्षेत्रावरही खरिपाचा पेरा होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.

टॅग्स :cottonकापूसagricultureशेतीRainपाऊसFarmerशेतकरी