शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
4
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
5
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
6
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
7
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
8
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
9
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
10
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
11
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
12
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
13
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
14
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
15
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
16
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
17
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
18
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
19
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
20
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...

जालन्यातील शेतकऱ्यांना रेशीम कोष बाजारपेठ ठरली वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 19:22 IST

वर्षभरात साडेतीन कोटींची उलाढाल

ठळक मुद्दे वर्षभरापूर्वी  २१ एप्रिल रोजी प्रायोगिक तत्त्वावर बाजारपेठ सुरु औरंगाबादेतही होणार केंद्र

- संजय देशमुख

जालना : पाचवीला पूजलेला दुष्काळ आणि दरवर्षी होणारा अत्यल्प पाऊस यात कोणती पिके घ्यावीत हा शेतकऱ्यांसमोरील सर्वात मोठा प्रश्न.  जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यावर जालीम उपाय सापडला असून, अत्यंत कमी पाण्यावर फुलणारी रेशीम शेती अर्थात तुतीची लागवड त्यांच्यासाठी संजीवनी ठरली आहे. पूर्वी रेशीम कोष विक्रीसाठी कर्नाटकातील रामनगर येथे जावे लागत असे. आता जालन्यातच ही बाजारपेठ सुरू झाली आहे. जालन्यातील या बाजारपेठेत गेल्या वर्षभरात साडेतीन कोटींची  उलाढाल झाली आहे. 

कमी पाण्यावर हमखास उत्पादन देणारी शेती म्हणून रेशीम शेतीकडे पाहिले जाते. यासाठी जालन्यातील कृषी विज्ञान केंद्र तसेच सरकारच्या रेशीम विकास विभागाने भगीरथ प्रयत्न केले. त्याचे चांगले परिणाम आज दहा वर्षांनंतर दिसून येत आहेत.  महाराष्ट्रात रेशीम कोषाचे उत्पादन गेल्यावर्षीच्या तुलनेत २२८० मेट्रीक टनांवरून थेट साडेतीन हजार मेट्रीक टनापर्यंत वाढले आहे. एकीकडे सर्व पिकांची उत्पादकता घसरत असतांना रेशीम शेती मात्र, शेतकऱ्यांना हक्काचा आर्थिक स्रोत निर्माण करून देत आहे. 

जालन्यात बाजार समितीने वर्षभरापूर्वी  २१ एप्रिल रोजी प्रायोगिक तत्त्वावर रेशीम कोष खरेदीची बाजारपेठ सुरू केली.  या वर्षभरात साडेतीन कोटींची उलाढाल झाली आहे.  जालन्यात कायमस्वरूपी रेशीमकोष खरेदीसाठी ६ कोटी २८ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला असून, त्याचे लवकरच टेंडर काढण्यात येणार आहे.

औरंगाबादेतही होणार केंद्रजालन्याप्रमाणेच औरंगाबादेतही २५ एकर जागेत अंडीपुंज निर्मिती केंद्र स्थापनेचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे. त्यासाठी २७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. आचारसंहिता संपताच त्याला मंजूरी मिळेल, अशी माहिती  रेशीम उपसंचालक दिलीप हाके यांनी दिली. 

धागा निर्मिती केंद्रही सुरू रेशीम कोषापासून धागा निर्मिती केंद्रही जालन्यात सुरू झाल्याने शेतकऱ्यांना मोठा लाभ झाला आहे. म्हणजेच कच्चा माल उत्पादन केल्यावर तो खरेदी करण्यासाठी जालन्यात हक्काची बाजारपेठ निर्माण झाली आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीMarketबाजारJalanaजालनाdroughtदुष्काळ