शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

फळबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:18 IST

अंबड तालुक्यातील महाकाळा, चुर्मापुरी परिसरात पाण्याच्या कमततेमुळे फळबागा वाळून गेल्या आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअंकुशनगर : अंबड तालुक्यातील महाकाळा, चुर्मापुरी परिसरात पाण्याच्या कमततेमुळे फळबागा वाळून गेल्या आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. हातावरील फोडाप्रमाणे जपलेल्या फळबागा डोळ्यासमोर वाळू लागल्याने शेतकरी चिंतेतआहेत.कमी पर्जन्यमानामुळे परिसरा शेतकऱ्यांच्या विहीरींनी मार्च महिन्यातच तळ गाठला यामुळे फळबागा जगविण्यासाठी शेतक-यांची मोठी कसरत करावी लागली. दोन अडीचमहिने कसेतरी बागांना पाणी दिले. मात्र, सध्या मे महिन्यात पाणी संपल्याने शेतक-यांच्या अडचणी वाढल्या आहेत. उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात झाली होती. सध्या मे महिना सुरू असून तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. पाणीपातळी खालावल्याने सिंचनाचा बोजवारा उडाला आहे.वाढते तापमान आणि पाण्याची कमतरता यामुळे फळबागा कोमेजत आहे.अशा परिस्थितीत कृषी विभाग मात्र निद्रास्त असल्याचे निदर्शनास येते आहे. परिसरात फळबागांचे जिवापाड जतन करून भविष्याची स्वप्ने पाहणा-या शेतक-यांना या स्थितीत कृषी विभागाकडून उपाययोजनांचा सल्लाही मिळेनासा झाला आहे. त्यामुळे कृषी विभाग पांढरा हत्ती आहे काय,असा सवाल शेतक-यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.पावसाळ्यात पर्जन्यमान कमी झाल्याने आधीच खरीप हंगामातील पिकांना फटका बसला. वेळेपूर्वीच खरीप हंगामातील कपाशी तसेच इतर पिके काढण्याची वेळ यावर्षी आली. सिंचनाची सुविधा असलेल्या शेतक-यांनी रब्बी पीक घेण्याचा प्रयत्न केला. पण पाण्याची पातळी खालावली असल्याने तसेच भारनियमनच्या अडचणीमुळे शेतकºयांना रब्बी हंगामातही नुकसानीला सामोरे जावे लागले. तरीही शेतक-यांनी न खचता शेतातील कामे सुरू ठेवली.अखेर शेतक-याकडे लिंबू, मोसंबी, संत्रा,पपई, केळी आदींच्या फळबागा पाण्याअभावी नष्ट होत आहेत.उन्हाची तीव्रता वाढत असल्याने फळबागा जगविण्यासाठी शेतक-यांची धडपड सुरू झाली आहे. शेतक-यांना फळबागांना पाणी देतांना अनेक अडचणी येत आहेत. यावर उपाय म्हणून अनेक शेतकरी आहे त्या फळबागांच्या झाडांच्या मुळाशी पालापाचोळा टाकून पाण्याची धूप थांबवत आहेत.

टॅग्स :agricultureशेतीfruitsफळेdroughtदुष्काळFarmerशेतकरी