शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

फळबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:18 IST

अंबड तालुक्यातील महाकाळा, चुर्मापुरी परिसरात पाण्याच्या कमततेमुळे फळबागा वाळून गेल्या आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअंकुशनगर : अंबड तालुक्यातील महाकाळा, चुर्मापुरी परिसरात पाण्याच्या कमततेमुळे फळबागा वाळून गेल्या आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. हातावरील फोडाप्रमाणे जपलेल्या फळबागा डोळ्यासमोर वाळू लागल्याने शेतकरी चिंतेतआहेत.कमी पर्जन्यमानामुळे परिसरा शेतकऱ्यांच्या विहीरींनी मार्च महिन्यातच तळ गाठला यामुळे फळबागा जगविण्यासाठी शेतक-यांची मोठी कसरत करावी लागली. दोन अडीचमहिने कसेतरी बागांना पाणी दिले. मात्र, सध्या मे महिन्यात पाणी संपल्याने शेतक-यांच्या अडचणी वाढल्या आहेत. उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात झाली होती. सध्या मे महिना सुरू असून तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. पाणीपातळी खालावल्याने सिंचनाचा बोजवारा उडाला आहे.वाढते तापमान आणि पाण्याची कमतरता यामुळे फळबागा कोमेजत आहे.अशा परिस्थितीत कृषी विभाग मात्र निद्रास्त असल्याचे निदर्शनास येते आहे. परिसरात फळबागांचे जिवापाड जतन करून भविष्याची स्वप्ने पाहणा-या शेतक-यांना या स्थितीत कृषी विभागाकडून उपाययोजनांचा सल्लाही मिळेनासा झाला आहे. त्यामुळे कृषी विभाग पांढरा हत्ती आहे काय,असा सवाल शेतक-यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.पावसाळ्यात पर्जन्यमान कमी झाल्याने आधीच खरीप हंगामातील पिकांना फटका बसला. वेळेपूर्वीच खरीप हंगामातील कपाशी तसेच इतर पिके काढण्याची वेळ यावर्षी आली. सिंचनाची सुविधा असलेल्या शेतक-यांनी रब्बी पीक घेण्याचा प्रयत्न केला. पण पाण्याची पातळी खालावली असल्याने तसेच भारनियमनच्या अडचणीमुळे शेतकºयांना रब्बी हंगामातही नुकसानीला सामोरे जावे लागले. तरीही शेतक-यांनी न खचता शेतातील कामे सुरू ठेवली.अखेर शेतक-याकडे लिंबू, मोसंबी, संत्रा,पपई, केळी आदींच्या फळबागा पाण्याअभावी नष्ट होत आहेत.उन्हाची तीव्रता वाढत असल्याने फळबागा जगविण्यासाठी शेतक-यांची धडपड सुरू झाली आहे. शेतक-यांना फळबागांना पाणी देतांना अनेक अडचणी येत आहेत. यावर उपाय म्हणून अनेक शेतकरी आहे त्या फळबागांच्या झाडांच्या मुळाशी पालापाचोळा टाकून पाण्याची धूप थांबवत आहेत.

टॅग्स :agricultureशेतीfruitsफळेdroughtदुष्काळFarmerशेतकरी