शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

नैसर्गिक शेती हाच शेतकरी आत्महत्यांवरील रामबाण उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2019 12:49 AM

शेतकरी आत्महत्या वाढण्यामागे आर्थिक हतबलता हे कारण आहे, परंतु यावर उपाय असून, तो थोडा संयमी उपाय म्हणजेच नैसर्गिक शेती हाच असल्याचा दावा झिरो बजेट शेतीचे प्रणेते पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतकरी आत्महत्या वाढण्यामागे आर्थिक हतबलता हे कारण आहे, परंतु यावर उपाय असून, तो थोडा संयमी उपाय म्हणजेच नैसर्गिक शेती हाच असल्याचा दावा झिरो बजेट शेतीचे प्रणेते पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी केला. ते रविवारी जालना दौऱ्यावर आले होते. त्यांनी जालना तालुक्यातील सामनगाव येथे शिवारफेरी करून, मोसंबी बागांची पाहणी केली.या वेळी पत्रकारांशी बोलताना पाळेकर म्हणाले की, स्वामी नाथन आयोगाने ज्या शिफारशी केल्या आहेत, त्या देणे सरकारला परवडत नाही, त्यातच ज्यावेळी शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेत येतो, त्यावेळी आयात-निर्यातीचे धोरण बदलते. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेतील भाव गडगडतात आणि शेतकऱ्यांच्या श्रमाला कवडीमोल किंमत मिळते. तसेच रासायनिक आणि सेंद्रिय शेती करताना जो खर्च येतो, तो न परवडणारा असतो, आणि त्यातूनच मग शेतकºयांवर बँकांचे कर्ज वाढते. ते न फेडता आल्याने शेतकरी हतबल होऊन जीवन संपवतो. त्यामुळे सरकारने कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती करावी, परंतु, ही कर्जमुक्ती सरकारच्या भरवशावर शक्य होणार नसून, त्यासाठी नैसर्गिक शेती हाच एक सक्षम पर्याय असल्याचे ते म्हणाले. पाळेकर यांनी सारवाडी येथील बनवारी यांच्या शेतीलाही भेट देऊन पाहणी केल्याचे सांगितले.नैसर्गिक शेतीत अत्यल्प खर्च येत असून, ती पर्यावरणपूरक आहे. भारतात जवळपास सात लाख शेतकरी हे आता नैसर्गिक शेतीकडे वळल्याची माहिती पाळेकर यांनी दिली. या शेतीला पाणी आणि वीजही कमी लागत असून, रासायनिक निविष्ठांचा येथे प्रश्नच येत नाही, या शेतीतून जे उत्पादन निघते, ते देखील कसदार असते. या शेती उत्पादनला आजच्या बाजारपेठेत चक्क दीडपट भाव मिळत असल्याने अनेक शेतकरी या शेतीकडे वळल्याचे ते म्हणाले. त्यांनी रविवारी सामनगाव येथील पूर्णत: नैसर्गिक शेतीच्या निकषनुसार मोसंबीची बाग दुष्काळातही मोठ्या हिंमतीने जगवल्याचे त्यांनी कौतुक केले. या शिवारफेरीत त्यांच्या सोबत जवळपास ४०० शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी दीपक बनवारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रfarmer suicideशेतकरी आत्महत्या