शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
3
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
4
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
5
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
6
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
7
खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...
8
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!
9
Janmashtami 2025: बाळाला कृष्णाचे नाव ठेवायचंय? ही घ्या १०८ नावांची यादी; अगदी मुलींचीह!
10
HDFC-ICICI बँकेच्या शेअर्समुळे बाजार गडगडला! पण, 'या' क्षेत्राने दिली साथ; कशात झाली वाढ?
11
माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण
12
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
13
शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!
14
१९ वर्षे असते शनि महादशा, ‘या’ राशींना मिळतो अपार पैसा, भाग्योदय; भरभराट, भरघोस लाभच लाभ!
15
धक्कादायक! लोकोपायलटच्या जाग्यावर तिसराच व्यक्ती बसला, मोठा गोंधळ उडाला, अनेकांचा जीव धोक्यात; व्हिडीओ व्हायरल
16
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
17
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
18
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
19
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
20
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?

शेतकऱ्यांची चिंता संपता संपेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 00:42 IST

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीत पाहिजे तेवढे उत्पन्न मिळत नसल्याने शेतकरी आजही चिंतेत आहे. जिल्ह्यात २०१८ यावर्षी ३ लाख २९ हजार शेतकरी कुटुंबियांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात ३३९ शेतकरी तणावग्रस्त असल्याचे समोर आले आहे. जिल्हा रुग्णालयातील प्रेरणा प्रकल्पांतर्गत केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब उघड झाली आहे.

ठळक मुद्देप्रेरणा प्रकल्पाचे सर्वेक्षण : समुपदेशातून आणले मृत्यूच्या दारातून परत

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीत पाहिजे तेवढे उत्पन्न मिळत नसल्याने शेतकरी आजही चिंतेत आहे. जिल्ह्यात २०१८ यावर्षी ३ लाख २९ हजार शेतकरी कुटुंबियांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात ३३९ शेतकरी तणावग्रस्त असल्याचे समोर आले आहे. जिल्हा रुग्णालयातील प्रेरणा प्रकल्पांतर्गत केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब उघड झाली आहे.शेतकरी आत्महत्येचे वाढते प्रमाण लक्षात घेता शासनाने शेतकरी आरोग्य सेवा कार्यक्रमांतर्गत विदर्भ व मराठावाडा विभागाच्या १४ जिल्ह्यांतील शेतकरी कुटुंबांना आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासंर्दभात प्रेरणा प्रकल्प सुरु केला. याची माहिती देण्याची जबाबदारी आशा स्वयंसेविकांवर सोपविलेली आहे. शासन निर्णयानुसार जालना जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालये व जिल्हा रुग्णालयांतर्गत नोव्हेंबर २०१५ पासून हा कार्यक्रम राबविण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला कासवगतीने सुरु झालेल्या कार्यक्रमात सद्य: स्थितीत उत्कृष्ट सेवा बजावणे सुरु केले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली दीपाली मुळे, नितीन पवार, मनोविकृती तज्ञ डॉ. सदीप लहाने, चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञ महेंद्र बोबडे, स्वाती जाधव हे या प्रकल्पांतर्गत शेतकºयांना समुपदेशन करुन आत्महत्येपासून थांबविण्याचे प्रयत्न करीत आहेत. या उपक्रमाचे फलित झाल्याचे दिसत आहे.नऊ महिन्यात ६२ शेतकºयांच्या आत्महत्याजिल्ह्याभरात मागील ९ महिन्यांमध्ये ६२ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहे. यात जुन महिन्यात सर्वाधिक १३ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहे. शेतकºयांनी नैराश्य, तणाव, बिकट आर्थिक परिस्थिती अर्थिक परिस्थिती, नापिकी यासारख्या विविध कारणांमुळे जीवन संपविल्याचे समोर आले आहे.अशी करतात जनजागृतीशेतकºयांच्या आत्महत्या रोखण्यासाठी दरवर्षी जागतिक आत्महत्या दिनी सप्ताह राबविण्यात येतो. आशा मार्फत जनजागृती करण्यात येते. विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन शेतकºयांना याची माहिती दिली जाते. त्याचबरोबर आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुंटुबांना भेटी दिल्या जातात.अशी होते तपासणीआशा स्वयंसेविका शेतकºयाच्या घरी जाऊन सर्वेक्षण करतात. जे शेतकरी तणावग्रस्त आहेत. अशांना टोल फ्री क्रमाकांवर समुपदेशन केले जाते. त्यानंतर प्राथमिक रुग्णालय, ग्रामीण, उप जिल्हा व शेवटी जिल्हा रुग्णालयात उपचार केले जातात. त्यानंतर सदरील शेतकºयाला तणावग्रस्त घोषित करुन त्यावर आवश्यक ते उपचार करुन त्याचे मन परिवर्तन केले जाते.प्रत्येक सहा महिन्याला होते सर्वेक्षणप्रेरणा प्रकल्पांतर्गत प्रत्येक सहा महिन्याला हे सर्वेक्षण होते. जुलैपर्यत झालेल्या सर्वेक्षणात ३ लाख २९ हजार कुंटुबियांना भेटी दिल्या. यामध्ये सौम्य -२३८, मध्यम- ६२, तर तीव्र ६ शेतकरी तणाव खाली असल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :JalanaजालनाFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र