शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची चिंता संपता संपेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 00:42 IST

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीत पाहिजे तेवढे उत्पन्न मिळत नसल्याने शेतकरी आजही चिंतेत आहे. जिल्ह्यात २०१८ यावर्षी ३ लाख २९ हजार शेतकरी कुटुंबियांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात ३३९ शेतकरी तणावग्रस्त असल्याचे समोर आले आहे. जिल्हा रुग्णालयातील प्रेरणा प्रकल्पांतर्गत केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब उघड झाली आहे.

ठळक मुद्देप्रेरणा प्रकल्पाचे सर्वेक्षण : समुपदेशातून आणले मृत्यूच्या दारातून परत

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीत पाहिजे तेवढे उत्पन्न मिळत नसल्याने शेतकरी आजही चिंतेत आहे. जिल्ह्यात २०१८ यावर्षी ३ लाख २९ हजार शेतकरी कुटुंबियांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात ३३९ शेतकरी तणावग्रस्त असल्याचे समोर आले आहे. जिल्हा रुग्णालयातील प्रेरणा प्रकल्पांतर्गत केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब उघड झाली आहे.शेतकरी आत्महत्येचे वाढते प्रमाण लक्षात घेता शासनाने शेतकरी आरोग्य सेवा कार्यक्रमांतर्गत विदर्भ व मराठावाडा विभागाच्या १४ जिल्ह्यांतील शेतकरी कुटुंबांना आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासंर्दभात प्रेरणा प्रकल्प सुरु केला. याची माहिती देण्याची जबाबदारी आशा स्वयंसेविकांवर सोपविलेली आहे. शासन निर्णयानुसार जालना जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालये व जिल्हा रुग्णालयांतर्गत नोव्हेंबर २०१५ पासून हा कार्यक्रम राबविण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला कासवगतीने सुरु झालेल्या कार्यक्रमात सद्य: स्थितीत उत्कृष्ट सेवा बजावणे सुरु केले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली दीपाली मुळे, नितीन पवार, मनोविकृती तज्ञ डॉ. सदीप लहाने, चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञ महेंद्र बोबडे, स्वाती जाधव हे या प्रकल्पांतर्गत शेतकºयांना समुपदेशन करुन आत्महत्येपासून थांबविण्याचे प्रयत्न करीत आहेत. या उपक्रमाचे फलित झाल्याचे दिसत आहे.नऊ महिन्यात ६२ शेतकºयांच्या आत्महत्याजिल्ह्याभरात मागील ९ महिन्यांमध्ये ६२ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहे. यात जुन महिन्यात सर्वाधिक १३ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहे. शेतकºयांनी नैराश्य, तणाव, बिकट आर्थिक परिस्थिती अर्थिक परिस्थिती, नापिकी यासारख्या विविध कारणांमुळे जीवन संपविल्याचे समोर आले आहे.अशी करतात जनजागृतीशेतकºयांच्या आत्महत्या रोखण्यासाठी दरवर्षी जागतिक आत्महत्या दिनी सप्ताह राबविण्यात येतो. आशा मार्फत जनजागृती करण्यात येते. विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन शेतकºयांना याची माहिती दिली जाते. त्याचबरोबर आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुंटुबांना भेटी दिल्या जातात.अशी होते तपासणीआशा स्वयंसेविका शेतकºयाच्या घरी जाऊन सर्वेक्षण करतात. जे शेतकरी तणावग्रस्त आहेत. अशांना टोल फ्री क्रमाकांवर समुपदेशन केले जाते. त्यानंतर प्राथमिक रुग्णालय, ग्रामीण, उप जिल्हा व शेवटी जिल्हा रुग्णालयात उपचार केले जातात. त्यानंतर सदरील शेतकºयाला तणावग्रस्त घोषित करुन त्यावर आवश्यक ते उपचार करुन त्याचे मन परिवर्तन केले जाते.प्रत्येक सहा महिन्याला होते सर्वेक्षणप्रेरणा प्रकल्पांतर्गत प्रत्येक सहा महिन्याला हे सर्वेक्षण होते. जुलैपर्यत झालेल्या सर्वेक्षणात ३ लाख २९ हजार कुंटुबियांना भेटी दिल्या. यामध्ये सौम्य -२३८, मध्यम- ६२, तर तीव्र ६ शेतकरी तणाव खाली असल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :JalanaजालनाFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र