शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

शेतकऱ्यांची चिंता संपता संपेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 00:42 IST

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीत पाहिजे तेवढे उत्पन्न मिळत नसल्याने शेतकरी आजही चिंतेत आहे. जिल्ह्यात २०१८ यावर्षी ३ लाख २९ हजार शेतकरी कुटुंबियांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात ३३९ शेतकरी तणावग्रस्त असल्याचे समोर आले आहे. जिल्हा रुग्णालयातील प्रेरणा प्रकल्पांतर्गत केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब उघड झाली आहे.

ठळक मुद्देप्रेरणा प्रकल्पाचे सर्वेक्षण : समुपदेशातून आणले मृत्यूच्या दारातून परत

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीत पाहिजे तेवढे उत्पन्न मिळत नसल्याने शेतकरी आजही चिंतेत आहे. जिल्ह्यात २०१८ यावर्षी ३ लाख २९ हजार शेतकरी कुटुंबियांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात ३३९ शेतकरी तणावग्रस्त असल्याचे समोर आले आहे. जिल्हा रुग्णालयातील प्रेरणा प्रकल्पांतर्गत केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब उघड झाली आहे.शेतकरी आत्महत्येचे वाढते प्रमाण लक्षात घेता शासनाने शेतकरी आरोग्य सेवा कार्यक्रमांतर्गत विदर्भ व मराठावाडा विभागाच्या १४ जिल्ह्यांतील शेतकरी कुटुंबांना आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासंर्दभात प्रेरणा प्रकल्प सुरु केला. याची माहिती देण्याची जबाबदारी आशा स्वयंसेविकांवर सोपविलेली आहे. शासन निर्णयानुसार जालना जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालये व जिल्हा रुग्णालयांतर्गत नोव्हेंबर २०१५ पासून हा कार्यक्रम राबविण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला कासवगतीने सुरु झालेल्या कार्यक्रमात सद्य: स्थितीत उत्कृष्ट सेवा बजावणे सुरु केले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली दीपाली मुळे, नितीन पवार, मनोविकृती तज्ञ डॉ. सदीप लहाने, चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञ महेंद्र बोबडे, स्वाती जाधव हे या प्रकल्पांतर्गत शेतकºयांना समुपदेशन करुन आत्महत्येपासून थांबविण्याचे प्रयत्न करीत आहेत. या उपक्रमाचे फलित झाल्याचे दिसत आहे.नऊ महिन्यात ६२ शेतकºयांच्या आत्महत्याजिल्ह्याभरात मागील ९ महिन्यांमध्ये ६२ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहे. यात जुन महिन्यात सर्वाधिक १३ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहे. शेतकºयांनी नैराश्य, तणाव, बिकट आर्थिक परिस्थिती अर्थिक परिस्थिती, नापिकी यासारख्या विविध कारणांमुळे जीवन संपविल्याचे समोर आले आहे.अशी करतात जनजागृतीशेतकºयांच्या आत्महत्या रोखण्यासाठी दरवर्षी जागतिक आत्महत्या दिनी सप्ताह राबविण्यात येतो. आशा मार्फत जनजागृती करण्यात येते. विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन शेतकºयांना याची माहिती दिली जाते. त्याचबरोबर आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुंटुबांना भेटी दिल्या जातात.अशी होते तपासणीआशा स्वयंसेविका शेतकºयाच्या घरी जाऊन सर्वेक्षण करतात. जे शेतकरी तणावग्रस्त आहेत. अशांना टोल फ्री क्रमाकांवर समुपदेशन केले जाते. त्यानंतर प्राथमिक रुग्णालय, ग्रामीण, उप जिल्हा व शेवटी जिल्हा रुग्णालयात उपचार केले जातात. त्यानंतर सदरील शेतकºयाला तणावग्रस्त घोषित करुन त्यावर आवश्यक ते उपचार करुन त्याचे मन परिवर्तन केले जाते.प्रत्येक सहा महिन्याला होते सर्वेक्षणप्रेरणा प्रकल्पांतर्गत प्रत्येक सहा महिन्याला हे सर्वेक्षण होते. जुलैपर्यत झालेल्या सर्वेक्षणात ३ लाख २९ हजार कुंटुबियांना भेटी दिल्या. यामध्ये सौम्य -२३८, मध्यम- ६२, तर तीव्र ६ शेतकरी तणाव खाली असल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :JalanaजालनाFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र