शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अतिवृष्टीत घर कोसळल्याने ऐन दिवाळीत शेतकऱ्याचा संसार उघड्यावर, दहा शेळ्याही दगावल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2022 16:02 IST

संततधार पावसाने मातीचे घर कोसळले. त्यात घरासमोर बांधलेल्या दहा शेळ्यांच्या अंगावर घराची भिंत पडल्याने त्या गतप्राण झाल्या.

- गणेश पंडितकेदारखेडा (जालना) : भोकरदन तालुक्यातील कोदोली येथील एका शेतकऱ्याचे शनिवारी सकाळी अतिवृष्टीमुळे घर कोसळले. या घटनेत त्यांच्या दहा शेळ्या दबून जागीच ठार झाल्या. सुखदेव त्रिंबक गिरणारे असे आपत्तीग्रस्त शेतकऱ्याचे नाव असून, ऐन दिवाळीच्या दिवशी त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. 

केदारखेडा परिसरात गेल्या दोन, दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. संततधार पावसात पशुपालक सुखदेव गिरणारे यांचे मातीचे घर कोसळले. घरासमोर बांधलेल्या दहा शेळ्यांच्या अंगावर घराची भिंत पडल्याने त्या गतप्राण झाल्या. ऐन दिवाळीच्या तोंडावर निवारा आणि पशुधन हातचे गेल्याने त्यांच्यावर मोठे संकट कोसळले. यात त्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. या घटनेचा तलाठी पी.बी.समिंद्रे यांनी पंचनामा केला असून वरिष्ठांना नुकसानीचा अहवाल सादर केला आहे.  

आपत्तीग्रस्त शेतकरी गिरणारे हे अल्पभूधारक आहेत. त्यांनी जोडधंदा म्हणून शेळीपालन व्यवसाय सुरू केलेला आहे. अतिवृष्टीत शेतीपिकांचे नुकसान झाल्यामुळे ते आधीच खचलेले असताना त्यांचे पशुधनही अतिवृष्टीमुळे हिरावून नेले. ऐन दिवाळीच्या दिवशी शेतकऱ्यांचा सर्व संसार मातीत मिसळल्याने ते हवालदिल झाले आहे. ते राहत असलेल्या घरावर जुन्या गढीची दरड कोसळल्याने हा अपघात झाला. यात घरातील संसारोपयोगी साहित्य व धान्याचे नुकसान झाले. घरापुढे बांधलेल्या दहा शेळ्या ढिगाऱ्याखाली दबल्याने त्यांचा मृत्यू झाला. गावकऱ्यांनी ३ शेळ्या उकरून काढल्या. परंतु, त्यांनीही प्राण सोडला होता. या घटनेत त्यांचे अंदाजे ३ लक्ष रुपयाचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच माजी जि.प. सदस्य डॉ. चंद्रकांत साबळे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आपत्तीग्रस्त कुटुंबाची भेट घेऊन त्यांना धीर दिला. तहसीलदारांना या घटनेची माहिती दिली. गिरणारे कुटुंबाना शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

अनेकांनी दिला मदतीचा हात दिवाळीच्या तोंडावर गिरणारे कुटुंबावर आलेले संकट लक्षात घेऊन डॉ. चंद्रकांत साबळे यांनी किराणा साहित्य व पाच हजारांची मदत केली. गावातील भगवान गिरणारे यांनी ३ हजार रुपये, ग्रा.पं. सदस्य संजय गिरणारे व चेअरमन गणेश गिरणारे यांनी प्रत्येक १ हजार रुपये, रामेश्वर गिरणारे व विनोद शिवाजी गिरणारे यांनी प्रत्येक ५०० रुपये अशी एकूण ११ हजारांची मदत गावकऱ्यांनी गिरणारे कुटुंबाना केली आहे.

टॅग्स :RainपाऊसJalanaजालनाFarmerशेतकरी