शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

Drought In Marathwada : उभे पीक उपटून फेकले; आता रबीचीही आशा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 19:41 IST

दुष्काळवाडा :  यंदा पाऊसच न झाल्याने तालुक्यातील बरंजळा साबळे परिसराला दुष्काळाचा मोठा फटका बसला आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांना उभे पीक उपटून टाकावे लागले.

- फकिरा देशमुख, बरंजळा साबळे, ता. भोकरदन, जि. जालना

जालना जिल्ह्यातील खरिपाचा तालुका म्हणून भोकरदन तालुक्याची ओळख. या तालुक्यातील ६० टक्के शेतकरी हे खरिपाच्या पिकांवर अवलंबून आहेत. यंदा पाऊसच न झाल्याने तालुक्यातील बरंजळा साबळे परिसराला दुष्काळाचा मोठा फटका बसला आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांना उभे पीक उपटून टाकावे लागले. परतीचा पाऊस न झाल्याने रबीच्याही आशा मावळल्या आहेत.  

‘लोकमत’ प्रतिनिधीने बरंजळा साबळे या गावाची पाहणी केली तेव्हा ही दुष्काळस्थिती समोर आली. या गावाची पैसेवारी ४६ टक्के आली आहे. यामुळे रबीचे पीक येईल, याची अजिबात शक्यता नाही. तालुक्याची पावसाची अपेक्षित सरासरी ६८८़१२ मि़मी़ आहे. मात्र, या पावसाळ्यात केवळ ३६५़७५ मि़ मी़ एवढाच पाऊस झाला. त्यात बरंजळा साबळे परिसरात तर आणखी कमी झाला. शेतकऱ्यांनी विहिरीच्या पाण्यावर कपाशी, सोयाबीन पिकांचे संगोपन केले. मात्र, ऐन दाणे भरण्याच्या वेळेत पाऊस न झाल्याने सोयाबीनच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. पन्नास टक्क्यांनी उत्पन्न घटले. त्यातच विहिरींचे पाणी तळाला गेल्याने कपाशी पिकाने माना टाकल्या. कपाशीचे उत्पन्नच हाती लागणार नसल्याने  बहुतांश शेतकऱ्यांनी कपाशीचे पीक उपटून शेत मोकळे केले. मात्र, परतीचा पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांच्या रबीच्या आशा मावळल्या आहेत. यामुळे संपूर्ण गावावर दुष्काळाचे संकट आहे. शेतीला लावलेला खर्चही निघाला नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. 

मक्याचा झाला चारापावसाअभावी मका पिकाला कणसे लागले नाही. यामुळे शेतकरी त्याचा जनावरांसाठी चारा म्हणून उपयोग करत आहे.

टँकर बंद होईनातालुक्यात सतत तीन वर्षांपासून म्हणावा तसा पाऊस न झाल्याने  अनेक गावांत टँकर सुरू आहेत. उन्हाळ्यात यात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, जनावरांसाठी पाणी व चाऱ्याचा प्रश्न येत्या काळात गंभीर बनणार आहे.  

रबीच्या पेरणीला फटका

यावर्षी तालुक्यात पन्नास टक्के पावसाची नोंद आहे. यामुळे खरिपाच्या उत्पन्नात ५० टक्के घट झाली आहे. याचा फटका रबीच्या पेरणीला बसण्याची शक्यता आहे. तालुक्यातील बहुतांश प्रकल्प कोरडेठाक असल्याने पाणीटंचाईचे संकट आहे.  - डी.बी. व्यवहारे, तालुका कृषी अधिकारी

बळीराजा काय म्हणतो? 

- परिसरावर दोन वर्षांपासून निसर्ग कोपलेला आहे. खरीप पिकांसाठी केलेला खर्चसुद्धा निघाला नाही. उलट कपाशी उपटून टाकण्यासाठी मकाचा चारा व सोयाबीन जमा करण्यासाठी सुद्धा घरातून पैसे टाकावे लागले. खरीप तर गेलेच पावसाअभावी आम्ही रबीच्या आशा सुद्धा सोडल्या आहेत.  - नारायण साबळे सरपंच

- चार एकरात कपाशीची लागवड केली आहे. पावसाअभावी पिकांची वाढच खुंटल्याने कपाशीला बोंडे, फुले आलीच नाही. यामुळे शेतीत लावलेला खर्च वाया गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. - माधवराव गिरनारे

- उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाणीटंचाई व दुष्काळाचे चटके बसत होते. मात्र, या वर्षी पावसाळ्यातच दुष्काळाचे चटके बसू लागले आहे. पुरेशा पावसाअभावी पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. आतापासून पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जनावरांना पाण्यासाठी तीन किलोमीटरपर्यंत घेऊन जावे लागत आहे.  - पुंंजाराम साबळे

 - आतापर्यंत अनेक दुष्काळाचा सामना केला आहे. १९७२ च्या दुष्काळात धान्याचा तुटवडा होता. मात्र, पिण्यासाठी पाणी होते. यावर्षी अन्नधान्य आहे, मात्र पिण्याच्या पाण्याची कमतरता असल्याने परिस्थिती गंभीर आहे.  - माणिकराव गिरनारे 

- सध्या पाते फुलावर आलेल्या कपाशीला पावसाची आवश्यकता असताना पावसाने दडी दिल्याने कपाशीचे मोठे नुकसान झाले. यामुळे चार एकरातील कपाशीचे पीक उपटून टाकावे लागले. पाऊस पडल्यावर रबीमध्ये शाळू ज्वारीचे पीक घेऊ असा विचार होता. मात्र, परतीच्या पावसाने पाठ फिरविली.- त्र्यंबकराव साबळे

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाAgriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेती