शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

दुष्काळातही दुधाची गंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 00:58 IST

दुष्काळी स्थितीतही गेल्या दोन महिन्यात दुधाचे संकलन वाढल्याने एक प्रकारे पशुपालकांना दिलासा मिळणारी ही बाब असल्याचे सांगण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात सध्या दुष्काळामुळेशेतकरी हैराण आहेत. या दुष्काळी स्थितीतही गेल्या दोन महिन्यात दुधाचे संकलन वाढल्याने एक प्रकारे पशुपालकांना दिलासा मिळणारी ही बाब असल्याचे सांगण्यात आले. आज जरी दुधाचे संकलन चांगले असले तरी, येत्या दोन महिन्यात चाराटंचाईमुळे हे संकलन घटणार असल्याची चिंता व्यक्त होत आहे.जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे दुष्काळात मिळणाऱ्या सर्व सवलती आता शेतकºयांना मिळत आहेत. यंदा जिल्ह्यात पाणीटंचाईने देखील रौद्ररूप धारण केले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. असे असतानाच सध्या गायी आणि म्हशीच्या दुधाचे संकलन वाढल्याने पशुपालकांना दिलासा मिळाला आहे.जालना येथील जुन्या औद्योगिक वसाहतीत दुधावर प्रक्रिया करणारा प्रकल्प आहे. त्यात सध्या केवळ १० हजार लिटर दुधावर प्रक्रिया करून हे दूध सध्या अहमदनगर, नाशिक तसेच मुंबईला पाठविले जाते. माहोरा, देऊळगावराजा येथून आलेल्या दुधावर येथे प्रक्रिया केली जात आहे. दरम्यान, या प्रक्रिया केंद्राची क्षमता वाढविण्यासाठी दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी नवीन प्रस्ताव तयार केला असून, या दूध प्रक्रिया केंद्रात दूध संकलनाची क्षमता ही तीस हजार लिटरवर नेण्यात येणार आहे. जालना जिल्ह्यात बाहेरच्या जिल्ह्यातून हजारो लिटर दूध येते.या दूधाची नियमितपणे तपासणी होत नसल्याने त्यातील तथ्य समोर येत नाही. त्यामुळे याची अचानक तपासणी झाल्यास बराच मोठा गोंधळ पुढे येऊ शकतो. परंतु, यासाठी यंत्रणेने पुढाकार घेण्याची गरज वर्तविण्यात येत आहे. परंतु, हे होत नसल्याचे वास्तव आहे.जालना : ३६ हजार दुधाचे संकलनजालना जिल्ह्यात सध्या भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यातील दूध संकलनावर काहीअंशी परिणाम झाला आहे. जालना जिल्ह्यात एक खासगी अर्थात समर्थ दूध संघ असून, दूध संकलन करणा-या संस्थाची संख्या ही ८४ असल्याची माहिती देण्यात आली. आहे. मध्यंतरी जालना जिल्ह्यातील दूध संकलन वाढावे म्हणून दूग्ध विकास विभागाला भगिरथ प्रयत्न करावे लागत होते. मात्र आता ऐन दुष्काळात थेट ३६ हजार ४०० लिटर दूध संकलन झाले आहे.जालना जिल्ह्यातील शेतक-यांनी शेती सोबतच दूधाचा जोडधंदा केल्याने संकलन वाढले आहे. शेतकºयांना आता दूध व्यवसायाचे समीकरण समजले असून, केवळ दुधच नव्हे, तर त्यापासून खवा निर्मितीचा व्यवसायकही चांगलाच तेजीत आहे. आज खव्याला मोठी मागणी असून, खव्याचे आजचे भाव हे सरासरी २०० रूपयांपेक्षा जास्त असल्याने त्यातून ब-यापैकी पैसे मिळत असल्याचे शेतक-यांचे म्हणणे आहे.- एस.एन. आदमाने,जिल्हा दुग्ध विकास अधिकारी

टॅग्स :Milk Supplyदूध पुरवठाFarmerशेतकरीdroughtदुष्काळ