शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

दुष्काळातही दुधाची गंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 00:58 IST

दुष्काळी स्थितीतही गेल्या दोन महिन्यात दुधाचे संकलन वाढल्याने एक प्रकारे पशुपालकांना दिलासा मिळणारी ही बाब असल्याचे सांगण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात सध्या दुष्काळामुळेशेतकरी हैराण आहेत. या दुष्काळी स्थितीतही गेल्या दोन महिन्यात दुधाचे संकलन वाढल्याने एक प्रकारे पशुपालकांना दिलासा मिळणारी ही बाब असल्याचे सांगण्यात आले. आज जरी दुधाचे संकलन चांगले असले तरी, येत्या दोन महिन्यात चाराटंचाईमुळे हे संकलन घटणार असल्याची चिंता व्यक्त होत आहे.जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे दुष्काळात मिळणाऱ्या सर्व सवलती आता शेतकºयांना मिळत आहेत. यंदा जिल्ह्यात पाणीटंचाईने देखील रौद्ररूप धारण केले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. असे असतानाच सध्या गायी आणि म्हशीच्या दुधाचे संकलन वाढल्याने पशुपालकांना दिलासा मिळाला आहे.जालना येथील जुन्या औद्योगिक वसाहतीत दुधावर प्रक्रिया करणारा प्रकल्प आहे. त्यात सध्या केवळ १० हजार लिटर दुधावर प्रक्रिया करून हे दूध सध्या अहमदनगर, नाशिक तसेच मुंबईला पाठविले जाते. माहोरा, देऊळगावराजा येथून आलेल्या दुधावर येथे प्रक्रिया केली जात आहे. दरम्यान, या प्रक्रिया केंद्राची क्षमता वाढविण्यासाठी दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी नवीन प्रस्ताव तयार केला असून, या दूध प्रक्रिया केंद्रात दूध संकलनाची क्षमता ही तीस हजार लिटरवर नेण्यात येणार आहे. जालना जिल्ह्यात बाहेरच्या जिल्ह्यातून हजारो लिटर दूध येते.या दूधाची नियमितपणे तपासणी होत नसल्याने त्यातील तथ्य समोर येत नाही. त्यामुळे याची अचानक तपासणी झाल्यास बराच मोठा गोंधळ पुढे येऊ शकतो. परंतु, यासाठी यंत्रणेने पुढाकार घेण्याची गरज वर्तविण्यात येत आहे. परंतु, हे होत नसल्याचे वास्तव आहे.जालना : ३६ हजार दुधाचे संकलनजालना जिल्ह्यात सध्या भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यातील दूध संकलनावर काहीअंशी परिणाम झाला आहे. जालना जिल्ह्यात एक खासगी अर्थात समर्थ दूध संघ असून, दूध संकलन करणा-या संस्थाची संख्या ही ८४ असल्याची माहिती देण्यात आली. आहे. मध्यंतरी जालना जिल्ह्यातील दूध संकलन वाढावे म्हणून दूग्ध विकास विभागाला भगिरथ प्रयत्न करावे लागत होते. मात्र आता ऐन दुष्काळात थेट ३६ हजार ४०० लिटर दूध संकलन झाले आहे.जालना जिल्ह्यातील शेतक-यांनी शेती सोबतच दूधाचा जोडधंदा केल्याने संकलन वाढले आहे. शेतकºयांना आता दूध व्यवसायाचे समीकरण समजले असून, केवळ दुधच नव्हे, तर त्यापासून खवा निर्मितीचा व्यवसायकही चांगलाच तेजीत आहे. आज खव्याला मोठी मागणी असून, खव्याचे आजचे भाव हे सरासरी २०० रूपयांपेक्षा जास्त असल्याने त्यातून ब-यापैकी पैसे मिळत असल्याचे शेतक-यांचे म्हणणे आहे.- एस.एन. आदमाने,जिल्हा दुग्ध विकास अधिकारी

टॅग्स :Milk Supplyदूध पुरवठाFarmerशेतकरीdroughtदुष्काळ