शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

दुष्काळातही दुधाची गंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 00:58 IST

दुष्काळी स्थितीतही गेल्या दोन महिन्यात दुधाचे संकलन वाढल्याने एक प्रकारे पशुपालकांना दिलासा मिळणारी ही बाब असल्याचे सांगण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात सध्या दुष्काळामुळेशेतकरी हैराण आहेत. या दुष्काळी स्थितीतही गेल्या दोन महिन्यात दुधाचे संकलन वाढल्याने एक प्रकारे पशुपालकांना दिलासा मिळणारी ही बाब असल्याचे सांगण्यात आले. आज जरी दुधाचे संकलन चांगले असले तरी, येत्या दोन महिन्यात चाराटंचाईमुळे हे संकलन घटणार असल्याची चिंता व्यक्त होत आहे.जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे दुष्काळात मिळणाऱ्या सर्व सवलती आता शेतकºयांना मिळत आहेत. यंदा जिल्ह्यात पाणीटंचाईने देखील रौद्ररूप धारण केले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. असे असतानाच सध्या गायी आणि म्हशीच्या दुधाचे संकलन वाढल्याने पशुपालकांना दिलासा मिळाला आहे.जालना येथील जुन्या औद्योगिक वसाहतीत दुधावर प्रक्रिया करणारा प्रकल्प आहे. त्यात सध्या केवळ १० हजार लिटर दुधावर प्रक्रिया करून हे दूध सध्या अहमदनगर, नाशिक तसेच मुंबईला पाठविले जाते. माहोरा, देऊळगावराजा येथून आलेल्या दुधावर येथे प्रक्रिया केली जात आहे. दरम्यान, या प्रक्रिया केंद्राची क्षमता वाढविण्यासाठी दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी नवीन प्रस्ताव तयार केला असून, या दूध प्रक्रिया केंद्रात दूध संकलनाची क्षमता ही तीस हजार लिटरवर नेण्यात येणार आहे. जालना जिल्ह्यात बाहेरच्या जिल्ह्यातून हजारो लिटर दूध येते.या दूधाची नियमितपणे तपासणी होत नसल्याने त्यातील तथ्य समोर येत नाही. त्यामुळे याची अचानक तपासणी झाल्यास बराच मोठा गोंधळ पुढे येऊ शकतो. परंतु, यासाठी यंत्रणेने पुढाकार घेण्याची गरज वर्तविण्यात येत आहे. परंतु, हे होत नसल्याचे वास्तव आहे.जालना : ३६ हजार दुधाचे संकलनजालना जिल्ह्यात सध्या भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यातील दूध संकलनावर काहीअंशी परिणाम झाला आहे. जालना जिल्ह्यात एक खासगी अर्थात समर्थ दूध संघ असून, दूध संकलन करणा-या संस्थाची संख्या ही ८४ असल्याची माहिती देण्यात आली. आहे. मध्यंतरी जालना जिल्ह्यातील दूध संकलन वाढावे म्हणून दूग्ध विकास विभागाला भगिरथ प्रयत्न करावे लागत होते. मात्र आता ऐन दुष्काळात थेट ३६ हजार ४०० लिटर दूध संकलन झाले आहे.जालना जिल्ह्यातील शेतक-यांनी शेती सोबतच दूधाचा जोडधंदा केल्याने संकलन वाढले आहे. शेतकºयांना आता दूध व्यवसायाचे समीकरण समजले असून, केवळ दुधच नव्हे, तर त्यापासून खवा निर्मितीचा व्यवसायकही चांगलाच तेजीत आहे. आज खव्याला मोठी मागणी असून, खव्याचे आजचे भाव हे सरासरी २०० रूपयांपेक्षा जास्त असल्याने त्यातून ब-यापैकी पैसे मिळत असल्याचे शेतक-यांचे म्हणणे आहे.- एस.एन. आदमाने,जिल्हा दुग्ध विकास अधिकारी

टॅग्स :Milk Supplyदूध पुरवठाFarmerशेतकरीdroughtदुष्काळ