शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

शेतकऱ्यांनो, काळजी करू नका, नुकसान भरपाई सरकारच्या छाताडावर बसून घेऊ: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 15:16 IST

मालवण आणि पुणे दौरा आटोपून अंतरवाली सराटीत दाखल झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या परिस्थिती पाहणी करण्याचे आश्वासन दिले आहे.

वडीगोद्री ( जालना): "शेतकऱ्यांची सहनशीलता सरकारने पाहू नये. माझ्या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड वेदना आहेत, त्यांना खूप मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. पण काळजी करू नका, नुकसान भरपाई यांच्या छाताडावर बसून घेणार आहे." असे आश्वासन मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिले. शेतकऱ्यांना दिलासा देताना सांगितले की, "आज जितके शक्य आहे, तितके मी फिरणार आहे. मी राजकारणी नाही की दौरा लिहून घेईन, जे रस्त्यात दिसेल त्या नुकसानीची मी पाहणी करणार आणि शेतकऱ्यांच्या व्यथा मुख्यमंत्र्यांना कळवणार."

मालवण आणि पुणे दौरा आटोपून अंतरवाली सराटीत दाखल झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या परिस्थिती पाहणी करण्याचे आश्वासन दिले आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या प्रचंड नुकसानीची स्वत: पाहणी करून मुख्यमंत्र्यांपर्यंत ते पोहोचवणार, असे जरांगे म्हणाले. त्यांनी अंतरवाली सराटी येतहे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 

जरांगे पाटील यांनी सरकारकडे तातडीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. "निसर्गाने शेतकऱ्यांशी दगा फटका केला आहे, परंतु सरकारने दगा करू नये. सरकारने जर शेतकऱ्यांना वेठीस धरलं, तर आम्ही सरकारचा कार्यक्रम लावल्याशिवाय थांबणार नाही," असे त्यांनी स्पष्ट केले. 

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर बोलताना, जरांगे पाटील म्हणाले, "एसटी कर्मचारी पाठीमागच्या सरकारपासून हाल सोसत आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्येही त्यांच्या समस्या सुटत नाहीत. एसटी कर्मचारी जनतेची सेवा करतो, त्याच्या मागण्या का मान्य होऊ नयेत? त्यालाही संसार आहे, पण सरकार त्याचा संसार डुबवायला लागले आहे."

जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना म्हटले की, "एसटी कर्मचाऱ्यांचा, शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावला नाही, तर सरकारचा कार्यक्रम संपवणार. फडणवीस यांनी आंदोलनांमध्ये पेरलेले लोक आता समस्यांना वाढवण्याचे काम करत आहेत."

शिक्षकांचे प्रश्न, डॉक्टरांचे प्रश्न, मच्छीमारांचा प्रश्न, बारा बलुतेदारांचे प्रश्न अशा विविध मुद्द्यांवर जरांगे पाटील यांनी सरकारला धारेवर धरले. "आता लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक झालीच पाहिजे, नाहीतर हा संघर्ष थांबणार नाही," असे ते म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्यांना सरकारसमोर मांडण्याचे आणि त्यांची तातडीने सोडवणूक न झाल्यास संघर्षाला पुढे नेण्याचे इशारा दिला आहे.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्र