शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

भाजप - शिवसेनेच्या भूलथापांना जुमानू नका- कैलास गोरंट्याल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 12:35 AM

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून द्यावे असे आवाहन काँग्रेसचे माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : भाजप आणि शिवसेना हे दोन्हीही पक्ष जातीयवादी आहेत. त्यांच्या भूलथापांना बळी न पडता मतदारांनी धर्मनिरपेक्षेला प्राधान्य देणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून द्यावे असे आवाहन काँग्रेसचे माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी केले.मंगळवारी जुना जालना भागातील दु:खीनगर येथे सायंकाळी कॉर्नर बैठक पार पडली. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया, माजी सभापती भीमराव डोंगरे, एकबाल पाशा, शाह आलम खान, डॉ. संजय लाखे पाटील, कल्याण दळे, शेख महेमूद, राजेंद्र जाधव, मनकर्णा डांगे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादीच्या अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.यावेळी कैलास गोरंट्याल यांनी दानवे-खोतकर यांच्यातील वाद म्हणजे नुरा कुस्ती होती असे सांगून हा वाद कसा मिटला आणि त्यासाठी कसे ‘अर्थपूर्ण’ व्यवहार झाले, याची माहिती आपल्याकडे असल्याचा दावाही गोरंट्याल यांनी केला. आ. सत्तार यांच्या भूमिकेवरही गोरंट्याल यांनी टीका केली.यावेळी राजाभाऊ देशमुख, डॉ. लाखे पाटील यांनीही विचार व्यक्त केले. विलास औताडे हे प्रामाणिक आणि काँग्रेसशी एकनिष्ठ असणारे नेते आहेत त्यामुळे त्यांना मतदारांनी आगामी काळात संधी द्यावी असे आवाहनही यावेळी करण्यात आले.काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने अहोरात्र परिश्रम घेवून औताडे यांना विजयी करण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमात एकबाल पाशा यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. सूत्रसंचालन शेख महेमूद यांनी केले. यावेळी कल्याण दळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी काँग्रेसचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकjalna-pcजालनाcongressकाँग्रेस