शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
3
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
4
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
5
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
6
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
7
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
8
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
9
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
10
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
11
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
12
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
13
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
14
छत्रपतींच्या किल्ल्यांकडे पाहण्याची नजर आता बदलेल?
15
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
16
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
17
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
18
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
19
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
20
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर

वीजबिलाच्या मुद्द्यावरून पुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:21 IST

जालना : कोरोनाने हैराण झालेल्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या पाठीमागे वीज वितरण कंपनी हात धुवून मागे लागली आहे. जिल्ह्यातील अनेक ...

जालना : कोरोनाने हैराण झालेल्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या पाठीमागे वीज वितरण कंपनी हात धुवून मागे लागली आहे. जिल्ह्यातील अनेक गावांचा विद्युत पुरवठा वीजबिलांच्या मुद्द्यावरून खंडित केल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

कोरोना काळात सर्वत्र लॉकडाऊन होते. यामुळे गावगाडा ठप्प झाला होता. निर्बंध शिथिल झाल्यावर लगेचच उत्पन्नाची साधने मुबलक नसताना वीज वितरण कंपनीने थकबाकी भरण्याचा आग्रह धरला आहे. सध्या शेतीमध्ये पेरणीची वेळ असून, पावसानेही हुलकावणी दिली आहे. अशामध्ये घनसांवगी तालुक्यातील अंतरवाली दाई, भुतेगाव, चापडगाव या गावाचा वीजपुरवठा गेल्या दाेन दिवसांपासून खंडित केला आहे.

असे असताना मार्चमध्येच अंतरवाली दाई येथील शेतकऱ्यांनी एकत्रित येत १ लाख रुपयांची थकबाकी भरली होती. त्यानंतर दोनच महिन्यांनी पुन्हा वीज वितरण कंपनीने वीजबिल भरण्याचा तगादा लावला आहे. यासंदर्भात वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता आम्हाला वीजबिल वसुलीचे निर्देश वरिष्ठ पातळीवरून आहेत. त्यामुळे आमचा नाईलाज असल्याचे सांगण्यात आले. काही शेतकऱ्यांनी आपली व्यथा सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींकडे मांडली, पंरतु यात पाहिजे तेवढे लक्ष न घातल्याने नाराजी व्यक्त होत आहे.