शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बालसभेतून होतोय विद्यार्थ्यांचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 00:08 IST

शिक्षक- पालकांच्या प्रयत्नातून राबविलेले उपक्रम यशस्वी होतात, याची प्रचीती तालुक्यातील गुंडेवाडी जिल्हा परिषद शाळेकडे पाहिल्यानंतर येते

विष्णू वाकडे।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शिक्षक- पालकांच्या प्रयत्नातून राबविलेले उपक्रम यशस्वी होतात, याची प्रचीती तालुक्यातील गुंडेवाडी जिल्हा परिषद शाळेकडे पाहिल्यानंतर येते. विशेषत: शाळेत सुरू असलेल्या बालसभेतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असून, त्यांच्या सामाजिक जाणीवाही प्रगल्भ होत आहेत.जालना शहरापासून केवळ पाच किलोमीटर अंतरावर गुंडेवाडी हे गाव वसलेले आहे. १९५६ साली येथे जिल्हा परिषदेची शाळा सुरू झाली आणि विद्यार्थ्यांना गावातच शिक्षणाची दारे खुली झाली.दहा वर्षापूर्वी क्रमश: पाचवी ते सातवी पर्यंतच्या वर्गांना नव्याने मान्यता मिळाली. तत्कालीन ग्राम शिक्षण समितीने गावाशेजारी असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी शाळेची सुसज्ज इमारत उभी केली. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या शाळेत सद्यस्थितीत १५२ मुले- मुली शिक्षण घेतात. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शासन, प्रशासनस्तरावरून विविध उपक्रम राबविण्यात येतात. मात्र, या उपक्रमाव्यतिरिक्त इतर उपक्रमही शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचाऱ्यांनी राबविले आहेत. विशेषत: हे उपक्रम यशस्वी होण्यासाठी पालकही सतत पुढाकार घेतात.जिल्हा परिषद शाळेतील समस्या सोडविण्यासाठी ग्रामस्थही आग्रेसर असतात. शिक्षक, पालकांच्या पुढाकारातून राबविण्यात येणाºया बालसभा, सांस्कृतिक कार्यक्रम, डिजिटल क्लास आदी विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढत असून, त्यांच्या आत्मविश्वासात कमालीची वाढ होत आहे. शाळेची गुणवत्ता वाढविण्यासह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यातही विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प शिक्षक, पालकांनी केलाआहे.

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षणStudentविद्यार्थीTeacherशिक्षक