शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
6
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
7
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
8
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
9
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
10
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
11
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
12
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
13
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
14
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
15
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
16
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
17
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
18
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
19
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
20
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

जलसंधारण विभागाने फुलवले नंदनवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2019 12:58 AM

दुष्काळावर मात करण्यासाठी जालना येथील मृद व जलसंधारण विभागाने कार्यालय परिसरात विविध जातीचे तब्बल ३७०० रोपे लावून नंदनवन फुलवले आहे

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दुष्काळावर मात करण्यासाठी जालना येथील मृद व जलसंधारण विभागाने कार्यालय परिसरात विविध जातीचे तब्बल ३७०० रोपे लावून नंदनवन फुलवले आहे. या नंदनवनामुळे एरव्ही ओसडा असलेला हा विभाग आता सर्वांनाच आकर्षित करीत आहे.मागील काही वर्षांपासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस झाडांचे प्रमाणही कमी होत असल्याने पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात -हास होत आहे. परिणामी, दरवर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी होत आहे. भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे तीव्र पाणीटंचाई भासत असून, पाण्याच्या शोधासाठी प्रत्येकाला वणवण भटकंती करावी लागत आहे, असे असताना जिल्ह्यात मात्र सर्रासपणे वृक्षतोड सुरु आहे. वृक्षतोड करणाऱ्यांवर कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही.एकीकडे प्रशासनाकडूनच कारवाई केली जात नाही तर दुसरीकडे प्रशासनाचेच अधिकारी वृक्ष लागवडीवर भर देत आहेत. सध्या जालना शहरातील शासकीय रूग्णालयाच्या रस्त्यावर असलेल्या मृद व जलसंधारण विभागाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. जिल्हा जलसंधारण अधिकारी गिरवरसिंग सुसमणी यांच्या संकल्पनेतून कार्यालय परिसरातील ६६६ चौरस मीटरवर ‘मिया वाकी डेन्स फॉरेस्ट’ उभारण्यात आले आहे. यात विविध जातीच्या २१०० रोपांची लागवड करण्यात आली आहे. तर अडीच हेक्टरवर १६०० रोपांची लागवड करून नंदनवन फुलविण्यात आले आहे.पावसाळ््यात या झाडांची लागवड करण्यात आली. खडकाळ जमीन असल्यामुळे येथे मोतीबाग येथून ७० टिपर गाळ आणून टाकण्यात आला. त्यात ही झाडे लावण्यात आली आहे. यासाठी जलसंधारण अधिकारी सुसमणी व कार्यालयीन अधीक्षक के. एस. जावळे यांनी परिश्रम घेतले.पाण्यासाठी हौद ; झाडांना ठिंबकचा आधारलागवड केलेल्या झाडांना पाणी देण्यासाठी १३ हजार लिटर साठवण समता असलेला हौद तयार करण्यात आला आहे. तसेच बोअर देखील घेण्यात आला आहे. पाण्याचा अपव्यय टाळावा, यासाठी सर्वच झाडांना ठिंबक सिंचन करण्यात आले आहे. झाडांना मोकाट जनावरांनी खाऊ नये, यासाठी वाल कम्पाऊंड देखील करण्यात आले. झाडांच्या निगराणीसाठी एक व्यक्ती ठेवण्यात आला आहे.या जातींच्या रोपांची केली लागवडया परिसरात पिंपळ, लिंबू, रबर ट्री, गुलमोहर, बांबू, शेवगा, फणस, सिरस, बदाम, जास्वंद, चमेली, सिसम, पपई, एकझोरा, आवळा, कांचन, बूच, शेवरी, सागरगोटा, रेन ट्री, ग्रीसडिया, आंबा, करंज, रूठी, गोरखचिंच, शेमल, बोर, अंजन इ. जातींच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणNatureनिसर्गGovernmentसरकार