कामगारांना सेवेत घेण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:26 IST2021-02-15T04:26:48+5:302021-02-15T04:26:48+5:30
कामाची तक्रार बदनापूर : तालुक्यातील दाभाडी येथे महावितरणच्या वतीने २०१८- १९ मध्ये करण्यात आलेले गावठाण फीडरचे काम निकृष्ट दर्जाचे ...

कामगारांना सेवेत घेण्याची मागणी
कामाची तक्रार
बदनापूर : तालुक्यातील दाभाडी येथे महावितरणच्या वतीने २०१८- १९ मध्ये करण्यात आलेले गावठाण फीडरचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रार काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष मुजाहेद सौफोद्दीन शेख यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
अध्यक्षपदी जैवाळ, तर सचिवपदी गोलेच्छा
दाभाडी : येथील व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी पवन जैवाळ, तर सचिवपदी चंदन गोलेच्छा यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष हस्तीमल बंब यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत ही निवड करण्यात आली. माजी अध्यक्ष मनोज चव्हाण, फारू काजी यांची जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी संजय पडवळे, हर्षल टेकाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सरपंच गुलफिशाॅ अदनान सौदागर, उपसरपंच सूरज दगडू टेकाळे आदींची उपस्थिती होती.
ट्रकची ट्रॅक्टरला धडक; चालकाचा जागीच मृत्यू
बदनापूर : जालना- औरंगाबाद मार्गावरील सेलगावजवळ शनिवारी रात्री भरधाव ट्रकने (क्र. एमएच १२- डीजी६३६८) ट्रॅक्टरला धडक दिली. या अपघातात ट्रॅक्टरचालक ज्ञानदेव पंढरीनाथ खर्डेकर यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पो.नि. मारुती खेडकर, राधाकिसन हरकळ आदींनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.
पाण्याअभावी रब्बी पिके धोक्यात
जालना : महावितरणकडून थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक कारवाई सुरू आहे. कृषिपंपांची वीज गूल झाल्याने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना शेतातील उभ्या पिकाला पाणी देताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाण्याअभावी रब्बीतील पिके हातची जाण्याची भीतीही शेतकरी व्यक्त करीत आहेत.