शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
2
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
3
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
4
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
5
शेअर बाजाराचा बुल सुस्साट, Sensex ८० हजारांपार; Nifty १९० अंकांनी वधारला; IT स्टॉक्समध्ये खरेदी
6
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
7
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
9
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
10
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
11
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
12
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
13
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
14
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
15
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
16
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
17
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
18
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
19
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
20
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी

सध्या सरकारसोबत नेटवर्क जाम, एकमेकांना फोनच लागत नाही: मनोज जरांगे

By विजय मुंडे  | Updated: February 6, 2024 19:17 IST

सरकारने उपोषणाची वेळ आणू नये, मनोज जरांगे यांचे आवाहन

जालना : सध्या सरकार सोबत नेटवर्क जाम आहे. एकमेकांना फोनच होत नाहीत. आम्हाला आता फक्त अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर आणि त्याची अंमलबजावणी हवी आहे. या मागणीवर ठाम असून सरकारने उपोषणाची वेळ आणू नये, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधताना केले.

जरांगे पाटील हे मंगळवारी चार दिवसांच्या दौऱ्यावर गेले. यानिमित्त मंगळवारी सकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कामोठा, नवी मुंबई चेंबूर येथे कार्यक्रम आहे. आळंदीला मोठा कार्यक्रम आहे. तिथेच मुक्काम होणार आहे. उद्या मुंबईत वकीलांसोबत बैठक असून, मुंबईतील मराठा आंदोलकांसोबत बैठक आहे. १० तारखेला गोदा पट्ट्यातील मराठा समाजाची बैठक होणार असून, त्यानंतर उपोषण सुरू करणार आहे. बऱ्याचश्या प्रक्रिया सरकारकडून बाकी आहेत. त्याच्या अंमलबजावणीसाठी हे आमरण उपोषण असल्याचेही ते म्हणाले.

शंभूराजे देसाईंच्या प्रश्नांवर उत्तर देताना जरांगे म्हणाले की, १५ तारखेला अधिवेशनात कायदा करा. २४ डिसेंबरपर्यंत किती नोंदी आढळल्या. नोंदीच्या नावाच्या याद्या अद्याप लागलेल्या नाहीत. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल स्वीकारला का? कोर्टात मांडला का? सग्यासोयऱ्यांबाबत त्यांचा नेमका काय खुलासा करत आहेत हे कळले पाहिजे, असेही ते म्हणाले.

जिथे भुजबळ तिथे धोकाप्रकाश शेंडगे यांनी नवीन पक्ष काढला यावर बोलतांना जरांगे म्हणाले, चांगली गोष्ट आहे. लोकशाहीमध्ये ज्याला त्याला अधिकार आहे. आपल्याला राजकारणातलं काही कळत नाही. भुजबळांचं ऐकून शेंडगे यांनी करू नये. ते अर्ध्यात शेंडगे यांना सोडून देतील. जिथे भुजबळ तिथे धोका होईल, असेही जरांगे पाटील म्हणाले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना