कोरोनाचे जालन्यात सर्वधिक १८५ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:28 IST2021-02-07T04:28:47+5:302021-02-07T04:28:47+5:30

जालना : मागील नऊ महिन्यांत जिल्ह्यात कोरोनामुळे तब्बल ३६८ जणांचा बळी गेला आहे. यात सर्वधिक जालना तालुक्यातील १८५ जणांचा ...

Corona has the highest number of 185 casualties | कोरोनाचे जालन्यात सर्वधिक १८५ बळी

कोरोनाचे जालन्यात सर्वधिक १८५ बळी

जालना : मागील नऊ महिन्यांत जिल्ह्यात कोरोनामुळे तब्बल ३६८ जणांचा बळी गेला आहे. यात सर्वधिक जालना तालुक्यातील १८५ जणांचा मृत्यू झाला आहे. यात शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना २८६ जणांचा तर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना ८२ कोरोनाग्रस्त रुग्णांनी प्राण सोडले आहेत.

जालना जिल्ह्यात एप्रिल २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनस्तरावरून प्रयत्न करण्यात आले. या प्रयत्नांना शहरी, ग्रामीण भागातील नागरिकांचा प्रारंभी मोठा प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात ५ फेब्रुवारीपर्यंत २० हजार २१ कोरोना संशयित आढळून आले आहेत. ८५ हजार ३३४ आरटीपीसीआर तपासण्या, तर ३४ हजार ९२ रॅपिड ॲण्टीजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. आरटीपीएसआर तपासणीत ११ हजार ५२५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. तर रॅपिड ॲण्टीजेन तपासणीत २३०५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. जिल्ह्यात एकूण १३ हजार ८३० रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील ३६८ जणांचा बळी गेला. तर, आजवर १३२९७ जणांनी कोरोनावर मात केली. कोरोनाचे आढळणारे रुग्ण पाहता नागरिकांनी सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.

ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत सर्वाधिक मृत्यूची नोंद

गत १० महिन्यांत ३६८ जणांचा बळी गेला आहे. यात सर्वधिक ऑगस्ट २०२० मध्ये ६८ जणांचा, सप्टेंबर २०२० मध्ये ६८ जणांचा, ऑक्टोबर- २०२० मध्ये ६७ जणांचा तर जुलै- २०२० या महिन्यामध्ये ६५ जणांचा बळी गेला आहे. कोरोनाच्या प्रारंभी मे महिन्यात केवळ एक बळी गेला होता. मृत्यूंची संख्या जुलै महिन्यापासून अधिक वाढली होती. तर रुग्णालयीन उपचारानंतर नोव्हेंबर महिन्यापासून बळींची संख्या कमी झाली.

जालना तालुक्यात सर्वाधिक मृत्यूची नोंद

जिल्ह्यातील ३६८ बळींपैकी सर्वाधिक बळी हे जालना तालुक्यातील नागरिकांचे गेले आहेत. जालना तालुक्यात एकूण १८५ जणांचा मृत्यू झाला आहे. या व्यतिरिक्त इतर जिल्ह्यातील ६३ जणांचाही बळी उपचारादरम्यान गेला आहे. जिल्ह्यात सर्वात कमी मंठा तालुक्यात केवळ आठ जणांचा बळी कोरोनामुळे गेला आहे. बदनापूर तालुक्यात ११ तर परतूर तालुक्यात १३ जणांचा काेरोनामुळे मृत्यू झाला आहे.

लिंगनिहाय जिल्ह्यातील मृत्यू

पुरुष २६०

महिला १०८

अंबड ३७

बदनापूर ११

भोकरदन १६

घनसावंगी १८

जाफराबाद १७

जालना १८५

मंठा ०८

परतूर १३

इतर जिल्हे ६३

मे ०१

जून १५

जुलै ६५

ऑगस्ट ६८

सप्टेंबर ६८

ऑक्टोबर ६७

नोव्हेंबर ३३

डिसेंबर ३२

जानेवारी १८

फेब्रुवारी १

एकूण रुग्ण १३८३०

कोरोनामुक्त झालेले १३२९७

एकूण कोरोना मृत्यू ३६८

Web Title: Corona has the highest number of 185 casualties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.