शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

दिवाळीनिमित्त बाजारात चैतन्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2019 00:10 IST

दिवाळी सणातील सर्वात महत्वाचा दिवस म्हणजेच लक्ष्मीपूजन होय. रविवारी जालन्यातील बाजारात चैतन्याची लाट दिसून आली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दिवाळी सणावर यंदा परतीच्या पावसाचे संकट होते. सलग आठ दिवसांपासून सूर्यदर्शन न झाल्याने जालनेकर हैराण होते. दिवाळी सणातील सर्वात महत्वाचा दिवस म्हणजेच लक्ष्मीपूजन होय. रविवारी सकाळपासूनच जालना शहरात सूर्यदर्शन होऊन सायंकाळ पर्यंत पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे विविध साहित्याची खरेदी धूमधडाक्यात झाली. यामुळे रविवारी जालन्यातील बाजारात चैतन्याची लाट दिसून आली.परतीच्या पावसाने झेंडू फुलांचे दर हे मोठ्या प्रमणावर घसरले होते. फुलांचा दर्जा खालावल्याने कवडीमोल दराने झेंडूची विक्री झाली होती. बाजारात गेल्या आठ दिवसापासून कधी रिपरिप तर कधी धुवाधार पावसाने जालेनकर हैराण झाले होते. रविवारी सायंकाळी देखील आकाशात काळ्या ढगांची गर्दी होती.लक्ष्मीपूनाचा मुहूर्त हा सायंकाळी सात नंतर होता. त्यामुळे अनेकांनी दुपारीच याची तयारी केली होती. सायंकाळी सात वाजेनंतर शहरातील विविध भागांत फटाक्यांची आतषबाजी दिसून आली. विविधरंगी फटाक्यांनी आकाश न्हाऊन निघाले होते. यंदा पाऊस आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी विविध सामाजिक संघटना, शाळांनी घेतलेल्या पुढाकारामुळे फटका विक्रीवरही त्याचा परिणाम झाल्याचे फटाका विक्रेते निलेश गलबल यांनी सांगितले. असे असले तरी फटक्यांची आतषबाजी मात्र कायम असल्याचे दिसून आले.पूजा : घरोघरी उत्साहात लक्ष्मीचे आगमनदिवाळीनिमित्त रविवारी शहर व जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी लक्ष्मीपूजन परंपरागत पध्दतीने करण्यात आले. पूजा झाल्यानंतर बच्चे कंपनीने फटाके फोडण्याची आपली हौस भागविली. यंदा प्रथमच फटाक्यांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले.

टॅग्स :DiwaliदिवाळीSocialसामाजिकcultureसांस्कृतिकMarketबाजारCrackersफटाके