शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
3
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
4
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
5
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
6
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
7
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
8
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
9
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
10
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
11
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
12
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
13
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
14
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
15
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
17
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
18
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
19
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
20
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

बळीराजाला काँग्रेसचे ‘बळ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 00:45 IST

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने गुरूवारी जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने द्यावी यासह शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने गुरूवारी जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तर शेतकऱ्यांनी औरंगाबाद- बीड राष्ट्रीय महामार्गावरील डोणगाव फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले.अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या शेतक-यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, राष्ट्रीयकृत बँका दिवाळखोरीत निघाल्या आहेत. आर्थिक मंदी, बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या, गुन्हेगारी, ठप्प झालेले उद्योग, आरोग्य, शिक्षणातील प्रश्न यासह इतर विविध विषयावर काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेत गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. शासनाने तातडीने शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी, पंजाब अँड महाराष्ट्र बँक अडचणीत आल्याने गुंतवणूकदार चिंतेत आहेत. या गुंतवणूकदारांना नुकसानभरपाई द्यावी, केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आर्थिक मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे.केंद्र शासनाच्या सर्व क्षेत्रातील गैरव्यवहारांमुळे ही मंदीची लाट आली असून, २०१०-११ मध्ये १०.८ असलेला जीडीपी २०१९ मध्ये ५ टक्क्यांवर आला आहे.अनेक कंपन्या बंद पडल्याने दोन लाख कर्मचा-यांच्या नोकरीवर गदा आली आहे. आरोग्य क्षेत्रातील अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.बेरोजगारीने ४५ वर्षांचा उच्चांक मोडला आहे. शासनाने शेतकरी, गरीब, मागास, अल्पसंख्याकांसह सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवावेत, जालना जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतक-यांसोबत आंदोलन केल्याप्रकरणी युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहूल देशमुख व पदाधिका-यांवर दाखल गुन्हे मागे घ्यावेत, जालना- औरंगाबाद महामार्गावरील खड्डे बुजवावेत आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.या आंदोलनात आ. कैलास गोरंट्याल, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, संजय पाटील, माजी आ. धोंडीराम राठोड, कल्याण दळे, आर. आर. खडके, विजय जºहाड, नबाब डांगे, महेमूद शेख, एकबाल कुरेशी, भीमराव डोंगरे, फकिरा वाघ, विमल पाटील, प्रमिला सूर्यवंशी, शहाजहाँ शेख, प्रा. रंगनाथ खेडेकर यांच्यासह शहरासह जिल्हाभरातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.शेतक-यांना तातडीने मदत द्या : अर्धा तास वाहतुकीचा खोळंबावडीगोद्री / जामखेड : परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानाबद्दल तातडीने शेतक-यांना मदत द्यावी, या मागणीसाठी गुरूवारी बीड- औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील डोणगाव फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अर्धा तास चाललेल्या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. मागण्यांचे निवेदन पोउपनि हनुमंत वारे यांना देण्यात आले.यावेळी पांडुरंग गटकळ, मुजीब पटेल, बबन मंडलिक, राजू जायभाये, मदन जायभाये, प्रभाकर पाटोळे, अर्जुन जायभाये, छगन हाजारजे, भानुदास सिरसाठ, नवनाथ जायभाये, विष्णू भिंगारे, रुस्तुम पठाण, इम्रान पठाण, रामेश्वर मैंद, गजानन जायभाय, मकसूद पठाण, मुबारक पठाण, भगवान वैद्य, रमेश मंडलिक, गफूर पठाण, विकास भिंगारे, हरिभाऊ खंडागळे, विकास भिंगारे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :agitationआंदोलनcongressकाँग्रेसFarmerशेतकरीJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालना