शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजाला काँग्रेसचे ‘बळ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 00:45 IST

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने गुरूवारी जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने द्यावी यासह शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने गुरूवारी जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तर शेतकऱ्यांनी औरंगाबाद- बीड राष्ट्रीय महामार्गावरील डोणगाव फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले.अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या शेतक-यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, राष्ट्रीयकृत बँका दिवाळखोरीत निघाल्या आहेत. आर्थिक मंदी, बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या, गुन्हेगारी, ठप्प झालेले उद्योग, आरोग्य, शिक्षणातील प्रश्न यासह इतर विविध विषयावर काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेत गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. शासनाने तातडीने शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी, पंजाब अँड महाराष्ट्र बँक अडचणीत आल्याने गुंतवणूकदार चिंतेत आहेत. या गुंतवणूकदारांना नुकसानभरपाई द्यावी, केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आर्थिक मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे.केंद्र शासनाच्या सर्व क्षेत्रातील गैरव्यवहारांमुळे ही मंदीची लाट आली असून, २०१०-११ मध्ये १०.८ असलेला जीडीपी २०१९ मध्ये ५ टक्क्यांवर आला आहे.अनेक कंपन्या बंद पडल्याने दोन लाख कर्मचा-यांच्या नोकरीवर गदा आली आहे. आरोग्य क्षेत्रातील अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.बेरोजगारीने ४५ वर्षांचा उच्चांक मोडला आहे. शासनाने शेतकरी, गरीब, मागास, अल्पसंख्याकांसह सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवावेत, जालना जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतक-यांसोबत आंदोलन केल्याप्रकरणी युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहूल देशमुख व पदाधिका-यांवर दाखल गुन्हे मागे घ्यावेत, जालना- औरंगाबाद महामार्गावरील खड्डे बुजवावेत आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.या आंदोलनात आ. कैलास गोरंट्याल, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, संजय पाटील, माजी आ. धोंडीराम राठोड, कल्याण दळे, आर. आर. खडके, विजय जºहाड, नबाब डांगे, महेमूद शेख, एकबाल कुरेशी, भीमराव डोंगरे, फकिरा वाघ, विमल पाटील, प्रमिला सूर्यवंशी, शहाजहाँ शेख, प्रा. रंगनाथ खेडेकर यांच्यासह शहरासह जिल्हाभरातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.शेतक-यांना तातडीने मदत द्या : अर्धा तास वाहतुकीचा खोळंबावडीगोद्री / जामखेड : परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानाबद्दल तातडीने शेतक-यांना मदत द्यावी, या मागणीसाठी गुरूवारी बीड- औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील डोणगाव फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अर्धा तास चाललेल्या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. मागण्यांचे निवेदन पोउपनि हनुमंत वारे यांना देण्यात आले.यावेळी पांडुरंग गटकळ, मुजीब पटेल, बबन मंडलिक, राजू जायभाये, मदन जायभाये, प्रभाकर पाटोळे, अर्जुन जायभाये, छगन हाजारजे, भानुदास सिरसाठ, नवनाथ जायभाये, विष्णू भिंगारे, रुस्तुम पठाण, इम्रान पठाण, रामेश्वर मैंद, गजानन जायभाय, मकसूद पठाण, मुबारक पठाण, भगवान वैद्य, रमेश मंडलिक, गफूर पठाण, विकास भिंगारे, हरिभाऊ खंडागळे, विकास भिंगारे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :agitationआंदोलनcongressकाँग्रेसFarmerशेतकरीJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालना