शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

काँग्रेस, राष्ट्रवादीवर बरसले नड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 01:23 IST

विरोधक स्वत:चा स्वार्थ पाहतात असा घणाघाती आरोप भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी बुधवारी येथे आयोजित महाजनादेश यात्रेच्या जाहीर सभेत केला

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महाराष्ट्रातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अर्धे नेते जेलमध्ये असून, अर्धे नेते जेलमध्ये जाण्याच्या मार्गावर आहेत, आम्ही प्रथम देश आणि नंतर पक्षाला महत्त्व देणारे असून, विरोधक मात्र, प्रथम स्वत:चा स्वार्थ पाहतात असा घणाघाती आरोप भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी बुधवारी येथे आयोजित महाजनादेश यात्रेच्या जाहीर सभेत केला. याचवेळी त्यांनी शरद पवार आणि अजित पवार यांचा नामोल्लेख न करता, चाचा-भतीजाचे राजकारण कसे चालते यावर टिपणी करतानाच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना आता कलम ३७० रद्द केल्या प्रकरणी उपरती झाल्याचे नड्डा यांनी यावेळी नमूद केले.भाजपची महाजनादेश यात्रा बुधवारी सायंकाळी जालन्यात दाखल झाली. येथील डॉ. फ्रेजर बॉईज हायस्कूलच्या मैदानावर यात्रेनिमित्त जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यावर नड्डा हे प्रथमच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर पहिल्यांदा जालन्यात आले होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींनी ७५ दिवसात केलेल्या विकास कामांचा पाढा वाचून दाखला, तसेच काश्मीरमधील ३७० कलम रद्द करण्याचा धाडसी निर्णय पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी घेतल्याचे सांगून त्यामुळे तेथील जनतेचा विकास होऊन भारतीय राज्य घटनेतील आरक्षण तेथे लागू होणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने भ्रष्टाचार मुक्त करून चौफेर विकास साधल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.यावेळी त्यांनी युनोमध्ये ज्यावेळी काश्मीरचा मुद्दा हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगितल्यावर खा. राहुल गांधी यांना आपण पाकिस्तानची भाषा बोलत असल्याची उपरती झाली, आणि नंतर त्यांनी हा आमच्या देशाअंतर्गतचा मुद्दा असल्याचे मान्य करत केंद्र सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवल्याचे नड्डा यांनी सांगितले. ज्यावेळी संसदेत ३७० कलम रद्द झाले होते, त्यावेळी काँग्रेसने केवळ व्होटबँकेला धक्का लागू नये म्हणून त्याला विरोध केल्याचा आरोपही नड्डा यांनी केला. मोदींनी मुस्लिम महिलांसाठी डोकेदुखी असलेला तिहेरी तलाकचा मुद्दा निकाली काढल्याने त्यांच्या वरील अन्याय दूर झाल्याचे सांगितले. आयुष्यमान योजनेचे कौतुक हे परदेशात होत असल्याचे सांगून यामुळे आता पर्यंत ४२ लाख लोकांना त्याचा लाभ झाल्याचा दावा केला. तसेच जालन्यातील ड्रायपोर्टचे काम ७० टक्के झाल्याचे सांगून, जालन्यातील बियाणे उद्योगात १८० कोटी रूपयांची गुंतवणूक झाल्याचेही सांगितले. यावेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनीही विचार मांडले. राज्यमंत्री अर्जुन खोतकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, जि.प. अध्यक्ष अनिरूध्द खोतकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचा व्यासपीठावर येऊन सत्कार केला.कार्यक्रमास भाजपचे ज्येष्ठ नेते भूपेंद्र यादव, सुरजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष आ. संतोष दानवे, आ. नारायण कुचे, उद्योजक किशोर अग्रवाल, घनश्याम गोयल, देविदास देशमुख, सिध्दीविनायक मुळे आदींची उपस्थिती होती. सभेचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष भास्कर दानवे यांनी केले.महाजनादेश यात्रेतून आम्ही केलेला विकास जनतेसमोर मांडत आहोत, लोकसभे प्रमाणेच विधानसभेतही जनता आम्हाला आशीर्वाद देईल, असा विश्वास व्यक्त करून मराठवाड्यातील दुष्काळ हटविण्यासाठी सिंचनासह पाणीपुरवठ्याच्या योजनांसाठी भरीव निधी देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितले. मराठवाडा वॉटरग्रीडसाठी चार हजार कोटी रूपयांची निविदा निघाली असल्याचे सांगितले.कोकणातील समुद्रात वाहून जाणारे २५ टीएमसी पाणी देखील गोदावरीत वळवून दुष्काळावर मात करू, असे ते म्हणाले. पाच वर्षातील आमचा विकास आणि आघाडी सरकारचा पंधरा वर्षातील विकास याची तुलना होऊच शकत नसल्याचा दावा त्यांनी केला. विविध अनुदानातून शेतकऱ्यांसाठी ५० हजार कोटी रूपये दिल्याचे त्यांनी सांगितले. जालन्यासाठी तुम्ही कितीही निधी मागा, आमची तिजोरी कधीही उघडीच राहील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.विरोधकांच्या यात्रेला प्रेतयात्रेचे रूप : दानवेकेंद्र आणि राज्य सरकारने गेल्या पाच वर्षात जी कामे केली आहेत, ती जनतेपर्यंत नेण्यासाठी आमची महाजनादेश यात्रा आहे. परंतु या यात्रेला विरोध करण्यासाठी काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने ज्या यात्रा काढल्या आहेत, त्यांना प्रेतयात्रेचे स्वरूप आले असल्याची गंभीर टीका केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी करून त्यांच्या यात्रांची खिल्ली उडवली. महाराष्ट्रासह जालन्याच्या विकासासाठी हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त निधी आणून रस्ते, पाणीयोजना तसेच अन्य विकास कामे केल्याचे दानवे यांनी यावेळी नमूद केले. आगामी काळात चौदाशे एकरवर जालन्याचा विकास होणार असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील ८१ कोटी गरीब जनतेला केवळ दोन रूपये किलोने गहू आणि तांदूळ आम्ही देत असल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला.

टॅग्स :Maha Janadesh Yatraमहाजनादेश यात्राChief Ministerमुख्यमंत्रीBJPभाजपाPoliticsराजकारण