शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

‘वॉटर ग्रीड’सह प्रकल्पांची कामे पूर्ण करा : तज्ज्ञांचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 12:44 AM

शासनाने मराठवाड्यातील रखडलेल्या प्रकल्पांची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असा सूर जालना येथे रविवारी आयोजित वॉटर ग्रीड परिषदेत सहभागी तज्ज्ञांनी काढला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : हजारो कोटी रूपयांचा वॉटर ग्रीड प्रकल्प राबविण्यात येत आहे. तत्पूर्वी शासनाने मराठवाड्यातील रखडलेल्या प्रकल्पांची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असा सूर जालना येथे रविवारी आयोजित वॉटर ग्रीड परिषदेत सहभागी तज्ज्ञांनी काढला. मराठवाड्यातील सिंचनाचा अनुशेष शिल्लक असून, सिंचनाच्या प्रश्नावर तालुकानिहाय चर्चा व्हावी. वॉटर ग्रीडबाबतचे समज-गैरसमज दूर करावेत, अशी अपेक्षा कृषिभूषण विजय बोराडे यांनी अध्यक्षीय समारोपात व्यक्त केली.मराठवाडा वॉटर ग्रीड परिषदेतर्फे जालना येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात रविवारी मराठवाडा पातळीवरील मराठवाडा वॉटर ग्रीड परिषद घेण्यात आली. कृषिभूषण विजय बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित परिषदेस महाराष्ट्र सिंचन सहयोगाचे उपाध्यक्ष प्रा. बापू अडकिणे, वाल्मीचे माजी सहसंचालक डॉ. एस. बी. वराडे, पाणी प्रश्नाचे अभ्यासक राजेंद्र दाते-पाटील, राजन क्षीरसागर, मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे सदस्य शंकर नागरे, जलतज्ज्ञ प्रा. प्रदीप पुरंदरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना प्रा. पुरंदरे म्हणाले, मराठवाड्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी इस्त्राईलच्या मदतीने मराठवाडा वॉटर ग्रीड हा तब्बल २५ हजार कोटी रुपये किंमतीचा महत्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्र शासनाने हाती घेतला आहे. वॉटर ग्रीडची देखभाल, दुरुस्ती व संरक्षण आणि जलशयातून होणारा अमर्याद उपसा हे कळीचे मुद्दे आहेत. जलयुक्तमुळे दुष्काळमुक्ती झाली असेल तर ग्रीड योजनेची गरज काय? असा सवाल उपस्थित करीत ग्रीडमुळे पाणी पुरवठा योजनांमध्ये होणारे बदल, पाणी पट्टीतील बदल लक्षात घेता महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची भूमिका कळीची ठरणार आहे. या ग्रीडबाबत शासनाने गांभीर्याने पुर्नविचार करणे गरजेचे आहे. टाटाबरोबर झालेले ब्रिटीशकालीन करार रद्द करुन वीज निर्मितीसाठी वापरले जाणारे पाणी भिमा खोऱ्यात आणि तेथून मराठवाड्यात आणण्याची गरज प्रा. पुरंदरे यांनी व्यक्त केली.अध्यक्षीय समारोपात कृषीभूषण विजय बोराडे म्हणाले, मराठवाड्यातील सिंचनाचा अनुशेष शिल्लक आहे. सिंचनाच्या प्रश्नावर तालुकावार चर्चा होणे गरजेचे आहे. वॉटर ग्रीड विषयी समज, गैरसमज दूर करण्याची गरज आहे. शेतीचे, पिण्याचे पाणी उद्योगांकडे वळविले जात असून, सिंचन प्रश्नी शेतकऱ्यांनी संघटीत होणे काळाची गरज आहे. यावेळी मराठवाडा वॉटर ग्रीड परिषदेच्या स्मरणिकेचे प्रा. पुरंदरे यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.प्रारंभी परिषदेचे संयोजक बी.वाय. कुलकर्णी, प्राचार्य डॉ. सुनंदा तिडके, प्राचार्य डॉ. राजकुमार म्हस्के, गोविंद आर्दड, अ‍ॅड. किशोर राऊत, सुधीर शिंदे, अनिल मिसाळ आदींनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविकात मुख्य संयोजक कॉ. अण्णा सावंत यांनी वॉटर ग्रीड परिषदेची भूमिका मांडली. सूत्रसंचालन शिवकुमार सोळंके यांनी तर अ‍ॅड. कैलास रत्नपारखे यांनी आभार मानले.यावेळी द्वारकाभाऊ पाथ्रीकर, ज्ञानदेव पायगव्हाणे, भगवान काळे, डॉ. रमेश अग्रवाल, प्रा. नारायण बोराडे, देविदास जीगे, शिवाजी लकडे, दत्ता कदम, डॉ. आप्पासाहेब कदम, प्रा. बसवराज कोरे, डॉ. विजयकुमार कुमठेकर, डॉ. यशवंत सोनवणे, आर.आर. खडके, डॉ. रावसाहेब ढवळे, राम गायकवाड यांच्यासह शेतकरी तसेच अभ्यासक उपस्थित होते. या योजनेवर मराठवाड्यात प्रथम अशी जाहीर खुलीचर्चा झाल्याने नागरिकांना योजना कळणार आहे.योजनेबाबत सकारात्मकता ठेवावीमराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे सदस्य शंकरराव नागरे म्हणाले, मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाबाबत सकारात्मक दृष्टीकोण ठेवावा. ही एक महत्वाकांक्षी योजना असून, शासनाने ही महत्वाकांक्षी योजना कार्यान्वीत करतांना लोकसहभागास प्राधान्य देऊन पुढील कार्यवाही करणे अपेक्षीत आहे.तरच ही योजना फलदायी होण्याचे श्रेय शासनाला मिळेल. ही वॉटर ग्रीड योजना म्हणजे मराठवाड्यातील जनतेसाठी सुवर्णसंधी असल्याचे ते म्हणाले. तर वाल्मीचे माजी सहसंचालक डॉ. एस. बी. वराडे यांनी वॉटर ग्रीड प्रकल्प सकारात्मक दृष्टीने राबवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पgovernment schemeसरकारी योजनाwater shortageपाणीकपात