शहरं
Join us  
Trending Stories
1
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
2
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘वॉटर ग्रीड’सह प्रकल्पांची कामे पूर्ण करा : तज्ज्ञांचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 00:45 IST

शासनाने मराठवाड्यातील रखडलेल्या प्रकल्पांची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असा सूर जालना येथे रविवारी आयोजित वॉटर ग्रीड परिषदेत सहभागी तज्ज्ञांनी काढला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : हजारो कोटी रूपयांचा वॉटर ग्रीड प्रकल्प राबविण्यात येत आहे. तत्पूर्वी शासनाने मराठवाड्यातील रखडलेल्या प्रकल्पांची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असा सूर जालना येथे रविवारी आयोजित वॉटर ग्रीड परिषदेत सहभागी तज्ज्ञांनी काढला. मराठवाड्यातील सिंचनाचा अनुशेष शिल्लक असून, सिंचनाच्या प्रश्नावर तालुकानिहाय चर्चा व्हावी. वॉटर ग्रीडबाबतचे समज-गैरसमज दूर करावेत, अशी अपेक्षा कृषिभूषण विजय बोराडे यांनी अध्यक्षीय समारोपात व्यक्त केली.मराठवाडा वॉटर ग्रीड परिषदेतर्फे जालना येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात रविवारी मराठवाडा पातळीवरील मराठवाडा वॉटर ग्रीड परिषद घेण्यात आली. कृषिभूषण विजय बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित परिषदेस महाराष्ट्र सिंचन सहयोगाचे उपाध्यक्ष प्रा. बापू अडकिणे, वाल्मीचे माजी सहसंचालक डॉ. एस. बी. वराडे, पाणी प्रश्नाचे अभ्यासक राजेंद्र दाते-पाटील, राजन क्षीरसागर, मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे सदस्य शंकर नागरे, जलतज्ज्ञ प्रा. प्रदीप पुरंदरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना प्रा. पुरंदरे म्हणाले, मराठवाड्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी इस्त्राईलच्या मदतीने मराठवाडा वॉटर ग्रीड हा तब्बल २५ हजार कोटी रुपये किंमतीचा महत्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्र शासनाने हाती घेतला आहे. वॉटर ग्रीडची देखभाल, दुरुस्ती व संरक्षण आणि जलशयातून होणारा अमर्याद उपसा हे कळीचे मुद्दे आहेत. जलयुक्तमुळे दुष्काळमुक्ती झाली असेल तर ग्रीड योजनेची गरज काय? असा सवाल उपस्थित करीत ग्रीडमुळे पाणी पुरवठा योजनांमध्ये होणारे बदल, पाणी पट्टीतील बदल लक्षात घेता महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची भूमिका कळीची ठरणार आहे. या ग्रीडबाबत शासनाने गांभीर्याने पुर्नविचार करणे गरजेचे आहे. टाटाबरोबर झालेले ब्रिटीशकालीन करार रद्द करुन वीज निर्मितीसाठी वापरले जाणारे पाणी भिमा खोऱ्यात आणि तेथून मराठवाड्यात आणण्याची गरज प्रा. पुरंदरे यांनी व्यक्त केली.अध्यक्षीय समारोपात कृषीभूषण विजय बोराडे म्हणाले, मराठवाड्यातील सिंचनाचा अनुशेष शिल्लक आहे. सिंचनाच्या प्रश्नावर तालुकावार चर्चा होणे गरजेचे आहे. वॉटर ग्रीड विषयी समज, गैरसमज दूर करण्याची गरज आहे. शेतीचे, पिण्याचे पाणी उद्योगांकडे वळविले जात असून, सिंचन प्रश्नी शेतकऱ्यांनी संघटीत होणे काळाची गरज आहे. यावेळी मराठवाडा वॉटर ग्रीड परिषदेच्या स्मरणिकेचे प्रा. पुरंदरे यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.प्रारंभी परिषदेचे संयोजक बी.वाय. कुलकर्णी, प्राचार्य डॉ. सुनंदा तिडके, प्राचार्य डॉ. राजकुमार म्हस्के, गोविंद आर्दड, अ‍ॅड. किशोर राऊत, सुधीर शिंदे, अनिल मिसाळ आदींनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविकात मुख्य संयोजक कॉ. अण्णा सावंत यांनी वॉटर ग्रीड परिषदेची भूमिका मांडली. सूत्रसंचालन शिवकुमार सोळंके यांनी तर अ‍ॅड. कैलास रत्नपारखे यांनी आभार मानले.यावेळी द्वारकाभाऊ पाथ्रीकर, ज्ञानदेव पायगव्हाणे, भगवान काळे, डॉ. रमेश अग्रवाल, प्रा. नारायण बोराडे, देविदास जीगे, शिवाजी लकडे, दत्ता कदम, डॉ. आप्पासाहेब कदम, प्रा. बसवराज कोरे, डॉ. विजयकुमार कुमठेकर, डॉ. यशवंत सोनवणे, आर.आर. खडके, डॉ. रावसाहेब ढवळे, राम गायकवाड यांच्यासह शेतकरी तसेच अभ्यासक उपस्थित होते. या योजनेवर मराठवाड्यात प्रथम अशी जाहीर खुलीचर्चा झाल्याने नागरिकांना योजना कळणार आहे.योजनेबाबत सकारात्मकता ठेवावीमराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे सदस्य शंकरराव नागरे म्हणाले, मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाबाबत सकारात्मक दृष्टीकोण ठेवावा. ही एक महत्वाकांक्षी योजना असून, शासनाने ही महत्वाकांक्षी योजना कार्यान्वीत करतांना लोकसहभागास प्राधान्य देऊन पुढील कार्यवाही करणे अपेक्षीत आहे.तरच ही योजना फलदायी होण्याचे श्रेय शासनाला मिळेल. ही वॉटर ग्रीड योजना म्हणजे मराठवाड्यातील जनतेसाठी सुवर्णसंधी असल्याचे ते म्हणाले. तर वाल्मीचे माजी सहसंचालक डॉ. एस. बी. वराडे यांनी वॉटर ग्रीड प्रकल्प सकारात्मक दृष्टीने राबवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पgovernment schemeसरकारी योजनाwater shortageपाणीकपात