शहरं
Join us  
Trending Stories
1
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
2
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
3
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
4
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
5
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
6
वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा!
7
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
8
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
9
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
10
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
11
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
12
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
13
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
14
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
15
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
16
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
17
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
18
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
19
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
20
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान

दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यासाठी ‘मुकाबला दुष्काळाचा’ मोहीम हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 00:30 IST

लना जिल्हा तीव्र दुष्काळाने होरपळला असून या दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी जालना शहरातील सेवाभावी संस्था व दानशूर व्यक्ती यांच्या मदतीने ‘मुकाबला दुष्काळाचा’ ही मोहीम सुरु केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्हा तीव्र दुष्काळाने होरपळला असून या दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी जालना शहरातील सेवाभावी संस्था व दानशूर व्यक्ती यांच्या मदतीने ‘मुकाबला दुष्काळाचा’ ही मोहीम सुरु केली.सर्वप्रथम जिल्ह्यातील ४० पेक्षा अधिक गावांचा दौरा करुन चारा, पाणी, या समस्या ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या भावनेतून जिल्हाप्रमुखांनी जाणून घेतल्या व आता मागील महिन्यांपासून या समस्यांवर उपाययोजना करीत आहेत. या उपाययोजना करतांना तीव्र पाणीटंचाई असणाऱ्या पाहेगाव, पारेगाव, बाजीउम्रद, मानेगाव तांडा, पोखरी सिंदखेड, राममुर्ती, वुंष्ठभेफळ, वरखेडा, वाघ्रुळ आदी गावांत पाणी समस्यांवर उपाय म्हणून बोअरवेल घेवून दिले. तसेच अनेक गावांतील जनावरांसाठी चारा, पाणी व पाणी साठविण्यासाठी २ हजार लिटरच्या पाण्याच्या टाक्याचे वाटप करण्यात आले.या मोहिमेअंतर्गत रविवारी जालना शहरातील दानशुर उद्योजक कैलास लोया यांच्या सहकार्याने व मदतीने घेण्यात आलेल्या बोअरवेलच्या पाण्याचे जलपुजन त्यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मानेगावचे माजी सरपंच अशोक हंडे, माजी सैनिक एकनाथ हंडे, किसान राठोड, गणेश पवार, विठ्ठल पडूळ, रामधान राठोड, सुभाष राठोड, लालीराम राठोड, विठ्ठल राोड, बंडु पवार, ज्ञानेश्वर राठोड, मोहन पवार, विकास मगर, प्रल्हाद पवार, सुभाष पवार, केलास राठोड, नंदु राठोड, दिलीप राठोड, संजय राठोड, राममुर्ती येथील सरपंच कैलास गिराम, बंडु केळकर, निवृत्ती मुळे, विष्णु मगर, बाबुराव राऊत, गणेश मगर, लक्ष्मण सातपुते, जलाल मुन्नेवाले, राधाकिसन राऊत, दत्तु मगर, सत्यनारायण मगर, अशोक गिराम, संतोष राऊत, ज्ञानेश्वर राऊत, परमेश्वर चौधरी आदी गावकऱ्यांसह नागरिकांची उपस्थिती होती.दानाचा सदुपयोगयावेळी बोलतांना उद्योजक कैलास लोया म्हणाले की, आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी देणगी देत असतो. परंतु नंतर त्याचा वापर कसा होतो, याचे ज्ञान आम्हाला नसते. परंतु मुकाबला दुष्काळाचा या मोहिमेस मदत केल्यामुळे आम्ही दिलेले दान हे सत्पत्री गेल्याचा आनंद अनुभवयास मिळत आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील जनतेला हंडाभर पाण्यासाठी करावी लागणारी भटकंती काही अंशी थांबविल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. दरम्यान, त्यांनी या उपक्रमाचे कौतूकही केले.गावक-यांना दिलासाया मोहिमेअंतर्गत घेण्यात आलेले ७० टक्के बोअरवेल यशस्वी झाले असून, त्यावर विद्युत मोटारी बसविल्याने गावकºयांना दिलासा मिळाला आहे. अनेक गावात लहान मुले, महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत होती.

टॅग्स :droughtदुष्काळSocialसामाजिक