शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

अधिकाऱ्यांच्या वाहनाला नागरिकांचा घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 00:45 IST

पावसाची चुकीची नोंदी घेणा-या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी बुधवारी मंडळ कृषी अधिका-यांच्या वाहनाला घेराव घालून आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदी/वडीगोद्री : अंबड तालुक्यातील गोंदी मंडळात पावसाची चुकीची नोंदी घेणा-या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी बुधवारी मंडळ कृषी अधिका-यांच्या वाहनाला घेराव घालून आंदोलन केले.कारवाईची मागणी ग्रामस्थांनी मंगळवारी जिल्हाधिका-यांकडे केली होती. त्यानंतर जागे झालेल्या प्रशासनाने बुधवारी गोंदी येथे पावसाची नोंद घेणारे नवीन मशीन बसविले. दरम्यान आजवरची आकडेवारी चुकीची असल्याचे लेखी द्या, म्हणत मंडळ अधिकारी कृष्णा एडके यांच्या वाहनाला घेराव घातला. अखेर आ. राजेश टोपे यांच्या मध्यस्थीने शेतक-यांनी माघार घेतली.गोंदी मंडळात १ ते २७ जुलै दरम्यान केवळ २७ मिलीमीटर पाऊस झाला. मात्र, अधिका-यांनी अफलातून काम करत कागदावर ६८ मिलीमीटर पावसाची नोंद केल्याचे पहायला मिळत आहे. अधिका-यांनी गावात प्रत्यक्ष न येताच तहसील कार्यालयात बसूनच गोंदी मंडळात ६८ मिलीमीटर पाऊस पडल्याचा दाखविल्याने मंडळातील शेतक-यांनी जिल्हाधिका-यांना मंगळवारी निवेदन दिले होते.ग्रामस्थ, शेतक-यांनी निवेदन दिल्यानंतर निवासी जिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी कृषी विभाग व अंबडच्या तहसीलदार मनीषा मेने यांना ताबडतोब प्रत्यक्ष जाऊन पंचनामे करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्यांनी शेतावर जाऊन पाहणी केला असता ६८ मिलीमीटर पाऊस पडला नसल्याचा अहवाल त्यांनी दिला.

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागagitationआंदोलनJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालनाRainपाऊसTahasildarतहसीलदार