शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

"छगन भुजबळ बेइमान माणूस, त्यांना गोड बोलून राज्यात दंगली घडवायच्यात": मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 17:04 IST

अतिबेइमान माणूस आहे, त्यांच्यासारखा माणूस जन्मू नाही कोणत्याच समाजात: मनोज जरांगे

- पवन पवार वडीगोद्री ( जालना) : ''छगन भुजबळ यांना राज्यात गोड बोलून दंगली घडवायच्या दिसतात. ते कोणाचेच नाहीत. फक्त स्वतःच घर कसं भरलं, हेच पाहतात. अतिबेइमान माणूस आहे, त्यांच्यासारखा माणूस जन्मू नाही कोणत्याच समाजात. इतके वाद लावून देणारा, इतके काड्या लावून देणारा, इतकं वातावरण दूषित केलं त्यांनी. आता जाऊन सांगतात की, शांतता राहिली पाहिजे. इथून मागे नीट वागायचं ना कशाला शेण खाल्ल'', अशी सडकून टीका मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतली यावर केली.

पंढरपूर येथे जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेऊन जरांगे पाटील हे सोमवारी सकाळी अंतरवाली सराटी येथे दाखल झाले. या दरम्यान त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. ते म्हणाले, ''छगन भुजबळ गेले काय आणि राहिला काय, कुठे बसलाय काय याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. लय बेईमान आहे, जिथे खातात तिथेच घाण करतात. त्यांना वाटतं असंच पेटत ठेवायचं आणि विधानसभेला फायदा उचलायचा. हातात त्यांच्या आहे की तुमच्या आहे, त्यांना द्या ना लाथ मारून काढून.'' असे आवाहन जरांगे यांनी केले.

मराठा आरक्षण संदर्भात सर्वपक्षीय बैठकीला बहिष्कार घातला, यावरून जरांगे पाटील यांनी सरकारवर टीका केली. ''तुमची राजकीय इच्छाशक्ती आहे. तर तुम्ही द्या ना, तुम्हाला द्यायचं नाही. याच्या त्याच्याकडे बोट दाखवता. त्या छगन भुजबळच्या आहारी चालले. हा छगन भुजबळ यांचा नवीन डाव आहे. तोही सरकारनेच आखायला लावला असेल अस मला वाटतं. मिडियात सांगायचं की, शांतता राहिली पाहिजे म्हणून. मी याच्यात्याच्या दारोदारी भीक मागत हिंडतोय असं याला दाखवायचं आहे, असा डाव दिसतोय. पण शांतता शब्द वापरायचा आणि राज्यात दंगल लावून द्यायची'', अशी टीका जरांगे यांनी केली. 

सरकार म्हटल तर बलिदान देण्यास तयार''माझ्या समाजासाठी जीवाची बाजी लावू शकतो. सरकारने माझे दोन्ही हात आणि दोन्ही पाय तोडून जरी मागितले तरी मराठा आरक्षणासाठी द्यायला तयार आहे. सरकार जर म्हणल तुझं मुंडकं उद्या सकाळी तोडून दे, आम्ही आरक्षण देतो. तर मी उद्या सकाळी शिंदे साहेबांच्या आणि फडणवीस साहेबांच्या दारात मुंडकं तोडून द्यायला तयार आहे. समाज आपला मायबाप आहे. तर मरायला काय घाबरायचे. आपल्या समाजासाठी आपला जीव जाईल त्याच्या पलीकडे काय होईल. माझ्या समाजासाठी माझं बलिदान गेलं तर समाजाच तरी कल्याण होईल'', असेही जरांगे म्हणाले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील