शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

दिव्यांगांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 01:12 IST

टोकियो येथे होणाऱ्या आॅलिंपिक स्पर्धेत मी निश्चितपणे देशाला सुवर्णपदक मिळवून देईल असा आत्मविश्वास आंतरराष्ट्रीय अंध जलतरणपटू कांचनमाला पांडे हिने व्यक्त केला.

राजेंद्र घुले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दिव्यांगांना केवळ दया दाखवून चालणार नाही, तर त्यांच्याकडे बघण्याचा सामाजिक दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे, अपंग असतानाही आपण मोठ्या हिंमतने आणि वडिलांच्या भक्कम पाठिब्यामुळे आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत देशाला ११ सुवर्ण आणि राष्ट्रीय पातळीवर १२४ सुवर्णपदक मिळवू शकले. आता टोकियो येथे होणाऱ्या आॅलिंपिक स्पर्धेत मी निश्चितपणे देशाला सुवर्णपदक मिळवून देईल असा आत्मविश्वास आंतरराष्ट्रीय अंध जलतरणपटू कांचनमाला पांडे हिने रविवारी मैत्र मांदियाळीतर्फे अयोजित प्रकट मुलाखती दरम्यान व्यक्त केला.मैत्र मांदियाळी प्रतिष्ठान आणि समर्पण सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तरूणाईच्या वाटा या कार्यक्रमाचे आयोजन फुलंब्रीकर नाट्यगृहात करण्यात आले होते. यावेळी कांचनमाला पांडे यांची मुलाखत मनोज गोविंंदवार यांनी घेतली. या मुलाखती दरम्यान गोविंदवार यांनी विचारलेल्या प्रश्नांना कांचनमाला पांडे हिने आत्मविश्वासने उत्तरे दिली. यावेळी १८ वर्षाची असताना एका जलतरण स्पर्धेत अपयश आल्याने खचून जाऊन आत्महत्येचा विचार मनात आला होता. असे सांगून आई-वडिलांनी मुलांवर आपल्या अपेक्षा न लादण्याचे आवाहन केले.डोळसांच्या स्पर्धेत आपण एक अंध स्पर्धक म्हणून सहभाग नोंदवून सुवर्णपदकापर्यंत मजल मारली. यासाठी जिद्द आणि परिश्रम घेतल्यानेच हे शक्य झाल्याचे कांचनमाला पांडे हिने सांगितले. प्रास्ताविक अनिता कुलकर्णी यांनी केले.यावेळी मैत्र मांदियाळीचे अजय किंगरे, अनिल कुलकर्णी, निवृत्ती रूद्राक्ष, राजीव पाटील, संदीप मोहरीर, कावेरी शेळके, स्वाती कुलकर्णी, जानकी रूद्राक्ष, रूपाली मोहरीर, रोहिणी सकट, वर्षा पाटील, वर्षा खंडागळे आदींची उपस्थिती होती.प्रसिद्ध साहित्यिक रेखा बैजल यांचीही यावेळी प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी आपणास गायिका व्हायचे होते, मात्र आपण लेखिका झाले. आंतररजातीय विवाहानंतर आपण संसारात रममाण झालो. त्यामुळे गाण्याची आवड दूर ठेवून, लेखन करत गेले, आणि त्यातून कविता तसेच ललित, कादंबरी साहित्य निर्माण होत गेले. लेखनाला घराणे नसते, लेखन हे आपल्या अभिव्यक्तीतून प्रगट होते. आज समाजातआंतरजातीय विवाह होत असले तरी ते टिकत नसल्याचे चित्र दिसत आहेयावेळी चिखली येथील सेवा संकल्पच्या माध्यमातून मनोरूग्णांसाठी कार्य करणाºया आरती पालवे यांचीही यावेळी प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्या म्हणाल्या की, सेवा संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही मनोरूग्णांना आधार देण्याचे कार्य करत आहोत, पशुवत जगत असलेल्या मनोरूग्णांना समाजाने आधार देण्याची गरज आहे. तसेच या मनोरूग्णांच्या पुनर्वसनाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. या संस्थेत मनोरूग्णांची सेवा करताना अंगावर शहारे आणणारे अनुभवही त्यांनी यावेळी विशद केले.

टॅग्स :SocialसामाजिकSwimmingपोहणे