शहरं
Join us  
Trending Stories
1
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
2
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
3
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
4
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
5
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार
6
Mumbai Crime: हाताच्या नसा कापल्या गेल्या अन्... पोलिसाच्या मृत्युचे कोडे उलगडले; पत्नी, मुलाला अटक
7
३.७ कोटी देऊन बॉयफ्रेंडच्या पत्नीसोबत केली तडजोड, पण नंतर घडलं असं काही, पैसेही गेले आणि... 
8
Gold Silver Price 24 September: नवरात्रीत सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, आता खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी?
9
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
10
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
11
भलीमोठी स्क्रीन, अल्ट्रा एचडी डिस्प्ले; सोनी कंपनीच्या टीव्हीवर थेट ५० हजारांची सूट!
12
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: ५ मिनिटांत होणारे गणेश स्तोत्र म्हणा, शाश्वत कृपा-लाभ मिळवा!
13
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
14
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
15
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
16
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
17
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
18
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
19
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?

दिव्यांगांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 01:12 IST

टोकियो येथे होणाऱ्या आॅलिंपिक स्पर्धेत मी निश्चितपणे देशाला सुवर्णपदक मिळवून देईल असा आत्मविश्वास आंतरराष्ट्रीय अंध जलतरणपटू कांचनमाला पांडे हिने व्यक्त केला.

राजेंद्र घुले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दिव्यांगांना केवळ दया दाखवून चालणार नाही, तर त्यांच्याकडे बघण्याचा सामाजिक दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे, अपंग असतानाही आपण मोठ्या हिंमतने आणि वडिलांच्या भक्कम पाठिब्यामुळे आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत देशाला ११ सुवर्ण आणि राष्ट्रीय पातळीवर १२४ सुवर्णपदक मिळवू शकले. आता टोकियो येथे होणाऱ्या आॅलिंपिक स्पर्धेत मी निश्चितपणे देशाला सुवर्णपदक मिळवून देईल असा आत्मविश्वास आंतरराष्ट्रीय अंध जलतरणपटू कांचनमाला पांडे हिने रविवारी मैत्र मांदियाळीतर्फे अयोजित प्रकट मुलाखती दरम्यान व्यक्त केला.मैत्र मांदियाळी प्रतिष्ठान आणि समर्पण सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तरूणाईच्या वाटा या कार्यक्रमाचे आयोजन फुलंब्रीकर नाट्यगृहात करण्यात आले होते. यावेळी कांचनमाला पांडे यांची मुलाखत मनोज गोविंंदवार यांनी घेतली. या मुलाखती दरम्यान गोविंदवार यांनी विचारलेल्या प्रश्नांना कांचनमाला पांडे हिने आत्मविश्वासने उत्तरे दिली. यावेळी १८ वर्षाची असताना एका जलतरण स्पर्धेत अपयश आल्याने खचून जाऊन आत्महत्येचा विचार मनात आला होता. असे सांगून आई-वडिलांनी मुलांवर आपल्या अपेक्षा न लादण्याचे आवाहन केले.डोळसांच्या स्पर्धेत आपण एक अंध स्पर्धक म्हणून सहभाग नोंदवून सुवर्णपदकापर्यंत मजल मारली. यासाठी जिद्द आणि परिश्रम घेतल्यानेच हे शक्य झाल्याचे कांचनमाला पांडे हिने सांगितले. प्रास्ताविक अनिता कुलकर्णी यांनी केले.यावेळी मैत्र मांदियाळीचे अजय किंगरे, अनिल कुलकर्णी, निवृत्ती रूद्राक्ष, राजीव पाटील, संदीप मोहरीर, कावेरी शेळके, स्वाती कुलकर्णी, जानकी रूद्राक्ष, रूपाली मोहरीर, रोहिणी सकट, वर्षा पाटील, वर्षा खंडागळे आदींची उपस्थिती होती.प्रसिद्ध साहित्यिक रेखा बैजल यांचीही यावेळी प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी आपणास गायिका व्हायचे होते, मात्र आपण लेखिका झाले. आंतररजातीय विवाहानंतर आपण संसारात रममाण झालो. त्यामुळे गाण्याची आवड दूर ठेवून, लेखन करत गेले, आणि त्यातून कविता तसेच ललित, कादंबरी साहित्य निर्माण होत गेले. लेखनाला घराणे नसते, लेखन हे आपल्या अभिव्यक्तीतून प्रगट होते. आज समाजातआंतरजातीय विवाह होत असले तरी ते टिकत नसल्याचे चित्र दिसत आहेयावेळी चिखली येथील सेवा संकल्पच्या माध्यमातून मनोरूग्णांसाठी कार्य करणाºया आरती पालवे यांचीही यावेळी प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्या म्हणाल्या की, सेवा संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही मनोरूग्णांना आधार देण्याचे कार्य करत आहोत, पशुवत जगत असलेल्या मनोरूग्णांना समाजाने आधार देण्याची गरज आहे. तसेच या मनोरूग्णांच्या पुनर्वसनाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. या संस्थेत मनोरूग्णांची सेवा करताना अंगावर शहारे आणणारे अनुभवही त्यांनी यावेळी विशद केले.

टॅग्स :SocialसामाजिकSwimmingपोहणे