शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली ब्लास्टमधील 'मॅडम सर्जन'ची 'अमीरी' तर बघा, कॅश खरेदी केली होती मारुतीची ही 'SUV'! 'मॅडम X' आणि 'मॅडम Z' कोण?
2
‘ऑपरेशन लोटस’... सुरुवात तुम्हीच केली...; एकनाथ शिंदेंसमोरच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना झापले, यादीच वाचली...
3
नफावसुलीचा तडाखा! गुंतवणूकदारांचे २.४७ लाख कोटी रुपये पाण्यात; 'हे' ५ शेअर्स सर्वाधिक कोसळले
4
Aryavir Sehwag: वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरने गोलंदाजांची केली धुलाई, दोन्ही डावात धमाका
5
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर; e-KYC साठी मुदतवाढ, जाणून घ्या नवीन तारीख...
6
पत्नीने कर्ज फेडलं नाही म्हणून बँकेने पतीची पेन्शन कापली; आता ५ लाख नुकसान भरपाई द्यावी लागणार
7
का बुडतंय क्रिप्टो मार्केट? Bitcoin ९०००० डॉलर्सच्या खाली; ७ महिन्यांच्या नीचांकी स्तरावर
8
भारतात ई-पासपोर्ट डिलिव्हरीस सुरुवात! जून २०२५ पर्यंत पूर्ण बदलणार, जुन्या पासपोर्टधारकांचे काय...
9
‘स्वबळावर लढण्याच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करा; सर्वांनीच सबुरीने घ्या’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सल्ला
10
Hot Chocolate Recipe: वजन वाढण्याची चिंता सोडा! 'गिल्ट-फ्री' राहून पौष्टिक हॉट चॉकलेटचा घरीच आस्वाद घ्या 
11
VIDEO: आजोबांच्या धाडसाला सलाम! ८० वर्षांच्या 'तरूणा'चे १५००० फूट उंचीवरून 'स्कायडायव्हिंग'
12
एक विवाह ऐसा भी! नवरदेवाने हुंड्याचे ७ लाख केले परत; म्हणाला, "आम्हाला फक्त १ रुपया अन्..."
13
सुरक्षा दलाचे सर्वांत मोठे यश ! ५०० जवानांचा बळी घेणारा जहाल नक्षल कमांडर 'हिडमा'चा खात्मा ; १० कोटींचे होते इनाम
14
Mumbai Indians मधून बाहेर पडताच Arjun Tendulkar ची धडाकेबाज कामगिरी, साकारलं अनोखं शतक
15
महायुतीत नाराजीचा स्फोट, शिंदे गटातील मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे धाव, तर उदय सामंत रवींद्र चव्हाणांच्या भेटीला 
16
"...याची जाणीव ठेवणं गरजेचं होतं"; ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेसने सुनावले, अग्रलेखाला सणसणीत उत्तर
17
चौकशीत आरोपी डॉक्टरांचे मोठे खुलासे; सिग्नल App चा वापर, i-20 ची खरेदी अन्..., अनेक गोष्टी झाल्या उघड
18
VIRAL : आयुष्यातील पहिलीच नोकरी अन् अवघ्या तीन तासांनंतरच दिला राजीनामा! असं नेमकं झालं काय? 
19
Shiv Sena BJP: "थोडी नाराजी तयार झाली असेल, पण आजच्या..."; शिंदेंचे मंत्री नाराज असल्याच्या चर्चेवर बावनकुळे काय म्हणाले?
20
मुंबईकरांची धावपळ! शहरात CNG पुरवठा अचानक ठप्प; ऑटो-टॅक्सीची लांबच लांब रांग, कधीपर्यंत दुरुस्त होणार?
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींची जनगणना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:33 IST

राज्यकर्त्यांना वाटते? -प्रा. लक्ष्मण ढोबळे जालना : आपल्या नातवांचा सातबारा चालू राहण्यासाठी ओबीसींची जनगणना करणे अत्यंत धोक्याचे आहे, हे ...

राज्यकर्त्यांना वाटते? -प्रा. लक्ष्मण ढोबळे

जालना : आपल्या नातवांचा सातबारा चालू राहण्यासाठी ओबीसींची जनगणना करणे अत्यंत धोक्याचे आहे, हे ज्यांना वाटते तेच ओबीसींच्या जनगणनेला विरोध करीत असल्याचे माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी आज येथे सांगितले.

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बहुजन रयत परिषदेच्यावतीने काढण्यात आलेल्या नवनिर्धार अभियानाचे जालना शहरात शुक्रवारी आगमन झाले. यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत प्रा. ढोबळे हे बोलत होते. यावेळी बहुजन रयत परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश गालफाडे, बहुजन रयत परिषदेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष ॲड. कोमलताई साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना प्रा. ढोबळे पुढे म्हणाले की, आज मराठा समाजाला आरक्षण लागू होणे गरजेचे आहे, ओबीसी आरक्षणाबाबत बोलतांना ते म्हणाले की, ज्या दिवशी ओबीसींच्या हाती राज्याचे नेतृत्व येईल तेव्हा खऱ्या अर्थाने दुबळ्या माणसाचे कल्याण होईल. ओबीसींची जनगणना व्हायलाच हवी, असेही ते म्हणाले. महिलांवरील वाढत्या अत्याचारामुळे महिला वर्ग भयभीत झाला आहे. महिला वर्गांना संरक्षण देण्याची जबाबदारी बहुजन रयत परिषदेची आहे. यासाठीच आपण साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नवनिर्धार संवाद अभियान सुरू केले आहे. १८ जुलैपासून हे अभियान सुरू झाले आहे. या अभियानात झोपडपट्टी, मागास वस्तीत जाऊन आम्ही ५० जण दुबळ्या माणसांना व कमकुवत घटकांना त्यांच्या लाभाची ठिकाणे सांगत आहोत. आतापर्यंत २३ जिल्ह्यात हे अभियान पोहोचले आहे. नागरिकांना शिक्षण, आरोग्य व व्यवसाय ही त्रिसूत्री आम्ही सांगत आहोत. केंद्र सरकारच्या योजनांची माहितीही या अभियानात नागरिकांना दिली जात असल्याचे ते म्हणाले. या यात्रेला उत्तम प्रतिसाद मिळाला असून, ५ सप्टेंबर रोजी मुंबई येथील चिरागनगरात या अभियानाचा समारोप होणार असल्याचे ते म्हणाले.

विकासापासून दूर असलेल्या बहुजन समाजाला अ, ब, क, ड प्रवर्ग आरक्षण लागू करावे, वीर लहुजी साळवे मातंग अभ्यास आयोगाच्या शिफारशी तत्काळ लागू करण्यात याव्यात, आदी मागण्या प्रा. ढोबळे यांनी यावेळी मांडल्या.