शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

ओबीसींची जनगणना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:33 IST

राज्यकर्त्यांना वाटते? -प्रा. लक्ष्मण ढोबळे जालना : आपल्या नातवांचा सातबारा चालू राहण्यासाठी ओबीसींची जनगणना करणे अत्यंत धोक्याचे आहे, हे ...

राज्यकर्त्यांना वाटते? -प्रा. लक्ष्मण ढोबळे

जालना : आपल्या नातवांचा सातबारा चालू राहण्यासाठी ओबीसींची जनगणना करणे अत्यंत धोक्याचे आहे, हे ज्यांना वाटते तेच ओबीसींच्या जनगणनेला विरोध करीत असल्याचे माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी आज येथे सांगितले.

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बहुजन रयत परिषदेच्यावतीने काढण्यात आलेल्या नवनिर्धार अभियानाचे जालना शहरात शुक्रवारी आगमन झाले. यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत प्रा. ढोबळे हे बोलत होते. यावेळी बहुजन रयत परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश गालफाडे, बहुजन रयत परिषदेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष ॲड. कोमलताई साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना प्रा. ढोबळे पुढे म्हणाले की, आज मराठा समाजाला आरक्षण लागू होणे गरजेचे आहे, ओबीसी आरक्षणाबाबत बोलतांना ते म्हणाले की, ज्या दिवशी ओबीसींच्या हाती राज्याचे नेतृत्व येईल तेव्हा खऱ्या अर्थाने दुबळ्या माणसाचे कल्याण होईल. ओबीसींची जनगणना व्हायलाच हवी, असेही ते म्हणाले. महिलांवरील वाढत्या अत्याचारामुळे महिला वर्ग भयभीत झाला आहे. महिला वर्गांना संरक्षण देण्याची जबाबदारी बहुजन रयत परिषदेची आहे. यासाठीच आपण साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नवनिर्धार संवाद अभियान सुरू केले आहे. १८ जुलैपासून हे अभियान सुरू झाले आहे. या अभियानात झोपडपट्टी, मागास वस्तीत जाऊन आम्ही ५० जण दुबळ्या माणसांना व कमकुवत घटकांना त्यांच्या लाभाची ठिकाणे सांगत आहोत. आतापर्यंत २३ जिल्ह्यात हे अभियान पोहोचले आहे. नागरिकांना शिक्षण, आरोग्य व व्यवसाय ही त्रिसूत्री आम्ही सांगत आहोत. केंद्र सरकारच्या योजनांची माहितीही या अभियानात नागरिकांना दिली जात असल्याचे ते म्हणाले. या यात्रेला उत्तम प्रतिसाद मिळाला असून, ५ सप्टेंबर रोजी मुंबई येथील चिरागनगरात या अभियानाचा समारोप होणार असल्याचे ते म्हणाले.

विकासापासून दूर असलेल्या बहुजन समाजाला अ, ब, क, ड प्रवर्ग आरक्षण लागू करावे, वीर लहुजी साळवे मातंग अभ्यास आयोगाच्या शिफारशी तत्काळ लागू करण्यात याव्यात, आदी मागण्या प्रा. ढोबळे यांनी यावेळी मांडल्या.