शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

कार-दुचाकी अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 12:23 AM

भरधाव कार-दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दोदडगाव फाटा येथे घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : भरधाव कार-दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दोदडगाव फाटा येथे घडली.गोरख विठ्ठल नागरे (५४ रा. संगम जळगाव ता. गेवराई) असे मयताचे नाव आहे. गोरख नागरे व त्यांच्या पत्नी नयना नागरे (५०) हे दोघे सोमवारी सकाळी गेवराई येथून दुचाकीवरून अंबड तालुक्यातील दोदडगाव येथील सासरवाडीला जात होते. औरंगाबाद- सोलापूर महामार्गावरील दोदडगावच्या फाट्यावर औरंगाबादहून बीडकडे भरधाव जाणाऱ्या कारने (क्र.एम.एच.४३- एक्स. ३०९२) दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील नागरे दाम्पत्य जखमी झाले.अपघातात गोरख नागरे यांच्या डोक्याला, पायाला गंभीर दुखापत झाली. घटनास्थळी असलेले बळीराम मुंडे व इतर तरुणांनी त्यांना तात्काळ पाचोड येथील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी नेले. प्रथमोपचारानंतर पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात कार चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, मयताच्या पार्थिवावर गेवराई तालुक्यातील संगम जळगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन विवाहित मुली, सुना, नातवंडे, भाऊ असा परिवार आहे.गेल्या चारवर्षापासून या रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. परंतु, रस्ता ज्यावेळी मोठ्या प्रमाणावर खराब होता. त्यावेळी अनेक छोट्या-मोठ्या अपघातामध्ये अनेकांचा बळीही गेला होता. तर अनेक जण जायबंदी झाले होते.औरंगाबाद- सोलापूर हा महामार्ग चौपदरी व्हावा, म्हणून गेल्या पाच ते सात वर्षापासून काम सुरू आहे. हे काम कधी निधीअभावी तर कधी जमीन संपादनावरून अडविण्यात आले होते.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूcarकार