शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सामाजिक समतोलासाठी ‘सीएए’ कायदा मागे घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 01:19 IST

सामाजिक समतोल कायम राखण्यासाठी आणि जनतेच्या भावना लक्षात घेऊन केंद्र शासनाने तात्काळ कायदा मागे घ्यावा, असे प्रतिपादन आ. कैलास गोरंट्याल यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सीएए, एनआरसी, एनपीआर कायद्याच्या विरोधात देशपातळीवर आंदोलन उभे राहिले असून, सर्वसामान्यांच्या मनात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. सामाजिक समतोल कायम राखण्यासाठी आणि जनतेच्या भावना लक्षात घेऊन केंद्र शासनाने तात्काळ हा कायदा मागे घ्यावा, असे प्रतिपादन आ. कैलास गोरंट्याल यांनी केले.जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जमाते ए इस्लामी हिंद, अहेले सुन्नतुल जमात मुस्लिम लीग, पीआरपी कवाडे, समस्त ओबीसी समाज, ख्रिश्चन डेमोक्रॅटिक फ्रंट, मिल्लत बचाव तहेरीक इ. संघटनांच्या वतीने सीएए, एनआरसी आणि एनपीआर कायद्याविरुध्द, केंद्र शासनाच्या धोरणांविरूध्द शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी आ. गोरंट्याल बोलत होते.आ. गोरंट्याल म्हणाले, केंद्र शासन देशातील मूळ प्रश्नांना बगल देण्यासाठी सीएए सारखा कायदा लागू करुन बेरोजगारांचे लक्ष विचलित करण्यासाठी हा खटाटोप करीत आहे. वास्तविक पाहता केंद्र शासनाला सुशिक्षित बेरोजगारांचे आणि शेतकरी, गोरगरिबांचे प्रश्न सोडवायचे नाहीत. उलट या घटकांवर अन्याय करायचा आहे आणि भांडवलदारांची पाठराखण करायची असल्यामुळे केंद्र शासन देशात होत असलेल्या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करून जोपर्यंत हा कायदा केंद्र शासन मागे घेणार नाही, तोपर्यंत काँग्रेस पक्ष आणि इतर मित्र पक्षांसह विविध समाजसंघटनांचे आंदोलन अधिक तीव्रपणे होईल, ही बाब केंद्र शासनाने लक्षात घ्यावी, असेही गोरंट्याल यांनी सांगितले.प्रास्ताविक काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि संयोजक महेमूद शेख यांनी केले. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, बहुजन आघाडीचे दीपक डोके, जमाते इस्लामी हिंदचे अब्दुल मुजीब, अ. भा. कॉ. सदस्य भीमराव डोंगरे, विजय कामड, प्रभाकर पवार, ज्येष्ठ नेते एकबाल पाशा, प्रदेश सरचिटणीस कल्याण दळे, अहेले सुन्नतूल जमातचे सय्यद जमील अहमद रजवी, समस्त ओबीसी समाजाचे राजेंद्र राख, राजेश काळे, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. विनायक चिटणीस, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साईनाथ चिन्नादोरे, पीआरपी कवाडे गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र हिवाळे, शेख शमशुद्दीन, मिल्लत बचाव तहरीकचे अफसर चौधरी, ख्रिश्चन डेमोक्रेटिक फ्रंटचे वैभव उगले, कैलास रत्नपारखे, अकबर इनामदार, दिनकर घेवंते, बदर चाऊस, मिर्झा अफसर बेग आदींनी मनोगत व्यक्त केले. यानंतर एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.यावेळी लक्ष्मण म्हसलेकर, विठ्ठलसिंग राजपूत, विष्णू कंटुले, गनी पटेल, राम सावंत, विनोद यादव, अफसर चौधरी, अशोक नावकर, शिवराज जाधव, मुस्तकीम हमदुले, शाकेर खान, तय्यब देशमुख, सय्यद मुस्ताक, शेख अन्वर यांच्यासह विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, सदस्य, नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकcongressकाँग्रेसagitationआंदोलनNCPराष्ट्रवादी काँग्रेसVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालना