शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

बायोमेट्रिकचा बागुलबुवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 01:02 IST

कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दररोज वर्गात हजेरी लावणे बंधनकारक करण्यासाठी बायोमेट्रिक यंत्रणा बसविण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या आदेशाचे पालन करण्याकडे अनेक महाविद्यालयांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे

संजय देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शिक्षण क्षेत्रातील ढासळत्या गुणवत्तेसह घटणाऱ्या विद्यार्थी संख्येवर उपाय म्हणून आता राज्य सरकारने कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दररोज वर्गात हजेरी लावणे बंधनकारक करण्यासाठी बायोमेट्रिक यंत्रणा बसविण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या आदेशाचे पालन करण्याकडे अनेक महाविद्यालयांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. गेल्याच आठवड्यात शिक्षण विभागाने जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालांची तपासणी केल्याने हा विषय ऐरणीवर आला आहे.गेल्या वीस वर्षात खासगी कोचिंग क्लासचे फॅड एवढे वाढले की, महाविद्यालये ही केवळ एक बोर्डाची परीक्षा देण्यासाठीचे रजिट्रेशन सेंटर बनली आहेत, अशी भयावह स्थिती निर्माण झाली आहे. याला ज्या प्रमाणे विद्यार्थी व पालक जबाबदार आहेत, त्यापेक्षा अधिक महाविद्यालयातील प्राध्यापक आणि संस्थाचालक तसेच शासनाचे दुर्लक्ष हेही एक प्रमुख कारण म्हणावे लागेल. वाढती लोकसंख्या आणि शिक्षणक्षेत्रातील स्पर्धा यामुळे आपला पाल्य त्यात टिकला पाहिजे या दृष्टीने विचार होऊ लागला. त्यामुळेच खासगी कोचिंग क्लासची संस्कृती फोफावली आहे. दुसरे एक कारण म्हणजे सरकारने विनाअनुदानित तत्वावर सुरू केलेले भरमसाठ कनिष्ठ महाविद्यालय हे देखील आहे. ज्या प्राध्यापकांना नोकरीची संधी मिळते तेथे त्यांना किती वेतन मिळते हा संशोधनाचा विषय आहे. अनुदानित आणि विनाअनुदानित यातील फरकही शिक्षणच्या मूळावर उठला आहे. काही मोजक्या संस्थेत प्राध्यापक म्हणून नोकरी लागण्यासाठी कसे अर्थपूर्ण व्यवहार होतात हे जगजाहीर आहे. त्यामुळे आपण कसे नोकरीला लागतो याची जाण त्यांना असते. आणि आपण कशी नोकरी दिली याची माहिती संस्थाचालकाला असल्याने कोणाचाच कोणाला धाक राहिलेला नसल्याने देखील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे वास्तव आहे. आजची परीक्षा पध्दतीही केवळ ओब्जेक्टीव झाली आहे. त्यामुळे सीईटी सारख्या अन्य पात्रता परीक्षांची तयारी करण्यातच विद्यार्थी व पालक महत्व देत आहेत. गुण मिळवणे हाच एक उद्देश विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ठेवल्याने त्यांच्या कल्पना शक्तीला वाव मिळत नसल्याचे दिसून आले. मुलांच्या गुणवत्तेवर आणखी एक मोठा हल्ला केला आहे, तो सोशल मीडियाने आज दहावी नंतरचा विद्यार्थी हा पुस्तकात कमी आणि मोबाईलमध्ये जास्त डोके घालून बसतो आहे. नाती-गोती तसेच सामाजिक भान, जबादारी यापासून दूर जातांना दिसत आहे. प्रसिध्द शास्त्रज्ञ आईनस्टाइन यांनी फारवर्षापूर्वी सांगून ठेवले की, कल्पकता ही ज्ञानापेक्षा महत्वाची असते परंतु हे त्यांचे सुविचार पुस्तकातच आहेत. हे प्रत्यक्षात उतरवण्याची गरज आहे. परंतु हे ना शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतात ना पालक यामुळे देखील युवक-युवती देखील आपल्याच जगात रमरमाण असतात. कोचिंग क्लासची फी ही सर्वसामान्य पालकांच्या खिशाला न परडवणारी आहे, परंतु विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अनेकजण पदरमोड करून का होईना पाल्याला कोचिंगला पाठवत आहेत. तसेच इतर उद्योगांप्रमाणे एज्युकेशन ही देखील एक इंडस्ट्री झाली आहे. केवळ मार्क मिळवूनच जीवनात यशस्वी होता येते, ही संस्कृती रूजत असल्याने याचे दूरगामी परिणाम होणार असल्याचे जाणकार सांगत आहेत. अनेक पालक हे त्यांचे व्यवसाय सोडून दुस-या शहरातच नव्हे तर दुस-या राज्यात पाल्यांसाठी जातात.

टॅग्स :collegeमहाविद्यालयEducationशिक्षणState Governmentराज्य सरकार