शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

गावाच्या विकासासाठी आई व्हा- पेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 00:31 IST

आपल्या गावाच्या विकासासाठी सरपंचाने त्या गावाची आई होणे गरजेचे असल्याचे मत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पाटोदाचे सरपंच भास्करराव पाटील यांनी मांडले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : आपल्या गावाच्या विकासासाठी सरपंचाने त्या गावाची आई होणे गरजेचे असल्याचे मत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पाटोदाचे सरपंच भास्करराव पाटील यांनी मांडले.परतूर येथे लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात स्व. बाबासाहेब भाऊ आकात स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कारासाठी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांची निवड करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी आ. राजेश टोपे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव कपिल आकात, उपाध्यक्ष कुणाल आकात, प्रा. डॉ. अशोक देशमाने, प्रा. डॉ. सर्जेराव जिगे, प्रचार्य डॉ भगवान दिरंगे, डॉ. भारत खंदारे हे होते. यावेळी पुरस्काराला उत्तर देताना सरपंच पेरे पाटील म्हणाले, सरपंचाने गावची आई होणे गरजेचे आहे. आई मुलाला खायला सर्व चांगले देते. परंतु तरीही ते मूल खात नाही. मग आई त्याला अनेक सायास करून खाऊ घालते. तसेच गावकऱ्यांना चांगले कामही रूचत नाही. ते त्यांना पटवून सांगून आपल्याला गावचा विकास करायचा असतो. मी सातवी शिकलो पण आज देशभर फिरून अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देत आहे. गावात अनेक योजना राबवल्या. त्यामुळेच गावकºयांनीही माझ्यावर विश्वास टाकला. आपल्या वाट्याला आलेले काम प्रामाणिकपणे केलं तर निश्चितच यश मिळते, असेही ते म्हणाले.कार्यक्रमास डॉ. संजय काळबांडे, संचालक अशोक आघाव, आसाराम लाटे, माऊली लाटे, सरपंच महेश आकात, डॉ. सुधाकर जाधव, उपप्राचार्य संभाजी तिडके, डॉ. सदाशिव मुळे, डॉ. रवी प्रधान, प्रबंधक दशरथ देवडे, सरपंच कणसे, ओंकार काटै, बद्री खवणे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.खेड्यांच्या विकासात देशाचा विकास- टोपेआ. राजेश टोपे म्हणाले की, खेड्यांच्या विकासात देशाचा विकास आहे. पाण्याचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांना रोजगारक्षम शिक्षण मिळाले ेपाहिजे. कौशल्य व ज्ञान याची सांगड घालता आली पाहिजे, असेही टोपे म्हणाले. प्रास्ताविकात सभापती कपिल आकात यांनी स्व. बाबासाहेब आकात स्मृती पुरस्कार सुरू करण्यामागची पार्श्वभूमी सांगून क र्तबगार व गुणवान व्यक्तीलाच हा पुरस्कार मिळाला पाहिजे. पुरस्कार प्रदान करणारी व्यक्तीही त्याच तोडीची असली पाहिजे.नीतिमत्ता ठेवून कमवासरपंचांना खर्च व उत्पन्नाचा ताळमेळ जुळवता येत नाही. हे करीत असताना कर वसुलीही महत्त्वाची आहे. चांगले काम करताना सर्वांनाच त्रास होतो.त्रास जास्त होऊ लागला की, समजून घ्या, आपला मार्ग बरोबर आहे. त्यामुळे काही वेळा सर्व नीतीचाही अवलंब करा मात्र आपल्या गावाचा विकास करा.

टॅग्स :sarpanchसरपंचgovernment schemeसरकारी योजनाSocialसामाजिकcivic issueनागरी समस्या