शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

गावाच्या विकासासाठी आई व्हा- पेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 00:31 IST

आपल्या गावाच्या विकासासाठी सरपंचाने त्या गावाची आई होणे गरजेचे असल्याचे मत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पाटोदाचे सरपंच भास्करराव पाटील यांनी मांडले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : आपल्या गावाच्या विकासासाठी सरपंचाने त्या गावाची आई होणे गरजेचे असल्याचे मत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पाटोदाचे सरपंच भास्करराव पाटील यांनी मांडले.परतूर येथे लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात स्व. बाबासाहेब भाऊ आकात स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कारासाठी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांची निवड करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी आ. राजेश टोपे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव कपिल आकात, उपाध्यक्ष कुणाल आकात, प्रा. डॉ. अशोक देशमाने, प्रा. डॉ. सर्जेराव जिगे, प्रचार्य डॉ भगवान दिरंगे, डॉ. भारत खंदारे हे होते. यावेळी पुरस्काराला उत्तर देताना सरपंच पेरे पाटील म्हणाले, सरपंचाने गावची आई होणे गरजेचे आहे. आई मुलाला खायला सर्व चांगले देते. परंतु तरीही ते मूल खात नाही. मग आई त्याला अनेक सायास करून खाऊ घालते. तसेच गावकऱ्यांना चांगले कामही रूचत नाही. ते त्यांना पटवून सांगून आपल्याला गावचा विकास करायचा असतो. मी सातवी शिकलो पण आज देशभर फिरून अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देत आहे. गावात अनेक योजना राबवल्या. त्यामुळेच गावकºयांनीही माझ्यावर विश्वास टाकला. आपल्या वाट्याला आलेले काम प्रामाणिकपणे केलं तर निश्चितच यश मिळते, असेही ते म्हणाले.कार्यक्रमास डॉ. संजय काळबांडे, संचालक अशोक आघाव, आसाराम लाटे, माऊली लाटे, सरपंच महेश आकात, डॉ. सुधाकर जाधव, उपप्राचार्य संभाजी तिडके, डॉ. सदाशिव मुळे, डॉ. रवी प्रधान, प्रबंधक दशरथ देवडे, सरपंच कणसे, ओंकार काटै, बद्री खवणे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.खेड्यांच्या विकासात देशाचा विकास- टोपेआ. राजेश टोपे म्हणाले की, खेड्यांच्या विकासात देशाचा विकास आहे. पाण्याचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांना रोजगारक्षम शिक्षण मिळाले ेपाहिजे. कौशल्य व ज्ञान याची सांगड घालता आली पाहिजे, असेही टोपे म्हणाले. प्रास्ताविकात सभापती कपिल आकात यांनी स्व. बाबासाहेब आकात स्मृती पुरस्कार सुरू करण्यामागची पार्श्वभूमी सांगून क र्तबगार व गुणवान व्यक्तीलाच हा पुरस्कार मिळाला पाहिजे. पुरस्कार प्रदान करणारी व्यक्तीही त्याच तोडीची असली पाहिजे.नीतिमत्ता ठेवून कमवासरपंचांना खर्च व उत्पन्नाचा ताळमेळ जुळवता येत नाही. हे करीत असताना कर वसुलीही महत्त्वाची आहे. चांगले काम करताना सर्वांनाच त्रास होतो.त्रास जास्त होऊ लागला की, समजून घ्या, आपला मार्ग बरोबर आहे. त्यामुळे काही वेळा सर्व नीतीचाही अवलंब करा मात्र आपल्या गावाचा विकास करा.

टॅग्स :sarpanchसरपंचgovernment schemeसरकारी योजनाSocialसामाजिकcivic issueनागरी समस्या