शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

गावाच्या विकासासाठी आई व्हा- पेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 00:31 IST

आपल्या गावाच्या विकासासाठी सरपंचाने त्या गावाची आई होणे गरजेचे असल्याचे मत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पाटोदाचे सरपंच भास्करराव पाटील यांनी मांडले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : आपल्या गावाच्या विकासासाठी सरपंचाने त्या गावाची आई होणे गरजेचे असल्याचे मत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पाटोदाचे सरपंच भास्करराव पाटील यांनी मांडले.परतूर येथे लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात स्व. बाबासाहेब भाऊ आकात स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कारासाठी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांची निवड करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी आ. राजेश टोपे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव कपिल आकात, उपाध्यक्ष कुणाल आकात, प्रा. डॉ. अशोक देशमाने, प्रा. डॉ. सर्जेराव जिगे, प्रचार्य डॉ भगवान दिरंगे, डॉ. भारत खंदारे हे होते. यावेळी पुरस्काराला उत्तर देताना सरपंच पेरे पाटील म्हणाले, सरपंचाने गावची आई होणे गरजेचे आहे. आई मुलाला खायला सर्व चांगले देते. परंतु तरीही ते मूल खात नाही. मग आई त्याला अनेक सायास करून खाऊ घालते. तसेच गावकऱ्यांना चांगले कामही रूचत नाही. ते त्यांना पटवून सांगून आपल्याला गावचा विकास करायचा असतो. मी सातवी शिकलो पण आज देशभर फिरून अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देत आहे. गावात अनेक योजना राबवल्या. त्यामुळेच गावकºयांनीही माझ्यावर विश्वास टाकला. आपल्या वाट्याला आलेले काम प्रामाणिकपणे केलं तर निश्चितच यश मिळते, असेही ते म्हणाले.कार्यक्रमास डॉ. संजय काळबांडे, संचालक अशोक आघाव, आसाराम लाटे, माऊली लाटे, सरपंच महेश आकात, डॉ. सुधाकर जाधव, उपप्राचार्य संभाजी तिडके, डॉ. सदाशिव मुळे, डॉ. रवी प्रधान, प्रबंधक दशरथ देवडे, सरपंच कणसे, ओंकार काटै, बद्री खवणे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.खेड्यांच्या विकासात देशाचा विकास- टोपेआ. राजेश टोपे म्हणाले की, खेड्यांच्या विकासात देशाचा विकास आहे. पाण्याचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांना रोजगारक्षम शिक्षण मिळाले ेपाहिजे. कौशल्य व ज्ञान याची सांगड घालता आली पाहिजे, असेही टोपे म्हणाले. प्रास्ताविकात सभापती कपिल आकात यांनी स्व. बाबासाहेब आकात स्मृती पुरस्कार सुरू करण्यामागची पार्श्वभूमी सांगून क र्तबगार व गुणवान व्यक्तीलाच हा पुरस्कार मिळाला पाहिजे. पुरस्कार प्रदान करणारी व्यक्तीही त्याच तोडीची असली पाहिजे.नीतिमत्ता ठेवून कमवासरपंचांना खर्च व उत्पन्नाचा ताळमेळ जुळवता येत नाही. हे करीत असताना कर वसुलीही महत्त्वाची आहे. चांगले काम करताना सर्वांनाच त्रास होतो.त्रास जास्त होऊ लागला की, समजून घ्या, आपला मार्ग बरोबर आहे. त्यामुळे काही वेळा सर्व नीतीचाही अवलंब करा मात्र आपल्या गावाचा विकास करा.

टॅग्स :sarpanchसरपंचgovernment schemeसरकारी योजनाSocialसामाजिकcivic issueनागरी समस्या