शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: नाशिक, दिंडोरीत ९ वाजेपर्यंत ६ टक्के मतदान
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
5
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
6
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
7
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
8
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
9
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
10
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
11
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
12
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
13
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
14
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
15
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
16
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
17
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
18
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
19
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
20
बिल्डरच्या १७ वर्षीय मुलाने घेतला दाेघांचा बळी

पोलिसांच्या निर्देशांकडे बँकांची सर्रास डोळेझाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 12:41 AM

जालाना जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका, नागरी सहकारी बँका आणि अन्य वित्तीय संस्था मिळून जवळपास १०४ पेक्षा अधिक आहेत.

ठळक मुद्देचोरट्यांकडून लक्ष्य : कोट्यवधी रूपये राम भरोसे, चोरट्यांचे फावते...

जालना : जालाना जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका, नागरी सहकारी बँका आणि अन्य वित्तीय संस्था मिळून जवळपास १०४ पेक्षा अधिक आहेत. त्यात सर्व मिळून अंदाजित तीन हजार कोटी रूपयांच्या ठेवी असून, रोजची उलाढाल ही काहीशे कोटी रूपयांमध्ये होते.एवढे सर्व व्यवहार होत असतांना अनेकजण आपल्या कष्टाचा पैसा हा सुरक्षीत राहावा म्हणून बँक, पतसंस्थांमध्ये ठेवताता. मात्र, या संस्थाच जर पैशांच्या सुरक्षेकडे एवढे दुर्लक्ष करत असतील तर मोठा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. याचे ताजे उदाहरण म्हणजे जालन्यातील एसबीआय शाखेची तिजोरी फोडण्याचा झालेला प्रयत्न पुरेसा बोलका आहे.जालना शहर हे व्यापार आणि उद्योगांचे शहर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे येथे दररोजच कोट्यवधी रूपयांचे व्यवहार हे नित्याचेच आहेत. त्यातच हजारो कोटी रूपयांच्या ठेवी जालन्यातील जवळपास ३५ राष्ट्रीयकृत आणि ५७ सहकारी बँका, पगारदारांच्या पतसंस्थांमध्ये ठेवलेल्या आहेत. एकूणच हे पैसे ग्राहकांना बँकांमध्ये रांगांमध्ये उभे राहून काढण्यासाठी जाणारा वेळ कमी व्हावा म्हणून एटीएम सुविधा उपलब्ध करून दिली आहे. परंतु हे एटीएमच लांबवून त्यातील रक्कम लांबविण्याचे प्रकार जालन्यातही घडले होते. परंतु एवढे सर्व होऊनही बँकांचे व्यवस्थापन हे सुरक्षेकडे कानाडोळा करत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.जालना शहरातील गांधीचमन भागातील एसबीआय बँकेच्या शटरच्या कुलूपा तोडून एका चोरट्याने थेट बँकेच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात त्याला यश आले नाही. त्या तिजोरीत ५४ लाख रूपये होते, अशी माहिती बँक व्यवस्थापकाने पोलिसांना दिली. जर तिजोरी फोडण्यात चोरट्याला यश आले असते तर, मोठा अनर्थ ठरला असता असे बँकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. एकूणच या प्रकारामुळे पोलिसही धास्तावले आहेत.

टॅग्स :JalanaजालनाBanking Sectorबँकिंग क्षेत्रatmएटीएमtheftचोरीPoliceपोलिस