शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

बदनापूरला पुन्हा मुसळधार पावसाने झोडपले; शेतीचे अतोनात नुकसान, जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 12:30 IST

rain in Jalna : खरीप पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे

बदनापूर ( जालना ) : तालुक्यात शुक्रवारी रात्री पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील वाकुळणी येथे ओढ्याचे व शेतामधील पाणी गावात आल्याने ग्रामस्थांचे हाल झाले. सततच्या मुसळधार पावसाने शेतीचे अतोनात नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. 

तालुक्यात शुक्रवारी पुन्हा मुसळधार पाऊस झाला. यामुळे खरीप पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे. तसेच तालुक्यातील वाकुळणी येथे गावाजवळून वाहणाऱ्या ओढयाचे व शेतीचे पाणी गावात साचले होते. या गावात आलेल्या पाण्यामुळे हनुमान मंदिरासमोर असलेली जुनी बारव पाण्याने भरली होती. तसेच गावातील बस स्थानक परिसरात पाणीच पाणी झाले होते. सुकना नदीला मोठा पूर आला असून या नदीवर बांधण्यात आलेला कोल्हापुरी बंधारा दुथडी भरुन वाहु लागला आहे.

मुसळधार पावसामुळे अनेक गावांमधील खरीप पिकांमध्ये पावसाचे पाणी साचत आहे. कापूस, सोयाबीन, मका, तूर, बाजरी अशा अनेक पिकांचे नुकसान होत आहे. तालुक्यातील अनेक नदीनाल्यांना पुराचे पाणी आले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शनिवारी सुद्धा सकाळपासून पाऊस सुरू झाला होता. शुक्रवारी बदनापूर मंडळात 62 मिलिमीटर रोशनगाव मंडळात 45 मिलिमीटर शेलगाव मंडळात 35 मिलिमीटर दाभाडी मंडळात साठ मिलीमीटर व बावणे पांगरी मंडळात चार मिलिमीटर असा एकूण 206 मिलिमीटर पाऊस झाला असून त्याची सरासरी 41.2 मिलिमीटर एवढी आहे. 

टॅग्स :RainपाऊसagricultureशेतीJalanaजालना