कामासोबतच गुणवत्तेकडे लक्ष द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:30 IST2021-09-03T04:30:31+5:302021-09-03T04:30:31+5:30

जालना : कोणतेही काम करताना कामासोबतच गुणवत्तेकडे लक्ष दिल्यास गावचा विकास कोणीही थांबू शकत नाही, असे प्रतिपादन जिल्हा ...

Attention should be paid to quality along with work | कामासोबतच गुणवत्तेकडे लक्ष द्यावे

कामासोबतच गुणवत्तेकडे लक्ष द्यावे

जालना : कोणतेही काम करताना कामासोबतच गुणवत्तेकडे लक्ष दिल्यास गावचा विकास कोणीही थांबू शकत नाही, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी केले.

बदनापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या महिला बचत गटांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनुपमा नंदनवनकर, गटविकास अधिकारी व्ही.आर. हरकळ यांची उपस्थिती होती. स्वच्छ भारत मिशन व उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने बदनापूर तालुक्यात महिला बचत गटांच्या मदतीने घनकचरा व्यवस्थापन हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. गाव पातळीवर तयार होणाऱ्या सेंद्रिय खताला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी पंचायत समिती स्तरावर सृष्टी भू सुधारक केंद्र येथे सेंद्रिय खताची खरेदी करण्यात येते. या उपक्रमामुळे गाव परिसरामध्ये स्वच्छता निर्माण होऊन सेंद्रिय खताची निर्मिती होते. तसेच खत निर्मितीतून महिला बचत गटांना आर्थिक पाठबळही मिळते. या नावीन्य पूर्ण बाबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कौतुक करून या उपक्रमास अधिकाधिक गतिमान करण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी उमेदचे शैलेश चौधरी, स्वच्छ भारत मिशनच्या जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक नम्रता गोस्वामी यांनी उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गटविकास अधिकारी व्ही.आर.हरकळ, टाकणखार यांनी केले. यावेळी स्वच्छ भारत मिशन कक्षाचे भगवान तायड, हिमांशू कुलकर्णी, जय राठोड, श्रीकांत चित्राल यांच्यासह तालुका कक्षातील समन्वयक व ग्राम संघातील महिलांची उपस्थिती होती.

फोटो

Web Title: Attention should be paid to quality along with work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.