शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

जालन्यातील शेतकऱ्यांना ११० कोटींची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 12:44 AM

शासनाने मदत जाहीर केली असून, जालना जिल्ह्याला ती ११० कोटी रूपये मिळाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पावसाळ्यात भोकरदन आणि जाफराबाद तालुका वगळता अन्य सहा तालुक्यांमध्ये पावसासाठी प्रतीक्षा करावी लागली. जेमतेम पावसात शेतकऱ्यांनी खरिपाची पिके तगवली. आता केवळ सांगनी करून सोयाबीन बाजारात नेणे तेवढे शिल्लक असताना, परतीच्या पावसाने त्याची दाणादास उडवून दिली. यात सर्वात जास्त फटका सोयाबीन आणि मका पिकाला बसला आहे. या नुकसानीचे पंचनामे पूर्ण होऊन चार लाख ८० हेक्टरवरील नुकसान झाले होते. यानुसार शासनाने मदत जाहीर केली असून, जालना जिल्ह्याला ती ११० कोटी रूपये मिळाली आहे.जिल्ह्यात पावसाळ्यात भोकरदन आणि जाफराबाद या तालुक्यात मुबलक पाऊस पडला. परंतु अन्य तालुक्यात पावसासाठी शेतकºयांच डोळे आभाळाकडे लागून होते. परंतु पावसाळा संपल्यावरही या सहा तालुक्यात सरासरी एवढा पाऊस झाला नव्हता. परंतु नंतर आॅक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने ही पावसाची तूट भरून काढली. तूट भरून काढतांना हातातोंडाशी आलेल्या पिकांसाठी हा पाऊस नुकसानदायी ठरला. यामुळे शेतक-यांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले होते.हे झालेले नुकसान भरून निघत नसल्याने शेतक-यांनी नुकसानीच्या पंचनाम्याची मागणी केली होती. त्यानुसार प्रशासनाने पंचनामे केले. यावेळी कृषी विभाग तसेच महसूल आणि ग्रामसेवकांनी या महत्त्वाची भूमिका निभावली. जिल्ह्यातील पंचनामे केल्यावर जे नुकसान झाले आहे, त्यापोटी राज्य सरकारने जुन्या निकषानुसारच ही मदत देऊ केली आहे. राज्यात सरकार नसतांना राज्यपालांनी ही मदत जाहीर केली आहे. आता ही ११० कोटींची मदत जिल्ह्यासाठी मंजूर आहे. त्यात आता ज्या तालुक्यात जास्त क्षेत्राचे नुकसान झाले, त्यानुसार त्यांचे वाटप तालुकानिहाय होऊन नंतर ते अनुदान तहसील पातळीवरून शेतक-यांच्या खात्यात वर्ग केले जाणार आहे.राज्यात परतीच्या पावसाने जेनुकसान झाले आहे, त्या नुकसानग्रस्त शेतकºयांना मदत देण्यासाठी १३ मे २०१५ चा अध्यादेश ग्राह्य धरला आहे. त्यानुसार कोरडवाहू शेतक-यांना प्रतिहेक्टरी सहा हजार ८०० रूपये तर, बागयायती शेतक-यांच्या नुकसानीपोटी आठ हजार रूपये प्रतिहेक्टरी मदत मिळणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :fundsनिधीFarmerशेतकरीGovernmentसरकारRainपाऊस