शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

शॉर्टसर्किटमुळे स्वप्नांची राख; पूर्ण वाढलेला ११ हेक्टर ऊस जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2021 1:56 PM

Fire in farm field : आगीने रौद्ररूप धारण करून परिसरातील ४ ते ५ गटातील जवळपास ११.७२ हेक्टर उसाला आपल्या कवेत घेतले.

ठळक मुद्देमहावितरणने गंभीर न घेतल्याने आग लागल्याचा आरोप शासनाने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी

टेंभुर्णी (जि.जालना) : जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी येथे शुक्रवारी शॉर्टसर्किटमुळे उसाला आग (11 hectares of fully grown sugarcane burn ) लागली. या आगीत कुंभारझरी शिवारातील १४ शेतकऱ्यांचा ११.७२ हेक्टर ऊस जळून खाक झाला आहे. दरम्यान, वेळोवेळी सांगूनही विजेची तारे सरळ न करणाऱ्या वीज वितरण प्रशासनाविरुद्ध शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे.

शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास येथील गट क. ९२ मधील शेतकरी विनायक चव्हाण यांच्या उसाला विजेच्या शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. बघता बघता या आगीने रौद्ररूप धारण करून परिसरातील ४ ते ५ गटातील जवळपास ११.७२ हेक्टर उसाला आपल्या कवेत घेतले. यावेळी संपूर्ण गावकऱ्यांनी या शेतांकडे आग नियंत्रित आणण्यासाठी धाव घेतली. मोठ्या प्रयत्नानंतर गावकऱ्यांना ही आग नियंत्रित आणण्यात यश आले. या आगीत जवळपास १ हजार ५०० टनांपेक्षा अधिक ऊस जळून खाक झाल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला असून, त्यात ३० ते ३५ लाखांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे अद्याप परिसरात कुठेही साखर कारखाने सुरू नसल्याने या संपूर्ण उसाचे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागणार आहे. दरम्यान, या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.

तीन वर्षांपूर्वीही लागली होती आगतीन वर्षांपूर्वीही याच ठिकाणी विजेच्या शॉर्टसर्किटमुळे उसाला लागलेल्या आगीत ६० ते ७० एकर ऊस जळून खाक झाला होता. तेव्हा ऊस जळूनही वीज वितरणाने या प्रकरणाला गांभीर्याने न घेतल्याने पुन्हा ही दुर्घटना घडली, अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकरी बोलून दाखवित आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीJalanaजालना