शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

संतप्त नागरिकांचा हंडामोर्चा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 00:47 IST

पुणेगाव येथे टँकरने पाणी पुरवठा करण्याच्या मागणीसाठी महिला, नागरिकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हंडा आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दिवसेंदिवस पाणीटंचाईची समस्या वाढत चालली आहे. गावात पाणी मिळत नसल्यामुळे नागरिक, महिलांतून रोष व्यक्त होत आहे. पुणेगाव येथे टँकरने पाणी पुरवठा करण्याच्या मागणीसाठी महिला, नागरिकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हंडा आंदोलन केले.जालना तालुक्यातील पुणेगाव येथे सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दोन दिवसांपूर्वीच ग्रामस्थांनी जि.प. कार्यालयासमोर हंडा आंदोलन केले होते. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एक टँकर मजूर केले. एक दिवस गावात टँकरही आले. परंतु, त्यानंतर गावात टँकर आलेच नाही.एका टँकरवर तहान भागविणे अवघड झाले आहे. पाणी टंचाईच्या या समस्येकडे सरपंच, ग्रामसेवकाकडून दुर्लक्ष होत आहे. यामुळे गावात दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हंडा आंदोलन केले. यावेळी कारभारी साहेबराव अंभोरे, शांता दारकड, लता करपे, सतीश इंगळे, नारायण घुगे, धोंडीराम चुनखडे, धोंडीराम चुनखडे, सोपान उगले, राजाभाऊ चुनखडे आदींची उपस्थिती होती.पाण्यासाठी रास्ता रोकोचा इशारालोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री / जामखेड : अंबड तालुक्यातील बारासवाडा येथील गल्हाटी धरणात जायकवाडी धरणातील डाव्या कालव्यातून पाणी सोडविण्यात यावे, अशी मागणी वीस गावातील शेतकऱ्यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन सोमवारी अंबड तहसीलदारांना देण्यात आले. मागणी मान्य न केल्यास ‘रास्ता रोको’ करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.यंदाच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी गल्हाटी धरण संघर्ष समिती व परिसरातील शेतकरी अनेक वर्षांपासून गल्हाटी धरणात जायकवाडी डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी करत आहे. याबाबत ०२ मार्च २०१९ रोजी जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शहापूर येथे रास्ता रोको करण्यात आला होता. मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णयही शेतक-यांनी घेतला होता. परंतु, अंबड तहसीलदारांच्या मध्यस्तीने हा निर्णय मागे घेण्यात आला होता. मात्र, अद्यापही याची दखल प्रशासनाने घेतली नाही.गल्हाटी धरणात पाणी नसल्यामुळे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गल्हाटी धरणात प्रशासनाने तात्काळ पाणी सोडावे, अशी मागणी शेतकºयांच्यावतीने करण्यात आली. येत्या चार दिवसात पाणी सोडले नाही तर ३१ मे रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. याप्रसंगी संतोष जेधे, पांडुरंग गटकळ, बंडू मैद, ए. एस. जाधव, संतोष झनझने, प्रवीण पवार, अनिल राठोड, अनिल सावंत, रमेश सोनवणे, उमेश गव्हाणे आदी ग्रामस्थांची उपस्थिती होती.

टॅग्स :agitationआंदोलनwater shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळ