शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

संतप्त नागरिकांचा हंडामोर्चा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 00:47 IST

पुणेगाव येथे टँकरने पाणी पुरवठा करण्याच्या मागणीसाठी महिला, नागरिकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हंडा आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दिवसेंदिवस पाणीटंचाईची समस्या वाढत चालली आहे. गावात पाणी मिळत नसल्यामुळे नागरिक, महिलांतून रोष व्यक्त होत आहे. पुणेगाव येथे टँकरने पाणी पुरवठा करण्याच्या मागणीसाठी महिला, नागरिकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हंडा आंदोलन केले.जालना तालुक्यातील पुणेगाव येथे सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दोन दिवसांपूर्वीच ग्रामस्थांनी जि.प. कार्यालयासमोर हंडा आंदोलन केले होते. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एक टँकर मजूर केले. एक दिवस गावात टँकरही आले. परंतु, त्यानंतर गावात टँकर आलेच नाही.एका टँकरवर तहान भागविणे अवघड झाले आहे. पाणी टंचाईच्या या समस्येकडे सरपंच, ग्रामसेवकाकडून दुर्लक्ष होत आहे. यामुळे गावात दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हंडा आंदोलन केले. यावेळी कारभारी साहेबराव अंभोरे, शांता दारकड, लता करपे, सतीश इंगळे, नारायण घुगे, धोंडीराम चुनखडे, धोंडीराम चुनखडे, सोपान उगले, राजाभाऊ चुनखडे आदींची उपस्थिती होती.पाण्यासाठी रास्ता रोकोचा इशारालोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री / जामखेड : अंबड तालुक्यातील बारासवाडा येथील गल्हाटी धरणात जायकवाडी धरणातील डाव्या कालव्यातून पाणी सोडविण्यात यावे, अशी मागणी वीस गावातील शेतकऱ्यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन सोमवारी अंबड तहसीलदारांना देण्यात आले. मागणी मान्य न केल्यास ‘रास्ता रोको’ करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.यंदाच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी गल्हाटी धरण संघर्ष समिती व परिसरातील शेतकरी अनेक वर्षांपासून गल्हाटी धरणात जायकवाडी डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी करत आहे. याबाबत ०२ मार्च २०१९ रोजी जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शहापूर येथे रास्ता रोको करण्यात आला होता. मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णयही शेतक-यांनी घेतला होता. परंतु, अंबड तहसीलदारांच्या मध्यस्तीने हा निर्णय मागे घेण्यात आला होता. मात्र, अद्यापही याची दखल प्रशासनाने घेतली नाही.गल्हाटी धरणात पाणी नसल्यामुळे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गल्हाटी धरणात प्रशासनाने तात्काळ पाणी सोडावे, अशी मागणी शेतकºयांच्यावतीने करण्यात आली. येत्या चार दिवसात पाणी सोडले नाही तर ३१ मे रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. याप्रसंगी संतोष जेधे, पांडुरंग गटकळ, बंडू मैद, ए. एस. जाधव, संतोष झनझने, प्रवीण पवार, अनिल राठोड, अनिल सावंत, रमेश सोनवणे, उमेश गव्हाणे आदी ग्रामस्थांची उपस्थिती होती.

टॅग्स :agitationआंदोलनwater shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळ