शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

अंबड तालुक्यात ४ हजार घरे झाली चुलमुक्त; प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे यश 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2017 3:54 PM

धुरामुळे ग्रामीण महिलांनासुद्धा विविध आजाराला सामोरे जावे लागत होते. यासाठीच  प्रधानमंत्री उज्ज्वला योजना राबविण्यात आली. अंबड तालुक्यातील ३ हजार ६४० कुंटुबला या योजनेचा लाभ झाल्याने अनेक कुटुंबाना धुरापासून मुक्ती मिळाली आहे.

जालना : स्वयंपाकापासून ते अंघोळीला लागणा-या गरम पाणी करण्यापर्यंत घरातील बाया-बापडींना चुल पेटवण्यासाठी जळतन (लाकूड-फाटा) जमवाजमव करण्यासाठी रानोमाळ भटकावे लागायचे. तरच सकाळ-संध्याकाळ चुली पेटत असत. याला फाटा देण्यासाठी तालुक्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजना राबविण्यात आली. यामुळे तालुक्यातील ४ हजार घरे चुलमुक्त होऊन या कुटुंबांची धूरापासून मुक्ती झाली आहे.  

ग्रामीण भागात गॅसची सुविधा नसल्याने स्वयंपाक व इतर दैनदिन कामासाठी इंधन म्हणून लाकूड फाट्याची गरज लागते. यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात येत असे. यातून पर्यावरणास हानी पोहोचायची. तसेच धुरामुळे ग्रामीण महिलांनासुद्धा विविध आजाराला सामोरे जावे लागत होते. यासाठीच  प्रधानमंत्री उज्ज्वला योजना राबविण्यात आली. अंबड तालुक्यातील ३ हजार ६४० कुंटुबला या योजनेचा लाभ झाल्याने अनेक कुटुंबाना धुरापासून मुक्ती मिळाली आहे.

जागतिक आरोग्य संस्थेच्या  अहवालानुसार चुलीचा धूर श्वासनाद्वारे शरीरात जाणे म्हणजे एका तासात ४०० सगारेट ओढण्यासारखे आहे. सर्व सामान्य घरातील महिला किमान सलग दोन तास सकाळी व दोन तास रात्री या धुराच्या सान्निध्यात येतात. यामुळे महिलांचे आरोग्य धोक्यात आले होते. महिलांच्या आरोग्यावर घातक परिणाम करणारा हा स्वयंपाकाचा धूर निर्माणच होऊ नये म्हणून शासनाने प्रधानमंत्री उज्वला योजना अमलात आणली आहे. डिसेंबर २०१६ अखेर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आलेल्या योजनेमुळे अनेक सर्व सामान्य कुटुंबीयांना चुली पासून मुक्ती मिळाली आहे. तालुक्यात २०११ मध्ये करण्यात आलेल्या सर्व्हेनूसार तालुक्यातील चार हजार घरे चुलमुक्त झाल्याचे तहसीलदार दत्ता भारस्कर यांनी सांगितले. याचा निश्चितच ग्रामस्थांना फायदा होत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

जनजागृती करण्याची गरजपर्यावरणाचे संर्वधन आणि महिलांचे आरोग्य चांगले राहवे यासाठी पंधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र याचा अद्यापही म्हणावा तसा ग्रामीण भागात जनजागृती झाली नाही. यामुळे अद्यापही ग्रामीण भागात धूर कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे या योजनेबाबात मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे गरजेचे आहे.