शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

जालन्यात चारा छावण्यासाठी शेतकरी संघटनेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 17:07 IST

प्रशासनाकडून दुष्काळी उपाययोजना करण्यास कानाडोळा होत असल्याचा आरोप

जालना : शासनाने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करुन तीन महिने झाले आहे. असे असतांनाही प्रशासनाकडून दुष्काळग्रस्तासाठी काहीच उपाययोजना करण्यात येत नसल्याचा आरोप करत सोमवारी (दि. २९ ) शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनावरासह धरणे आंदोलन करुन शासनाचा निषेध केला.

जिल्ह्यात पर्जन्यमान कमी झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने प्रशासनाकडून अहवाल मागवून जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याचे सांगून प्रशासनाकडून दुष्काळी उपाययोजना करण्यास कानाडोळा केला होतो. आता निवडणूक होवून आठवडा झाला आहे.

मात्र प्रशासनाकडून जनावरांचा चारा, टँकरची व्यवस्था अद्यापही केलेली नाही. ग्रामसेवक, मंडळअधिकारी मुख्यालयी थांबतच नसल्याने कोणाकडे दाद मागावी अशी स्थिती जिल्ह्यात झाली आहे. प्रशासनाला निवेदन देऊनही या गंभीर बाबीकडे कानाडोळा करण्यात येत असल्याने संतप्त शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रखरखत्या उन्हामध्ये जिल्हाधिकारी कार्यालसमोर जनावरासह आंदोलन केले. जिल्ह्यात मागणी तेथे चारा छावण्या सुरु करण्याची मागणी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाव्दारे केली.निवेदनावर आप्पासाहेब कदम, दत्तात्रय कदम, शिवाजी लकडे, डॉ. भागवत काळे, अशोक आटोळे, कृष्णा पिसोरे, शिवाजी तुपे, अंकुश लकडे, मनोहर गात आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टॅग्स :agitationआंदोलनJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालनाJalanaजालनाdroughtदुष्काळ