शहरं
Join us  
Trending Stories
1
बुरहान वानीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी दिल्ली बॉम्बस्फोट घडवला? डॉ. उमर बद्दल मोठा खुलासा...
2
T20 World Cup 2026 Schedule Announced : टी-२० वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर! भारत-पाक एकाच गटात
3
खडसे-महाजन वादात माझा सँडविच होतोय; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंचे मोठे विधान
4
सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर CM फडणवीसांचे भाष्य; म्हणाले, “निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया...”
5
Video: धक्कादायक! माजी आमदार निर्मला गावित यांना अज्ञात कारने उडवले, रुग्णालयात दाखल
6
कुटुंबियांचा लग्नास विरोध; पाकिस्तानी हिंदू प्रेमी युगुल सीमा ओलांडून भारतात, BSF ने घेतले ताब्यात
7
“जोपर्यंत CM आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही”; फडणवीसांनी दिला शब्द
8
बिहार फत्ते; आता 'या' दोन राज्यात NDA चे सरकार स्थापन होणार, अमित शाहांचा मोठा दावा...
9
आम्ही जाण्यापूर्वीच पोस्टमार्टेम, पंचनामा नाही, तिच्या डोक्यावर वळ...; गौरी गर्जे-पालवेच्या आईचे गंभीर आरोप 
10
TET Paper Leak: मराठवाड्यातून गोंदियातील शिक्षकांना कॉल, कुणाकडे दीड लाख, कुणाला मागितले तीन लाख रुपये
11
'सहकुटुंब सहपरिवार' फेम अभिनेत्री अडकली लग्नबेडीत, पुण्यात थाटामाटात पार पडला विवाहसोहळा
12
चीनने पुन्हा गरळ ओकली; अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचा पुनरुच्चार...
13
Travel : परदेशात कशाला... भारतातच आहे 'मिनी थायलंड'; कपल्ससाठी 'स्वर्गीय' ठिकाण!
14
तुम्हीही बेडवर लॅपटॉप चालवताय? एक मोठी चूक आणि बसू शकतो हजारोंचा फटका! ताबडतोब वाचा...
15
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
16
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
17
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
18
थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
19
"जे होतं ते आम्ही फडणवीस यांच्यासमोर मनमोकळ्या...", महायुतीतील नाराजी नाट्यावर एकनाथ शिंदेंचा खुलासा
20
“श्रीराम काल्पनिक होते असं म्हणणारी गुलामी संपवू”; PM मोदींनी सांगितला २०३५ पर्यंतचा संकल्प
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात चारा छावण्यासाठी शेतकरी संघटनेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 17:07 IST

प्रशासनाकडून दुष्काळी उपाययोजना करण्यास कानाडोळा होत असल्याचा आरोप

जालना : शासनाने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करुन तीन महिने झाले आहे. असे असतांनाही प्रशासनाकडून दुष्काळग्रस्तासाठी काहीच उपाययोजना करण्यात येत नसल्याचा आरोप करत सोमवारी (दि. २९ ) शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनावरासह धरणे आंदोलन करुन शासनाचा निषेध केला.

जिल्ह्यात पर्जन्यमान कमी झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने प्रशासनाकडून अहवाल मागवून जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याचे सांगून प्रशासनाकडून दुष्काळी उपाययोजना करण्यास कानाडोळा केला होतो. आता निवडणूक होवून आठवडा झाला आहे.

मात्र प्रशासनाकडून जनावरांचा चारा, टँकरची व्यवस्था अद्यापही केलेली नाही. ग्रामसेवक, मंडळअधिकारी मुख्यालयी थांबतच नसल्याने कोणाकडे दाद मागावी अशी स्थिती जिल्ह्यात झाली आहे. प्रशासनाला निवेदन देऊनही या गंभीर बाबीकडे कानाडोळा करण्यात येत असल्याने संतप्त शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रखरखत्या उन्हामध्ये जिल्हाधिकारी कार्यालसमोर जनावरासह आंदोलन केले. जिल्ह्यात मागणी तेथे चारा छावण्या सुरु करण्याची मागणी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाव्दारे केली.निवेदनावर आप्पासाहेब कदम, दत्तात्रय कदम, शिवाजी लकडे, डॉ. भागवत काळे, अशोक आटोळे, कृष्णा पिसोरे, शिवाजी तुपे, अंकुश लकडे, मनोहर गात आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टॅग्स :agitationआंदोलनJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालनाJalanaजालनाdroughtदुष्काळ