शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

‘शेततळे’ असूनही अखेर बागांनी ‘दम’ तोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 00:35 IST

काही शेतकऱ्यांकडे ‘शेततळे’ असूनही फळ बागांनी ‘दम’ तोडल्याने शेतकरी हताश झाले आहेत. अहोरात्र मेहनत करून जोपासलेल्या बागा ऐन उत्पन्नाच्या वयात जळाल्याने शेतकऱ्यांचे चेहरे चिंतेन काळवंडले आहेत.

ठळक मुद्दे६० टक्के फळबागा नष्ट : कमी पावसामुळे तळ्यांनाच मिळाले नाही पाणी, बहरात आलेल्या फळबागा ऐनवेळी जळाल्या

परतूर : काही शेतकऱ्यांकडे ‘शेततळे’ असूनही फळ बागांनी ‘दम’ तोडल्याने शेतकरी हताश झाले आहेत. अहोरात्र मेहनत करून जोपासलेल्या बागा ऐन उत्पन्नाच्या वयात जळाल्याने शेतकऱ्यांचे चेहरे चिंतेन काळवंडले आहेत.परतूर तालुक्यात कधी नव्हे ते यावर्षी पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य जाणवले. विहिरी, बोअर, शेततळी आटली. नवीन बोअर, विहीर घेवूनही पाणी लागले नाही. पाणी पातळी कमालीची घटल्याने पक्के पाणी असलेले जलस्त्रोत हबकले. यामुळे बगायती क्षेत्र धोक्यात आले. काही शेतकरी टँकरने पाणी देवून, शेततळे, ठिबकसह विविध उपाय योजना करून आपल्या बागा आतापर्यंत शेतकºयांनी जोपसल्या. प्रत्येक उन्हाळ््यात शेतकरी पाण्याचे व्यवस्थापण करून आपली बाग जगवतोच, मात्र, या वर्षी शेतकºयांना कडाक्याचे ऊन व पाण्याची अडचण यापुढे हात टेकावे लागले. अनेक उपाय व खर्च करूनही फळबागा जगवता आल्या नाही. घटलेली पाणी पातळी व वाढलेली उन्हाची तिव्रता त्यामुळे थोडे फार पाणी दिले तरी, दुसºयाच दिवशी झाडाचे आळे कोरडे पडू लागले तर, उन्हाच्या तिव्रतेने झाडाची पाने करपू लागली. काही शेतकºयांनी मोसंबी, संत्रा, चिकू या बागा उन्हाळ््यात जगवण्यासाठी शेततळ््यांची व्यवस्था केली आहे. यामध्ये प्लास्टीक तळे प्रभावी ठरले. दरवर्षी हे शेततळे या बागा उन्हाळ््यात जगविण्यासाठी चांगला हातभार लावतात. मात्र, या वर्षी पाण्याचे एवढे दुर्भिक्ष्य निर्माण झाले की, ही तळीच तहानलेली राहीली. या तळ््यात भरपूर पाणी सोडता आले नाही, व जे थोडे बहूत पाणी तळ््यात साठवलेले पाणी या बागांना वाचवू शकले नाही. त्यामुळे दरवर्शी तालुक्यातील कमी होत जाणारे हे मोसंबी, संत्री व ईतर फळ बागाचेही क्षेत्र या वर्षी मोठ्या प्रमाणात घटले आहे.एकेकाळी या परीसरात हजारो एक्करवर फळबागा डोलत होत्या. उत्पन्नही भरघोस व्हायचे मात्र पावसाचे घटत जाणारे प्रमाण व उन्हाची वाढत जाणारी तिव्रता यामुळे फळबागांची शेती आता शेवटच्या घटका मोजत आहे. दरवर्षी फळबागांना उन्हाळ््यात तारणारे शेततळेही यावर्षी तहानलेले राहील्याने जवळपास साठ टक्के फळबागांनी दम तोडला असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Jalanaजालनाdroughtदुष्काळwater shortageपाणीटंचाईAgriculture Sectorशेती क्षेत्र