शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

‘शेततळे’ असूनही अखेर बागांनी ‘दम’ तोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 00:35 IST

काही शेतकऱ्यांकडे ‘शेततळे’ असूनही फळ बागांनी ‘दम’ तोडल्याने शेतकरी हताश झाले आहेत. अहोरात्र मेहनत करून जोपासलेल्या बागा ऐन उत्पन्नाच्या वयात जळाल्याने शेतकऱ्यांचे चेहरे चिंतेन काळवंडले आहेत.

ठळक मुद्दे६० टक्के फळबागा नष्ट : कमी पावसामुळे तळ्यांनाच मिळाले नाही पाणी, बहरात आलेल्या फळबागा ऐनवेळी जळाल्या

परतूर : काही शेतकऱ्यांकडे ‘शेततळे’ असूनही फळ बागांनी ‘दम’ तोडल्याने शेतकरी हताश झाले आहेत. अहोरात्र मेहनत करून जोपासलेल्या बागा ऐन उत्पन्नाच्या वयात जळाल्याने शेतकऱ्यांचे चेहरे चिंतेन काळवंडले आहेत.परतूर तालुक्यात कधी नव्हे ते यावर्षी पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य जाणवले. विहिरी, बोअर, शेततळी आटली. नवीन बोअर, विहीर घेवूनही पाणी लागले नाही. पाणी पातळी कमालीची घटल्याने पक्के पाणी असलेले जलस्त्रोत हबकले. यामुळे बगायती क्षेत्र धोक्यात आले. काही शेतकरी टँकरने पाणी देवून, शेततळे, ठिबकसह विविध उपाय योजना करून आपल्या बागा आतापर्यंत शेतकºयांनी जोपसल्या. प्रत्येक उन्हाळ््यात शेतकरी पाण्याचे व्यवस्थापण करून आपली बाग जगवतोच, मात्र, या वर्षी शेतकºयांना कडाक्याचे ऊन व पाण्याची अडचण यापुढे हात टेकावे लागले. अनेक उपाय व खर्च करूनही फळबागा जगवता आल्या नाही. घटलेली पाणी पातळी व वाढलेली उन्हाची तिव्रता त्यामुळे थोडे फार पाणी दिले तरी, दुसºयाच दिवशी झाडाचे आळे कोरडे पडू लागले तर, उन्हाच्या तिव्रतेने झाडाची पाने करपू लागली. काही शेतकºयांनी मोसंबी, संत्रा, चिकू या बागा उन्हाळ््यात जगवण्यासाठी शेततळ््यांची व्यवस्था केली आहे. यामध्ये प्लास्टीक तळे प्रभावी ठरले. दरवर्षी हे शेततळे या बागा उन्हाळ््यात जगविण्यासाठी चांगला हातभार लावतात. मात्र, या वर्षी पाण्याचे एवढे दुर्भिक्ष्य निर्माण झाले की, ही तळीच तहानलेली राहीली. या तळ््यात भरपूर पाणी सोडता आले नाही, व जे थोडे बहूत पाणी तळ््यात साठवलेले पाणी या बागांना वाचवू शकले नाही. त्यामुळे दरवर्शी तालुक्यातील कमी होत जाणारे हे मोसंबी, संत्री व ईतर फळ बागाचेही क्षेत्र या वर्षी मोठ्या प्रमाणात घटले आहे.एकेकाळी या परीसरात हजारो एक्करवर फळबागा डोलत होत्या. उत्पन्नही भरघोस व्हायचे मात्र पावसाचे घटत जाणारे प्रमाण व उन्हाची वाढत जाणारी तिव्रता यामुळे फळबागांची शेती आता शेवटच्या घटका मोजत आहे. दरवर्षी फळबागांना उन्हाळ््यात तारणारे शेततळेही यावर्षी तहानलेले राहील्याने जवळपास साठ टक्के फळबागांनी दम तोडला असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Jalanaजालनाdroughtदुष्काळwater shortageपाणीटंचाईAgriculture Sectorशेती क्षेत्र