शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
4
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
5
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
6
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
7
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
8
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
9
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
10
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
11
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
12
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
13
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
14
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
15
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
18
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
19
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
20
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार

‘शेततळे’ असूनही अखेर बागांनी ‘दम’ तोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 00:35 IST

काही शेतकऱ्यांकडे ‘शेततळे’ असूनही फळ बागांनी ‘दम’ तोडल्याने शेतकरी हताश झाले आहेत. अहोरात्र मेहनत करून जोपासलेल्या बागा ऐन उत्पन्नाच्या वयात जळाल्याने शेतकऱ्यांचे चेहरे चिंतेन काळवंडले आहेत.

ठळक मुद्दे६० टक्के फळबागा नष्ट : कमी पावसामुळे तळ्यांनाच मिळाले नाही पाणी, बहरात आलेल्या फळबागा ऐनवेळी जळाल्या

परतूर : काही शेतकऱ्यांकडे ‘शेततळे’ असूनही फळ बागांनी ‘दम’ तोडल्याने शेतकरी हताश झाले आहेत. अहोरात्र मेहनत करून जोपासलेल्या बागा ऐन उत्पन्नाच्या वयात जळाल्याने शेतकऱ्यांचे चेहरे चिंतेन काळवंडले आहेत.परतूर तालुक्यात कधी नव्हे ते यावर्षी पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य जाणवले. विहिरी, बोअर, शेततळी आटली. नवीन बोअर, विहीर घेवूनही पाणी लागले नाही. पाणी पातळी कमालीची घटल्याने पक्के पाणी असलेले जलस्त्रोत हबकले. यामुळे बगायती क्षेत्र धोक्यात आले. काही शेतकरी टँकरने पाणी देवून, शेततळे, ठिबकसह विविध उपाय योजना करून आपल्या बागा आतापर्यंत शेतकºयांनी जोपसल्या. प्रत्येक उन्हाळ््यात शेतकरी पाण्याचे व्यवस्थापण करून आपली बाग जगवतोच, मात्र, या वर्षी शेतकºयांना कडाक्याचे ऊन व पाण्याची अडचण यापुढे हात टेकावे लागले. अनेक उपाय व खर्च करूनही फळबागा जगवता आल्या नाही. घटलेली पाणी पातळी व वाढलेली उन्हाची तिव्रता त्यामुळे थोडे फार पाणी दिले तरी, दुसºयाच दिवशी झाडाचे आळे कोरडे पडू लागले तर, उन्हाच्या तिव्रतेने झाडाची पाने करपू लागली. काही शेतकºयांनी मोसंबी, संत्रा, चिकू या बागा उन्हाळ््यात जगवण्यासाठी शेततळ््यांची व्यवस्था केली आहे. यामध्ये प्लास्टीक तळे प्रभावी ठरले. दरवर्षी हे शेततळे या बागा उन्हाळ््यात जगविण्यासाठी चांगला हातभार लावतात. मात्र, या वर्षी पाण्याचे एवढे दुर्भिक्ष्य निर्माण झाले की, ही तळीच तहानलेली राहीली. या तळ््यात भरपूर पाणी सोडता आले नाही, व जे थोडे बहूत पाणी तळ््यात साठवलेले पाणी या बागांना वाचवू शकले नाही. त्यामुळे दरवर्शी तालुक्यातील कमी होत जाणारे हे मोसंबी, संत्री व ईतर फळ बागाचेही क्षेत्र या वर्षी मोठ्या प्रमाणात घटले आहे.एकेकाळी या परीसरात हजारो एक्करवर फळबागा डोलत होत्या. उत्पन्नही भरघोस व्हायचे मात्र पावसाचे घटत जाणारे प्रमाण व उन्हाची वाढत जाणारी तिव्रता यामुळे फळबागांची शेती आता शेवटच्या घटका मोजत आहे. दरवर्षी फळबागांना उन्हाळ््यात तारणारे शेततळेही यावर्षी तहानलेले राहील्याने जवळपास साठ टक्के फळबागांनी दम तोडला असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Jalanaजालनाdroughtदुष्काळwater shortageपाणीटंचाईAgriculture Sectorशेती क्षेत्र