शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

प्रशासन म्हणतेय मागेल त्याला काम; ‘सिटू’चा कामासाठी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 12:56 AM

सोमवारी अनेक गावांमधील मजुरांनी एकत्रित येत दुपारी एक वाजेच्या दरम्यान भर उन्हामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : प्रशासनाकडून अनेक ग्रामपंचायतींमध्ये मागेल त्याला काम देण्यासाठी सेल्फवरील कामाचे नियोजन केल्याचा दावा केला जात आहे. तर दुसरीकडे मात्र, मागणी करूनही काम मिळत नसल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन, सिटू यांच्या वतीने करण्यात येत आहे.सोमवारी अनेक गावांमधील मजुरांनी एकत्रित येत दुपारी एक वाजेच्या दरम्यान भर उन्हामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी त्यांनीप्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून मागणी करूनही काम मिळत नसल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धरणग्रस्त आणि दुष्काळग्रस्त परतूर तालुक्यातील विविध गावांमध्ये सात महिन्यांपासून मनरेगाच्या कामाची मागणी करूनही मजुरांना कामे दिली जात नाहीत. त्यामुळे ज्या गावांमध्ये मागणी करूनही कामे दिली नाही, अशा गावातील मजुरांना बेरोजगारीचा भत्ता तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली असून, कामे मिळावीत म्हणून यापूर्वीही खांडवी, पाटोदा, मंठा तसेच आंबा, वरफळ येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.एकीकडे हे आंदोलन सुरू असतानाच जिल्हाधिकारी कार्यालयात मात्र सचिवांकडून दुष्काळाचा आढावा घेतला जात होता. या मोर्चात कामगार नेते अण्णा सावंत, सरिता शर्मा, सचिन थोरात, मुक्ता शिंदे, दीपक दवंडे, स्वाती प्रधान, बंडोपंत कणसे, मारोती खंदारे, मधुकर मोकळे आदींचा सहभाग होता.

टॅग्स :Morchaमोर्चाJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालना