शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

...तर आगामी अधिवेशनापर्यंत राज्यपाल बदलून दाखवा; आदित्य ठाकरेंचे सरकारला थेट चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 15:40 IST

'आमच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, उद्योग राज्यात आणले पण कधी दिखावा केला नाही.'

दिलीप सारडा बदनापूर - महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आगामी अधिवेशनापर्यंत महाराष्ट्राचे राज्यपाल बदलून दाखवावेत, असे जाहीर आव्हान माजी मंत्री तथा युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथे आज(दि. 8) आदित्य ठाकरे यांनी ग्रामस्थांसोबत संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मी मुख्यमंत्र्यांना चॅलेंज देत असून आगामी अधिवेशनात राज्यपाल म्हणून तिथे भाषण करायला येतील ते नवीन राज्यपाल आणून दाखवा.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, राज्यपाल स्वतः म्हणतात की मला इथे राहण्याची इच्छा नाही. आता मुख्यमंत्र्यांनी केंद्राला सांगावे आणि राज्याताल नवीन राज्यपाल मिळवून द्यावेत. आज राज्यामध्ये शेतकरी खुश नाही, महिला खुश नाही. सध्याचे राज्यात घटनाबाह्य सरकार असून हे सरकार पडणार म्हणजे पडणारच. आज कोर्टात केस चालू आहे, ज्या मिनिटाला संविधानात्मक निकाल येईल, त्यावेळी हे सरकार पडेल. सत्ता कोणाची असो परंतु सत्यासमोर सत्ता जायला वेळ लागत नाही, अशी टीका त्यांनी केली.

अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे राज्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. दोन सरकारमध्ये फरक हाच असतो. आमचे सरकार आले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती प्रथम द्यायची, असा निर्धार केला होता व त्याप्रमाणे दोन लाखापर्यंत सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली. आताच्या सरकारने प्रचंड अटी शर्ती लावून शेतकऱ्यांना मदत दिली. आम्ही आमचे कर्तव्य म्हणून हे काम केले. याचा गाजावाजा करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी होल्डिंग लावले नाही , असंही आदित्य म्हणाले.

ते पुढे म्हणतात, महाराष्ट्रात नवीन उद्योग येईना, रोजगार मिळेना. ज्या उद्योगाला आम्ही राज्यात आणण्यासाठी मंजुरी दिली होती तो उद्योग गुजरातमध्ये गेला. ते म्हणतात की, स्वित्झर्लंडमधील डावोसमध्ये जाऊन 80 हजार कोटीची परदेशी गुंतवणूक आणली. पण, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक आपल्या राज्यामध्ये आणली. आम्ही बोलून नव्हे तर करून दाखवलं आणि दुसऱ्या बाजूला हे मुख्यमंत्री अठ्ठावीस तासांसाठी डावोसला जाऊन चाळीस कोटी खर्च करुन येतात, असा घणाघातही आदित्य यांनी केला. 

 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेJalanaजालना