शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

आरोप करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी उत्पन्न वाढीचे स्त्रोत सांगावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 12:51 AM

नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी मंगळवारी सत्ताधा-यांनी जे आरोप केला, तसेच पालिकेचे उत्पन्न वाढीसाठी नेमके काय केले पाहिजे, हा प्रस्ताव आरोप करणा-यांनी द्यावा, असे आवाहनही गोरंट्याल यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आज कर आकारणीच्या मुद्यासह अन्य मुद्यावरून सत्ताधारी मंडळी राजकारणकरत आहेत. कुठलाही मुद्दा हा पालिके भोवती फिरत ठेवून पालिका प्रशासनाला बदनाम करण्याचे षडयंत्रच रचले जात आहे. परंतु ये पब्लिक है.. सब जानती है..असे म्हणून नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी मंगळवारी सत्ताधा-यांनी जे आरोप केला, तसेच पालिकेचे उत्पन्न वाढीसाठी नेमके काय केले पाहिजे, हा प्रस्ताव आरोप करणा-यांनी द्यावा, असे आवाहनही गोरंट्याल यांनी केले.आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने राजकीय वातावरण तापत ठेवण्याचे काम सत्ताधारी मंडळीकडून केले जात आहे. जालना शहरातील पालिका ही सत्ताधाºयांच्या नाकावर टिच्चून जनतेने काँग्रेसच्या हाती दिली आहे.हेच मुळात या सत्ताधा-यांचे दु:ख आहे. त्यामुळे स्वत:ची लोकप्रियता वाढीसाठी आमच्यावर आरोप करून स्वत:चे समाधान करून घेतले जात आहे.जालना पालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी ज्यावेळी एजन्सी नेमण्याचा निर्णय घेतला, तो निर्णय आम्ही प्रथम सर्वसाधारण सभेत ठेवला होता. सभागृहाची मान्यता घेऊन आम्ही हे काम दिले आहे.या एजन्सीकडून सर्व्हे करताना काही चुका झाल्याही असतील. परंतु, हे सर्वेक्षणच चुकीचे आहे. असे म्हणजे योग्य ठरत नाही.पालिकेला मालमत्ता कर आणि नळपट्टी आकारणीतूनच हक्काचे उत्पन्न मिळते.आम्ही कर आकारणी केल्यावर ज्यांना होते, त्यांना आक्षेप दाखल करण्यासाठीची वेळ दिली होती. तसेच आक्षेप दाखल केल्यांकडून केवळ ३० टक्केच कर वसूल केला जात आहे.अद्यापही यावर अंतिम निर्णय झाला नाही. ज्यांनी आक्षेप घेतले नाहीत, त्यांच्याकडून कर वसुली केली जात असल्याचेही गोरंट्याल यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षJalana Muncipalityजालना नगरपरिषदPoliticsराजकारणTaxकर