शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

महामंडळाने जमा केला १६ कोटींचा अपघात निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 00:01 IST

राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांकडून प्रत्येक तिकिटामागे एक रूपया अपघात मदत निधीसाठी वसूल करते. या योजनेचा जालना विभागात एप्रिल २०१९ ते फेबुवारी २०२० पर्यंत तब्बल १६ कोटी ०२ लाख रूपयांचा निधी जमा झाला

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांकडून प्रत्येक तिकिटामागे एक रूपया अपघात मदत निधीसाठी वसूल करते. या योजनेचा जालना विभागात एप्रिल २०१९ ते फेबुवारी २०२० पर्यंत तब्बल १६ कोटी ०२ लाख रूपयांचा निधी जमा झाला असून, ३० जखमी व ४ मयत प्रवाशांच्या वारसांना ६१ लाख ०१ हजार २९२ रूपयांची मदत देण्यात आली आहे.बस प्रवासात अथवा बसच्या धडकेत पादचारी किंवा प्रवासी मयत झाल्यास त्यांच्या वारसांना नुकसान भरपाई म्हणून प्रत्येकी १० लाख रूपयांची मदत केली जाते.राज्य परिवहन महामंडळातर्फे राज्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे अपघात सहाय्यता निधी योजना १ एप्रिल २०१६ पासून सुरू करण्यात आली. संबंधित योजनेसाठी प्रत्येक तिकिटधारी प्रवाशाला एक रूपया अतिरिक्त शुल्क आकारण्यात येते. सुरूवातीला महामंडळातर्फे अपघातग्रस्त मयत प्रवाशांच्या वारसदाराला ३ लाख रूपये व जखमी प्रवाशाला ४० हजार रूपयांपासून ७५ हजार रूपयांपर्यंत नुकसान भरपाई देण्यात येत होती. या रकमेत वाढ करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे व त्यानुसार मृत प्रवाशांच्या वारसांना दहा लाख रूपये देण्याचे ठरविले. संबंधित वाढीव निधी देण्यासाठी प्रत्येक तिकिटामागे एक रूपयाची वाढ केली होती.४ प्रवाशांना थेट भरपाईएप्रिल २०१९ ते फेब्रुवारी २०२० या ११ महिन्यांच्या कालावधीत ४ प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला आहे. जालना विभागात ४ मयत प्रवाशांच्या वारसदारांना थेट १० लाख रूपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे.फुकट्या प्रवाशांना लाभ नाहीबसमध्ये अनेकदा विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठ्या प्रमाणात असते. एखाद्या वेळी दुर्देवाने विनातिकीट प्रवास करणा-या प्रवाशाचा दुर्देवी मृत्यू झाला तर त्यांना ही अपघात सहाय्यता मदत दिला जात नाही.११ महिन्यांत ३० प्रवासी जखमीजालना विभागात एप्रिल २०१९ ते फेब्रुवारी २०२० पर्यंत ३० प्रवासी जखमी झाले आहेत तर ४ प्रवासी मयत झाले असून, महामंडळाने या प्रवाशांच्या वारसांना जवळपास ६१ लाख १ हजार २९२ रूपये दिले आहे. मयत व जखमी प्रवाशांना न्यायालय अथवा थेट स्वरूपातही मदत केली जाते. एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागातून ही आकडेवारी प्राप्त झाली आहे.

टॅग्स :state transportएसटीAccidentअपघातfundsनिधीSocialसामाजिक