शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
2
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
3
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
4
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
5
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
6
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
7
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
8
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
9
३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
10
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
11
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
12
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
13
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
14
उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
15
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
16
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
17
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
18
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
19
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
Daily Top 2Weekly Top 5

अपहरण प्रकरण; तीन आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 00:25 IST

जालना : ५० लाखाच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण करणाºया तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने गुरूवारी रात्री जेरबंद केले. संबंधित अपहरणकर्त्यांनी ...

ठळक मुद्देमहिनाभर केली रेकी : अपहरणाचे दोन प्रयत्न अयशस्वी

जालना : ५० लाखाच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण करणाºया तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने गुरूवारी रात्री जेरबंद केले. संबंधित अपहरणकर्त्यांनी ‘त्या’ ज्येष्ठ व्यापाºयाच्या दिवसभर होणा-या हलचालींची एक महिनाभर रेकी केली होती. तसेच दोन वेळेस अपहरणाचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र, तिसºया प्रयत्नात व्यापाºयाचे अपहरण केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.जुना जालना भागातील शिवशक्ती दालमील समोरील रोडवर ज्येष्ठ व्यापारी खेराजभाई भानुशाली यांचे ३० डिसेंबर रोजी सायंकाळी अपहरण झाले होते. त्यांच्या सुटकेसाठी त्यांचा मुलगा दीपक भानुशाली यांच्याकडे ५० लाख रूपयांची मागणी करण्यात आली होती. ही रक्कम सेंट मेरी स्कूल जवळ ठेवण्यास सांगण्यात आले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि राजेंद्रसिंह गौर व त्यांच्या सहकाऱ्यांनी अपहरणकर्त्यांनी सांगितलेल्या ठिकाणावर सापळा रचला होता. त्यावेळी व्यापारी खेराजभाई भानुशाली यांची यशस्वी सुटका करण्यात आली होती. मात्र, अपहरणकर्त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला होता.जालना शहरातील कन्हैय्यानगर भागात राहणारा राहूल सुदाम जाधव याने त्याच्या सहकाºयांना सोबत घेऊन व्यापाºयाचे अपहरण केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि राजेंद्रसिंह गौर यांना मिळाली होती. या माहितीवरून पोनि गौर व त्यांच्या सहकाºयांनी गुरूवारी कन्हैय्यानगर भागात कारवाई करून राहूल जाधव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर आपण भरत दशरथ भागडे (रा. लालबाग जालना), अजय उर्फ गट्टू इंदर जांगडे (रा. कन्हैय्यानगर जालना) व इतर एकाला सोबत घेऊन व्यापाºयाचे अपहरण केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी भरत भागडे याला जालना परिसरातून तर अजय जांगडे याला नांदेड परिसरातून जेरबंद केले. संबंधितांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, तीन मोबाईल असा एकूण ५१ हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केले आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोनि राजेंद्रसिंह गौर, उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत, पोहेकॉ सॅम्युअल कांबळे, कैलास कुरेवाड, फुलचंद हजारे, पोना गोकुळसिंग कायटे, प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, हिरामण फलटणकर, विनोद गडदे, रंजित वैराळ, पोकॉ सचिन चौधरी, सागर बाविस्कर, सोमनाथ उबाळे, संदीप मांटे, विलास चेके, किरण मोरे, चालक पोहेकॉ राऊत, पोना पूनम भट्ट यांच्या पथकाने केली.आरोपींना न्यायालयीन कोठडीज्येष्ठ व्यापाºयाच्या अपहरण प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने तिघांना जेरबंद केले होते. संबंधितांविरूध्द इतर प्रकरणात चंदनझिरा व कदीम पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. संबंधितांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.पाच तास विविध मार्गावर प्रवासज्येष्ठ व्यापारी खेराजभाई भानुशाली यांचे अपहरण केल्यानंतर संबंधित अपहरणकर्त्यांनी अंबड रोड, बदनापूर रोड, देऊळगाव राजा रोडवर तब्बल पाच तास प्रवास केला. प्रारंभी ५० लाखांची मागणी करणाºया अपहरणकर्त्यांनी शेवटी २ लाख रूपये मिळाल्यानंतर व्यापारी भानुशाली यांना सोडण्याची तयारी दर्शविली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कारवाई करीत व्यापाºयाची सुटका केली.५० लाखांची मागणी; मांडवली २ लाखातज्येष्ठ व्यापाºयाचे अपहरण केल्यानंतर प्रारंभी अपहरणकर्त्यांनी व्यापाºयाच्या मुलाकडे ५० लाख रूपयांची मागणी केली होती. मात्र, स्थागुशाचे पोनि राजेंद्रसिंह गौर यांनी व्यापाºयाच्या मुलाला विश्वासात घेत सर्व हलचालींची माहिती घेतली. अपहरणकर्ते आणि त्या मुलामध्ये पैशांवर चर्चा होऊन शेवटी २ लाख रूपयांची मागणी अपहरणकर्त्यांनी केली होती. अपहकरणकर्त्यांनी व्यापाºयाला मुख्य रस्त्यावर सोडावे, या दृष्टीने पोलिसांचे प्रयत्न सुरू होते.पोलिसांच्या सूचनांचे पालन करणाºया तक्रारदाराचे शेवटच्या टप्प्यात वडिलांच्या काळजीखातर संयम सुटले. त्यामुळे त्यांनी सेंट मेरी स्कूलसमोरील गल्लीत पैसे देण्याची तयारी दर्शविली. पोलिसांनी बॅगमध्ये एक लाख रूपये ठेऊन सापळा रचला होता. व्यापाºयाची सुटका झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन अपहरणकर्ते पळून गेले.

टॅग्स :JalanaजालनाArrestअटकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस