शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

अपहरण प्रकरण; तीन आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 00:25 IST

जालना : ५० लाखाच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण करणाºया तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने गुरूवारी रात्री जेरबंद केले. संबंधित अपहरणकर्त्यांनी ...

ठळक मुद्देमहिनाभर केली रेकी : अपहरणाचे दोन प्रयत्न अयशस्वी

जालना : ५० लाखाच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण करणाºया तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने गुरूवारी रात्री जेरबंद केले. संबंधित अपहरणकर्त्यांनी ‘त्या’ ज्येष्ठ व्यापाºयाच्या दिवसभर होणा-या हलचालींची एक महिनाभर रेकी केली होती. तसेच दोन वेळेस अपहरणाचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र, तिसºया प्रयत्नात व्यापाºयाचे अपहरण केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.जुना जालना भागातील शिवशक्ती दालमील समोरील रोडवर ज्येष्ठ व्यापारी खेराजभाई भानुशाली यांचे ३० डिसेंबर रोजी सायंकाळी अपहरण झाले होते. त्यांच्या सुटकेसाठी त्यांचा मुलगा दीपक भानुशाली यांच्याकडे ५० लाख रूपयांची मागणी करण्यात आली होती. ही रक्कम सेंट मेरी स्कूल जवळ ठेवण्यास सांगण्यात आले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि राजेंद्रसिंह गौर व त्यांच्या सहकाऱ्यांनी अपहरणकर्त्यांनी सांगितलेल्या ठिकाणावर सापळा रचला होता. त्यावेळी व्यापारी खेराजभाई भानुशाली यांची यशस्वी सुटका करण्यात आली होती. मात्र, अपहरणकर्त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला होता.जालना शहरातील कन्हैय्यानगर भागात राहणारा राहूल सुदाम जाधव याने त्याच्या सहकाºयांना सोबत घेऊन व्यापाºयाचे अपहरण केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि राजेंद्रसिंह गौर यांना मिळाली होती. या माहितीवरून पोनि गौर व त्यांच्या सहकाºयांनी गुरूवारी कन्हैय्यानगर भागात कारवाई करून राहूल जाधव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर आपण भरत दशरथ भागडे (रा. लालबाग जालना), अजय उर्फ गट्टू इंदर जांगडे (रा. कन्हैय्यानगर जालना) व इतर एकाला सोबत घेऊन व्यापाºयाचे अपहरण केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी भरत भागडे याला जालना परिसरातून तर अजय जांगडे याला नांदेड परिसरातून जेरबंद केले. संबंधितांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, तीन मोबाईल असा एकूण ५१ हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केले आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोनि राजेंद्रसिंह गौर, उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत, पोहेकॉ सॅम्युअल कांबळे, कैलास कुरेवाड, फुलचंद हजारे, पोना गोकुळसिंग कायटे, प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, हिरामण फलटणकर, विनोद गडदे, रंजित वैराळ, पोकॉ सचिन चौधरी, सागर बाविस्कर, सोमनाथ उबाळे, संदीप मांटे, विलास चेके, किरण मोरे, चालक पोहेकॉ राऊत, पोना पूनम भट्ट यांच्या पथकाने केली.आरोपींना न्यायालयीन कोठडीज्येष्ठ व्यापाºयाच्या अपहरण प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने तिघांना जेरबंद केले होते. संबंधितांविरूध्द इतर प्रकरणात चंदनझिरा व कदीम पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. संबंधितांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.पाच तास विविध मार्गावर प्रवासज्येष्ठ व्यापारी खेराजभाई भानुशाली यांचे अपहरण केल्यानंतर संबंधित अपहरणकर्त्यांनी अंबड रोड, बदनापूर रोड, देऊळगाव राजा रोडवर तब्बल पाच तास प्रवास केला. प्रारंभी ५० लाखांची मागणी करणाºया अपहरणकर्त्यांनी शेवटी २ लाख रूपये मिळाल्यानंतर व्यापारी भानुशाली यांना सोडण्याची तयारी दर्शविली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कारवाई करीत व्यापाºयाची सुटका केली.५० लाखांची मागणी; मांडवली २ लाखातज्येष्ठ व्यापाºयाचे अपहरण केल्यानंतर प्रारंभी अपहरणकर्त्यांनी व्यापाºयाच्या मुलाकडे ५० लाख रूपयांची मागणी केली होती. मात्र, स्थागुशाचे पोनि राजेंद्रसिंह गौर यांनी व्यापाºयाच्या मुलाला विश्वासात घेत सर्व हलचालींची माहिती घेतली. अपहरणकर्ते आणि त्या मुलामध्ये पैशांवर चर्चा होऊन शेवटी २ लाख रूपयांची मागणी अपहरणकर्त्यांनी केली होती. अपहकरणकर्त्यांनी व्यापाºयाला मुख्य रस्त्यावर सोडावे, या दृष्टीने पोलिसांचे प्रयत्न सुरू होते.पोलिसांच्या सूचनांचे पालन करणाºया तक्रारदाराचे शेवटच्या टप्प्यात वडिलांच्या काळजीखातर संयम सुटले. त्यामुळे त्यांनी सेंट मेरी स्कूलसमोरील गल्लीत पैसे देण्याची तयारी दर्शविली. पोलिसांनी बॅगमध्ये एक लाख रूपये ठेऊन सापळा रचला होता. व्यापाºयाची सुटका झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन अपहरणकर्ते पळून गेले.

टॅग्स :JalanaजालनाArrestअटकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस