शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

५० हजार शेतकऱ्यांनी केले आधार प्रमाणीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 00:12 IST

५० हजार ५७५ शेतक-यांनी आधार प्रमाणीकरण करून कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतला

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शासनाच्या कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रसिध्द झालेल्या दोन याद्यांमध्ये १ लाख ३० हजार १५८ शेतकऱ्यांचा समावेश आहे. पैकी तब्बल ५० हजार ५७५ शेतक-यांनी आधार प्रमाणीकरण करून कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतला आहे. तर यादीतील आधार क्रमांक चुकल्याबाबत ६७४ शेतक-यांनी तक्रारी नोंदविल्या आहेत.महाआघाडी शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रसिध्द करण्यात आलेल्या पहिल्या यादीत टेंभुर्णी व तीर्थपुरी येथील ११०२ शेतक-यांची नावे होती. तर दुस-या यादीत ९४५ गावातील १ लाख २९ हजार ५६ शेतक-यांची नावे समाविष्ठ करण्यात आली होती. याद्या जाहीर झाल्यापासून आजवर ५० हजार ५७५ शेतक-यांनी आधार प्रमाणीकरण केले आहे. तर ६७५ शेतक-यांनी आधार क्रमांकाबाबत तक्रारी नोंदविल्या आहेत. पैकी राष्ट्रीयीकृत बँकेतील ५४३ शतक-यांचे ४ कोटी ९१ लाख रूपये कर्जखात्यात जमा झाले आहेत.शासनाच्या दोन्ही याद्यांमध्ये नाव समाविष्ठ असलेल्या ८१ हजार ८१६ शेतक-यांचे आधार प्रमाणिकरण होणे अद्याप बाकी आहे. या शेतक-यांचे आधार प्रमाणीकरण वेळेत व्हावे, यासाठी प्रशासनाकडून सूचना देण्यात येत आहेत. तर शेतक-यांकडून दाखल होणा-या तक्रारींचे तात्काळ निरसण करण्याची प्रक्रियाही केली जात असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर इतर लाभार्थ्यांची यादी येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डFarmerशेतकरीgovernment schemeसरकारी योजनाCrop Loanपीक कर्ज